शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

सातारा : मान्सूनचा नुसताच वारा; पावसावरच भरवसा सारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 2:05 PM

सातारा जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली असलीतरी गेल्या दोन दिवसांपासून नुसताच भिरभिर वारा वाहत असल्याने पावसाचे ढग दूर राहिले आहेत. त्यामुळे पहिल्या झालेल्या पावसावर पेरणी करायची का नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी आहेत. तर जमिनीत पुरेशी ओल नसल्याने काही ठिकाणची पेरणी रखडणार असून, पश्चिम भागात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली आहे.

ठळक मुद्देमान्सूनचा नुसताच वारा; पावसावरच भरवसा सारा !शेतकऱ्यांत चिंतेचे ढग दाटून : पेरणी रखडणार; पश्चिम भागातही विश्रांती

सातारा : जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली असलीतरी गेल्या दोन दिवसांपासून नुसताच भिरभिर वारा वाहत असल्याने पावसाचे ढग दूर राहिले आहेत. त्यामुळे पहिल्या झालेल्या पावसावर पेरणी करायची का नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी आहेत. तर जमिनीत पुरेशी ओल नसल्याने काही ठिकाणची पेरणी रखडणार असून, पश्चिम भागात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला वेळेत प्रारंभ झाला असलातरी प्रमुख धरणात सहा दिवसानंतरही पाण्याची आवक सुरू झालेली नाही. तसेच धरण क्षेत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाला असलातरी पुन्हा त्याचे प्रमाण कमी होत आले आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात २४ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर बुधवारी सकाळपर्यंत ११ मिलिमीटर पाऊस झालेला. याचाच अर्थ धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे.

याला कारण म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत वाहत असणारा भिरभिर वारा. यामुळे मान्सूनचे ढग कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असले तरी एक बाब महत्त्वाची ठरली आहे ती गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील प्रमुख धरणात अधिक पाणीसाठा आहे. कोयना धरणात तर गतवर्षीपेक्षा दहा टीएमसी साठा अधिक असून, धोम आणि कण्हेरमध्येही पाणीपातळी चांगली आहे.पावसाचे असे सतत भिरभिरणे सुरू असताना दुष्काळी पूर्व भागात मात्र चिंतेचे ढग दाटून आले आहेत. माण, फलटण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांत वळवाचा एखादा आणि मान्सूनचा कोठेतरी झालेला पाऊस यावर शेतकरी पेरणी करण्यास धजावणार नाहीत.

सध्या बाजारात बी-बियाणे उपलब्ध झालेले आहेत. पुरेसा पाऊस नसल्याने बियांची खरेदी करावी का नको, या चिंतेत शेतकरी आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMonsoon Specialमानसून स्पेशल