शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सातारा : वॉटर कपची किमया; टँकरमुक्त गाव झाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 16:16 IST

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांत पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जलसाठे वाढून अनेक गावांचे पाणी टँकर बंद झाले आहेत. तर माण तालुक्यातील जवळपास १५ गावे ही वॉटर कपमधील सहभागामुळे सध्यस्थितीत टँकरमुक्त झाली आहेत. त्याचप्रमाणे खटाव आणि ...

ठळक मुद्देदुष्काळी तालुक्यातील चित्र माणमधील १५ गावांना फायदाखटाव अन् कोरेगावमधीलही गावे वाटेवर

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांत पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जलसाठे वाढून अनेक गावांचे पाणी टँकर बंद झाले आहेत. तर माण तालुक्यातील जवळपास १५ गावे ही वॉटर कपमधील सहभागामुळे सध्यस्थितीत टँकरमुक्त झाली आहेत. त्याचप्रमाणे खटाव आणि कोरेगाव तालुक्यातीलही काही गावे टँकरमुक्तीच्या वाटेवर आहेत.राज्यात तीन वर्षांपासून अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सातारा, बीड आणि अमरावती हे तीन जिल्हे या स्पर्धेत सहभागी होते. यामध्ये सातारा जिल्ह्यानेच अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला होता.

कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने हा क्रमांक पटकावला होता. दुसऱ्या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३० तालुक्यांतील सुमारे १२०० हून अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सातारा जिल्ह्याने दुसऱ्या वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला.

जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. त्यामध्ये अधिक करून माण तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग होता. जवळपास या सर्वच गावांमध्ये जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू असून, यावर्षीही सातारा जिल्ह्यातील २०० च्यावर दुष्काळी गावांचा सहभाग राहणार आहे.गेल्या तीन वर्षांपासून सुरू असणाऱ्या या स्पर्धेचा फायदा असा झाला की दुष्काळी तालुक्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. उन्हाळ्यातील पिकांसाठीही उपलब्ध पाण्याचा वापर करता येत आहे. माण तालुक्यात तर वॉटर कप स्पर्धेंतर्गत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जवळपास १५ गावांना यावर्षी टँकर सुरू करायला लागणार नाहीत.

शिरवली, सत्रेवाडी, बिदाल, परकंदी, परतवडी, सुरुपखानवाडी, पिंगळी खुर्द, वाकी, जाशी, थदाळे, कारखेल, मोगराळे, अनभुलेवाडी आदी गावांचा त्यामध्ये समावेश आहे. यामधील कारखेल गावाला तर दरवर्षी डिसेंबर महिन्यातच पाण्यासाठी टँकर सुरू करायला लागायचा.

लोकांना पाण्यासाठी भटकंती करायला लागायची. पण, यावर्षी तेथील चित्र बदलले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी असणारी विहीर सध्यस्थितीत भरलेली दिसून येत आहे. तर पाणी असल्याने उन्हाळी पिकेही शेतकऱ्यांनी घेतली आहेत. अशाचप्रकारे खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील गावे टँकरमुक्त होत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा