शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

सातारा : पाचवड-पाचगणी मार्ग खचला, वाहतूक धोकादायक, पावसाची संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 15:07 IST

जावळीत पावसाची संततधार गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असल्यामुळे मंगळवारी पाचवड-पाचगणी या मुख्य रस्त्याला आखाडे गावाजवळ रस्ता खचला असून, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली आहे.

ठळक मुद्दे पाचवड-पाचगणी मार्ग खचला वाहतूक धोकादायक, पावसाची संततधार सुरूच

सायगाव : जावळीत पावसाची संततधार गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असल्यामुळे मंगळवारी पाचवड-पाचगणी या मुख्य रस्त्याला आखाडे गावाजवळ रस्ता खचला असून, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली आहे.

या ठिकाणी तीव्र उतार असून, यापूर्वीच याठिकाणी रस्ता खचला होता. याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर अतिपावसात हा रस्ता एका बाजूने पूर्ण खचला गेला आहे. याला केवळ बांधकाम विभागच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून जावळीत पावसाने उघडीप न दिल्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने दोन दिवस मुसळधार झालेल्या पावसाने मानकरवाडी येथील सखाराम जाधव यांच्या राहत्या घराची भिंत पडून नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जाधव यांच्या घराचे मोठे नुकसान झाले.

या मुसळधार पावसाचा फटका सायगाव, केळघर, कुडाळ, मेढा, बामणोली परिसराला बसला असून, मोठमोठे ओढे, नाले भरून वाहू लागल्याने ओढ्यांमधील पाणी शेतात घुसून शेतकºयांच्या शेतीपिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

मंगळवारी सकाळी पाचवड-पाचगणी या मुख्यरस्ता आखाडे गावाजवळ एका बाजूने पूर्ण खचला गेल्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. पर्यटनस्थळ पाचगणीकडे जाणारा हा मुख्य रस्ता असूनदेखील केवळ बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच हा रस्ता खचला गेला आहे. यापूर्वीच बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती केली असती तर हा रस्ता खचला गेला नसता.

परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच बांधकाम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती, तरीदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर या रस्त्यावर हजारो खड्डे देखील पडले आहेतत्यातच आखाडेजवळ रस्ता खचल्याने या रस्त्यावरून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर