शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बहिणीला देत होता त्रास; साताऱ्यात युवकाचा दगडाने ठेचून खून; मृतदेह जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 15:36 IST

Murder CrimeNews Police Satara : बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून एका वीस वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील खंडोबाच्या माळाजवळ उघडकीस आली. विशेष म्हणजे हा खून केवळ दोन तासांत एलसीबीच्या पथकाने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, यातील एकावर दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसाताऱ्यात युवकाचा खून करून मृतदेह जाळला म्हणे, बहिणीला देत होता त्रास; दोन तासांत खुनाचा उलगडा

सातारा : बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून एका वीस वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील खंडोबाच्या माळाजवळ उघडकीस आली. विशेष म्हणजे हा खून केवळ दोन तासांत एलसीबीच्या पथकाने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, यातील एकावर दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.आकाश ऊर्फ रॉजर राजेंद्र शिवदास (२०, रा. रामनगर, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, विक्रांत ऊर्फ मन्या उमेश कांबळे (१९), तेजस नंदकुमार आवळे (१९,) संग्राम बाबू रणपिसे (२८, सर्व रा. रविवार पेठ, सातारा) या तिघांना खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मन्या कांबळे याच्यावर यापूर्वी दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.याबाबत अधिक माहिती अशी, बसस्थानकापासून जवळ असलेल्या खंडोबाचा माळ येथे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह काही नागरिकांना दिसला. सुरुवातीला हा मृतदेह एका मुलीचा असल्याची चर्चा सुरू झाली; परंतु मृतदेहाच्या जागेवरच शवविच्छेदन झाल्यानंतर हा मृतदेह पुरुषाचा असल्याचे अखेर स्पष्ट झाले. नागरिकांकडे चौकशी केल्यानंतर केवळ दोन तासांनंतर पोलिसांनी उलगडा केला.आकाश हा आई-बहिणीवरून शिवीगाळ करत होता. तसेच बहिणीला त्रास देत होता. त्यामुळेच त्याचा मित्रांना सोबत घेऊन काटा काढल्याचे मन्या कांबळे याने पोलिसांना सांगितले. आकाश शिवदास हा मंडईमध्ये भाजी विक्रीचे काम करत होता. तो एकुलता एक होता. खुनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, मदन फाळके, जोतीराम बर्गे, कांतीलाल नवघणे, संयज शिर्के, शरद बेबले, प्रवीण फडतरे, विजय कांबळे, अतीश घाडगे, संतोष पवार यांनी केली.असा रचला कट!आकाश हा रविवार पेठेतील भाजी मंडईत भाजी विक्री करतो. सोमवारी रात्री तो मंडईतून घरी जात असताना तिघा संशयितांनी त्याला अडवून गप्पांमध्ये गुंतवले. रात्र झाल्यानंतर त्याला पाण्याच्या बाटलीतून गुंगीचे औषध दिले. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह खंडोबाचा माळ परिसरातील निर्जन ठिकाणी जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर