शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

Satara Flood : 'अंधाऱ्या रात्रीत मी माझेच मरण शोधत होते!', ७४ वर्षांच्या आजींचा २४ तास मृत्यूशी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 19:18 IST

Satara Flood : मिरगाव येथे गुरुवारी (२२ जुलै) रात्री भूस्खलन झाले. या घटनेत सरजाबाई बाकडे यांच्या घरावरती डोंगर कोसळून मातीचे ढिगारे पडले होते. या घटनेत घटनेवेळी गावात वीजही नव्हती. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत होता.

- प्रमोद सुकरे

कराड : अंधाऱ्या रात्रीत मी माझ्या नातवंडांना व सुनेला शोधत होते, पण माझे मलाच मरण दिसत होते. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी वाचले अशा भावना २४ तास चिखलात अडकलेल्या सरजाबाई बाकडे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या. पाटण तालुक्यातील मिरगाव येथे भूस्खलन झाल्यानंतर २४ तासांनी मातीचा ढिगाराखालून बाहेर काढलेल्या आजी सरजाबाई बाकडे या वाचलेल्या आहेत. त्यांना सध्या कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

मिरगाव येथे गुरुवारी (२२ जुलै) रात्री भूस्खलन झाले. या घटनेत सरजाबाई बाकडे यांच्या घरावरती डोंगर कोसळून मातीचे ढिगारे पडले होते. या घटनेत घटनेवेळी गावात वीजही नव्हती. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत होता. अशावेळी डोंगर कोसळत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांची विधवा सून सुमन लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडली, पण आजी आतच अडकल्या होत्या.

शुक्रवारी याबाबत प्रशासनाने शोधमोहीम राबविली. त्यावेळी सुमारे ४ फुट चिखलात आजीबाई अडकल्या होत्या. मदत कार्य करणाऱ्या लोकांनी त्यांना बाहेर काढले. त्यामुळे सरजाबाई आपला पुनर्जन्मच झाल्याचे मानतात.आजही सरजाबाई या भेदरलेल्या दिसतात. फार कोणाशी बोलत नाहीत. सून व नातवंडांना भेटून आपल्या जिवात जीव आल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी दाटल्याचे दिसले.

मी माझा मुलगा व्यंकटेश व मुलगी अनुष्का तसेच नणंद व तिचा मुलगा जीव मुठीत घेऊन अंधाऱ्या रात्री बाहेर पडलो. बाहेर मुसळधार पाऊस होता. पायात चप्पल नव्हते. अंग थरथरत होते. अशा परिस्थितीत गावातीलच मंदिरात पोहोचलो. सासू सरजाबाई यांच्या वाचण्याची आशा आम्ही सोडून दिली होती. मात्र देवानेच त्यांना वाचविले.- सुमन बाकाडे

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसर