शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

सातारा : वॉटर कपची किमया; टँकरमुक्त गाव झाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 16:16 IST

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांत पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जलसाठे वाढून अनेक गावांचे पाणी टँकर बंद झाले आहेत. तर माण तालुक्यातील जवळपास १५ गावे ही वॉटर कपमधील सहभागामुळे सध्यस्थितीत टँकरमुक्त झाली आहेत. त्याचप्रमाणे खटाव आणि ...

ठळक मुद्देदुष्काळी तालुक्यातील चित्र माणमधील १५ गावांना फायदाखटाव अन् कोरेगावमधीलही गावे वाटेवर

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांत पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जलसाठे वाढून अनेक गावांचे पाणी टँकर बंद झाले आहेत. तर माण तालुक्यातील जवळपास १५ गावे ही वॉटर कपमधील सहभागामुळे सध्यस्थितीत टँकरमुक्त झाली आहेत. त्याचप्रमाणे खटाव आणि कोरेगाव तालुक्यातीलही काही गावे टँकरमुक्तीच्या वाटेवर आहेत.राज्यात तीन वर्षांपासून अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सातारा, बीड आणि अमरावती हे तीन जिल्हे या स्पर्धेत सहभागी होते. यामध्ये सातारा जिल्ह्यानेच अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला होता.

कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने हा क्रमांक पटकावला होता. दुसऱ्या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३० तालुक्यांतील सुमारे १२०० हून अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सातारा जिल्ह्याने दुसऱ्या वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला.

जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. त्यामध्ये अधिक करून माण तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग होता. जवळपास या सर्वच गावांमध्ये जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू असून, यावर्षीही सातारा जिल्ह्यातील २०० च्यावर दुष्काळी गावांचा सहभाग राहणार आहे.गेल्या तीन वर्षांपासून सुरू असणाऱ्या या स्पर्धेचा फायदा असा झाला की दुष्काळी तालुक्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. उन्हाळ्यातील पिकांसाठीही उपलब्ध पाण्याचा वापर करता येत आहे. माण तालुक्यात तर वॉटर कप स्पर्धेंतर्गत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जवळपास १५ गावांना यावर्षी टँकर सुरू करायला लागणार नाहीत.

शिरवली, सत्रेवाडी, बिदाल, परकंदी, परतवडी, सुरुपखानवाडी, पिंगळी खुर्द, वाकी, जाशी, थदाळे, कारखेल, मोगराळे, अनभुलेवाडी आदी गावांचा त्यामध्ये समावेश आहे. यामधील कारखेल गावाला तर दरवर्षी डिसेंबर महिन्यातच पाण्यासाठी टँकर सुरू करायला लागायचा.

लोकांना पाण्यासाठी भटकंती करायला लागायची. पण, यावर्षी तेथील चित्र बदलले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी असणारी विहीर सध्यस्थितीत भरलेली दिसून येत आहे. तर पाणी असल्याने उन्हाळी पिकेही शेतकऱ्यांनी घेतली आहेत. अशाचप्रकारे खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील गावे टँकरमुक्त होत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा