शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

सातारा : एका दिवसात ४० लाखांची वसुली, लोकअदालतीचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:52 PM

सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली.

ठळक मुद्देएका दिवसात ४० लाखांची वसुली, लोकअदालतीचा फायदा सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टी, पाणीपट्टी वसुली मोहीम

सागर गुजर

सातारा : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली.घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्याबाबत जिल्ह्यातील ६२५ ग्रामपंचायतींच्या ५३ हजार ९८८ खातेदारांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर ९ हजार ६३७ खातेदारांनी स्वत:हून पुढाकार घेत थकीत बिले भरली. नोटीस काळात २५ कोटी ९० लाखांची वसुली झाली.जिल्ह्यातील ५८८ ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने लोकअदालतीचे आयोजन केले होते. या लोकअदालतीबाबत जिल्ह्यातील ५३ हजार ९८८ खातेदारांना नोटीस बजावण्यात आली होती. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या लोकअदालतीत ३२६ ग्रामपंचायतींच्या १ हजार ७२७ खातेदारांनी सहभाग घेतला. या लोकअदालतीमध्ये सातारा तालुक्यातील ६२ ग्रामपंयतीच्या ४२१ खातेदारांकडून १० लाख ३० हजार २७७ रुपयांची वसुली झाली.

कोरेगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ३९० खातेदारांकडून ७ लाख २३ हजार ९१० रुपये, खटावातील १६ ग्रामपंचायतीच्या ८३ खातेदारांकडून २ लाख ९१ हजार ५८४ रुपये, माणमधील १२ ग्रामपंचायतीच्या ६२ खातेदारांकडून ४७ हजार ५३४ रुपये, फलटणमधील ४९ ग्रामपंचायतीच्या १५९ खातेदारांकडून ३ लाख ११ हजार ७०० रुपये, खंडाळ्यातील १८ ग्रामपंचायतीच्या ५८ खातेदारांकडून १ लाख ७४ हजार ४२९ रुपये, वाईमधील ४६ ग्रामपंचायतीच्या ८२ खातेदारांकडून ३ लाख ४१ हजार ९५० रुपये, जावळीतील १४ ग्रामपंचायतींच्या ४२ खातेदारांकडून ७६ हजार ९६५ रुपये, महाबळेश्वरमधील ७ ग्रामपंचायतींच्या २६ खातेदारांकडून ५४ हजार ८६६ रुपये, कऱ्हाडातील ६५ ग्रामपंचायतींमधील २२० खातेदारांकडून ५ लाख ७६ हजार ९५७ रुपये, पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या १८४ खातेदारांकडून ३ लाख ८३ हजार ७३३ रुपयांची वसुली झाली.आठ दिवसांत तीन कोटींची वसुलीजिल्ह्यातील ५८८ ग्रामपंचायतीच्या ११ हजार ३६४ खातेदारांना वसुलीबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत २ कोटी ९० लाख १३ हजार ९९३ रुपयांची वसुली झाली.सातारा महाराष्ट्रात दुसरासातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक आला आहे. थकीत पाणीपट्टी व स्ट्रिटलाईट वीजबिलाच्या वसुलीमध्ये सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आला आहे. पुणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे. महाराष्ट्र स्टेट लिगल सर्व्हिसेस आॅथॅरिटी, मुंबई यांनी याची घोषणा केली आहे.

लोकअदालतीमध्ये थकीत कर वसुलीचे दावे निकाली निघत आहेत, ही अत्यंत जमेची बाजू आहे. यामध्ये संबंधित ग्रामपंचायती व त्यांचे खातेदार यांच्यात सामोपचाराने समेट घडवला जातो. थकीत कर वसुलीचा फायदा ग्रामपंचायतहद्दीतील विकासकामांसाठीच होत असतो. लोकांनी थकबाकीच ठेवली नाही तर लोकअदालतीपर्यंत जाण्याचीही वेळ येणार नाही.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ग्रामपंचायतींच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी लोकांनी सहकार्य करणे आवश्यकआहे. लोकअदालतीत जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेतलीपाहिजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांसाठीच कर वसुलीवेळेत भरणे आवश्यक आहे.- अविनाश फडतरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर