शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सातारा :हमरस्ता नव्हे ... ही तर शेतातली पायवाट, रांजणी पाटी-पळशी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:56 IST

माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून रस्ता खराब झाला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय तर चालणेही अवघड झाले आहे.

ठळक मुद्दे२८ वर्षांचा वनवास संपविण्याची ग्रामस्थांची मागणीरांजणी पाटी-पळशी रस्त्याची दुरवस्था रात्रीच्या वेळी घडतात अपघात, विद्यार्थी संख्या घटली

पळशी : माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून रस्ता खराब झाला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय तर चालणेही अवघड झाले आहे. गेल्या २८ वर्षांपासून रस्त्याची अवस्था जैसे थे असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.वाहनचालकांनी काही ठिकाणी रस्त्यालगतच्या मोकळ्या शेतातूनच रहदारी सुरू केली आहे. परिणामी शेतकरी व वाहनचालक यांच्यामध्ये नेहमीच शाब्दिक चकमकी उडताना दिसत आहेत. जवळपास गेल्या २८ वर्षांपासून रस्त्याची अवस्था जैसे थे असून, आता तरी हा वनवास संपणार का? असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे.

पळशी-रांजणीपाटी हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या रस्त्यावर कधीच डांबर पडले नाही. जवळपास १९७७ च्या सुमारास हा रस्ता तयार करण्यात आला होता.त्यानंतर या रस्त्यावर ना कधी डांबर पडले, ना रस्त्याची कधी दुरुस्ती करण्यात आली, असे ग्रामस्थ सांगत आहेत.

या परिसरासह रांजणी, भालवडी, पुजारमळा, बागेचा मळा येथून दर पोर्णिमेला गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर जात असतात. गोंदवले येथे जाण्यासाठी हाच नजीकचा मार्ग असून, रस्त्याची दुर्दशा झाल्याने भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पळशी येथे शिक्षणासाठीही विद्यार्थी याच रस्त्याने जातात. विद्यार्थ्यांनाही रोज याच रस्त्याच्या जाचातून जावे लागत आहे. तरी संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.रात्रीच्या वेळी घडतात अपघातरांजणीपाटी-पळशी रस्त्यावरील खड्ड्यात पावसाळ्यामध्ये पाणी साठून राहिल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या मार्गावर नेहमीच लहान-मोठे अपघात घडत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

विद्यार्थी संख्या घटलीपळशी येथे पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे आणि या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. पूर्वी या परिसरातून विद्यार्थ्यांचा लोंढाच्या लोंढा पळशी शाळेत जात होता. याच शाळांमधून शिक्षण घेऊन पळशीत शेकडो अधिकारी तयार झाले; पण रस्त्याच्या दुर्दशेमुळे माळीखोरा येथील विद्यार्थी दुसऱ्या गावात मार्डी येथे शिक्षणासाठी जात आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा