शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

साताऱ्याच्या ‘समाजकल्याण’ला पुण्याचा टेकू ! : दहा वर्षांत ११ जणांकडे प्रभारी कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:13 PM

नितीन काळेल। सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाला दहा वर्षांपासून अधिक करून प्रभारी अधिकाºयाचाच टेकू असून, आतातर ...

ठळक मुद्देप्रशासनाचा अजब कारभार; एकालाच तीन वर्षे पूर्ण करता आली

नितीन काळेल।सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाला दहा वर्षांपासून अधिक करून प्रभारी अधिकाºयाचाच टेकू असून, आतातर पुण्याच्या अधिकाºयाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारीही पुण्यातील काम पाहून आठवड्यातून काही दिवस येतात. परिणामी दूरवरून येणाºया लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दहा वर्षांत फक्त एकाच अधिकाºयाला तीन वर्षे पूर्ण करता आली असून, तब्बल ११ जणांकडे प्रभारीचा चार्ज होता, हे विशेष.

जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग महत्त्वपूर्ण आहे. या विभागाच्या वतीने अनूसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. याचा लाभ गरजूपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते, त्यासाठी कार्यालयातील यंत्रणा काम करते. समाजकल्याण अधिकाºयाच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांचे कामकाज चालते.

त्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला स्वतंत्र एक अधिकारी आहे; पण गेल्या दहा वर्षांत सातारा जिल्हा परिषदेच्या या कार्यालयाला पूर्णवेळ व कायमस्वरुपी अधिकारी फार कमी वेळा मिळाल्याचे दिसून आले आहे. वारंवार प्रभारी अधिकाºयाकडे पद्भार देण्यात आला आहे. आता तर पुणे येथील सहायक आयुक्त कार्यालयातील समाजकल्याण अधिकारी हरीश डोंगरे यांच्याकडे साताºयाचा प्रभारी पद्भार आहे.

नवीन प्रभारी समाजकल्याण अधिकारी दर सोमवारी साताºयाच्या कार्यालयात येतात. दिवसभर कामे करतात. तसेच मंगळवारी ते थांबून असतात; पण पुण्याचा कार्यभारही त्यांच्याकडे असल्याने त्यांना तिकडेही जावे लागते. त्यामुळे दोन्हीकडील पद्भार पाहताना तारेवरची कसरत होत आहे. अनेकवेळा जिल्ह्याच्या दूरवरच्या भागातून ग्रामस्थ कामानिमित्त जिल्हा परिषदेत येतात. त्यांना अधिकाºयांना भेटायचे असते. समस्या सांगायच्या असतात; पण येथे आल्यावर अधिकाºयाची भेट नाही झाली तर हेलपाटा मारावा लागतो, त्यासाठी वेळ आणि पैसाही वाया जातो. मोबाईलवरून अधिकाºयाशी संपर्क होतो; पण कामाच्या निपटाºयाचे काय? असाही प्रश्न लोकांना पडतो. त्यामुळे कायमस्वरुपी अधिकारी असणे आवश्यक ठरले आहे.कांबळे तीन वर्षे अधिकारी...समाजकल्याण विभागाचा गेल्या दहा वर्षांचा विचार करता तब्बल ११ जणांकडे प्रभारी पद्भार राहिला आहे. तर ए. पी. कांबळे यांनी पूर्ण तीन वर्षे अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच पी. एस. कवटे यांनी दहा महिने, यू. एम. घुले यांनी ६ महिने, स्वाती इथापे यांनी सव्वादोन वर्षे तर ए. एस. बन्ने यांनी ३ आणि ७ महिने असे दोनवेळा पूर्णवेळ कारभार पाहिला आहे. 

साताºयातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात दर सोमवारी हजर असतो. जिल्ह्यातील कोणतेही काम पाठीमागे राहणार नाही, याची काळजी घेण्यात येते. आठवड्यातून चार दिवसतरी साताºयात येण्याचा प्रयत्न असतो. शासनाने दिलेली जबाबदारी पार पाडत असून, १०० टक्के न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो.- हरीश डोंगरे,प्रभारी समाज कल्याण अधिकारी (सातारा)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार