शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Satara: "ईडीच्या भीतीनं पक्षांतराचं माॅडेल चालणार नाही; महायुतीचा विधानसभेला पराभव निश्चित", पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनावले

By नितीन काळेल | Updated: July 22, 2024 19:42 IST

Prithviraj Chavan Criticize BJP: आतापर्यंत भाजपने इडीच्या कारवाया केल्या. पण, एकाचाही निकाल लागलेला नाही. यापुढे ईडीची भीती दाखवून पक्षांतर करायला लावायचं माॅडेल चालणार नाही. विधानसभेला महायुतीचा पराभव निश्चीत आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

- नितीन काळेल सातारा - भाजपच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठोकाठोकीची भाषा करतात. असे वक्तव्य त्यांना शोभणारे नाही. त्यांना याबद्दल काही वाटत असेल तर राजीनामा द्यावा. त्याचबरोबर आतापर्यंत भाजपने इडीच्या कारवाया केल्या. पण, एकाचाही निकाल लागलेला नाही. यापुढे ईडीची भीती दाखवून पक्षांतर करायला लावायचं माॅडेल चालणार नाही. विधानसभेला महायुतीचा पराभव निश्चीत आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, उदयसिंह पाटील, मनोहर शिंदे, निवास थोरात, अन्वर पाशाखान आदी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. कारण, देशभरात वर्षात जेवढ्या शेतकरी आणि मजुरांच्या आत्महत्या होतात. त्यातील ३७ ते ३८ टक्के आत्महत्या या महाराष्ट्रातील असून मागील तीन वर्षात ते दिसूनही आले आहे. यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात राज्यात १२६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. यामध्ये अमरावती विभाग पुढे आहे. हे राज्यासाठी भूषणावह नाही. केंद्र शासनानेही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. दरडोई उत्पन्नातही महाराष्ट्र देशात १४-१५ व्या क्रमांकावर घसरलाय.

आयएएस प्रशिक्षणाऱ्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी प्रमाणपत्रे दिली. याबाबत दिल्लीतही गुन्हा नोंद झाला आहे. खरेतर केंद्र शासनाच्या डीओपीटी मंत्रालया अंतर्गत युपीएसी काम करते. या मंत्रालयाचे मंत्रीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. खेडकर प्रकरणात त्यांची जबाबदारी काहीच नाही का असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, युपीएससीच्या अध्यक्षांनीही राजीनामा दिलाय. ते गुजरातमधीलच आहेत. आणखी सहा वर्षे त्यांचा कार्यकाल असताना त्यांनी राजीनामा का दिला. पूजा खेडकर प्रकरणात ते जबाबदारी टाळणार का हा प्रश्न आहे. सरकारचाच हा गलथान कारभार आहे. याची सीबीआय चाैकशीच झाली पाहिजे. कारण, महाराष्ट्रात आज हजारो विद्याऱ्थी युपीएससीला बसतात. आई-वडिल जमिनी आणि दागिने गहान ठेवतात. त्यांच्या भवितव्याशी हा खेळच आहे.

महायुतीचा पराभव होईल असे उमेदवार देऊ; पाटणला आघाडीचा विजयपत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, आघाडीत विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत थोडी चर्चा झाली आहे. पण, महायुतीचा पराभव होईल या निकषावर आघाडी उमेदवार देईल. या निवडणुकीत महायुतीचा पराभव ठरलेला आहे. तसेच त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातही आघाडीचा विजय होईल, असा दावाही केला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMahayutiमहायुतीSatara areaसातारा परिसर