शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरपंच निवडी की पुन्हा सोडत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींमधील सरपंच निवडीला न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींमधील सरपंच निवडीला न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आता याचिका दाखल असलेली गावे वगळून इतर गावांत सरपंच निवडी घ्यायच्या की सर्वच ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा सोडत घ्यायची, याबाबत प्रशासनापुढे पेच असून लोकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण आहे.

जिल्ह्यामध्ये नुकत्याच १४९५ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत झाली होती. अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाने योग्य पद्धतीने आरक्षण सोडती केल्याने तक्रारी नव्हत्या. मात्र, काही ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडतीवरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. कोरेगाव तालुक्यातील कटापूर, माण तालुक्यातील पिंगळी बुद्रूक आणि खटाव तालुक्यातील सातेवाडी या ग्रामपंचायतींमधील याचिकांच्या अनुषंगाने याचिकाकर्त्यांतर्फे जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे.

अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी जे आरक्षण देण्यात आले आहे, त्या प्रवर्गातील उमेदवार निवडूनच आलेला नाही. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती प्रवर्गातून पुरुष उमेदवार निवडून आला असला तरी त्या ठिकाणी त्याच प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण पडले आहे. प्रशासनाच्या या त्रुटींविरोधात अनेक जण उच्च न्यायालयात गेले आहेत. अनेकांनी याचिका दाखल केल्या असल्या तरी मोजक्याच याचिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार याचिका दाखल झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी न करण्याबाबतचे आदेश आहेत. आता या ग्रामपंचायती वगळून इतर निवडी करायच्या झाल्या तर ठरलेल्या कार्यक्रमानुसार म्हणजे ८, ९, १0 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सरपंच निवडीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. संबंधित तालुक्यांमध्ये तहसीलदारांनी निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या सभेसाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यादेखील केलेल्या आहेत. आता सर्वांनाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा लागलेली आहे. शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी असली तरीदेखील प्रशासनाला सुट्टीतच याबाबतचा निर्णय घेऊन तो सर्व गावांपर्यंत पोहोचवावा लागणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडीबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे. प्रत्येक गावात सरपंच निवडीवरूनच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.

चौकट..

नियमांमुळे पेचप्रसंग...

ग्रामपंचायत अधिनियमातील गुंतागुंतीमुळे ग्रामपंचायत सदस्यांची आरक्षण सोडत आणि सरपंच सोडत यामध्ये गुंतागुंत वाढलेली आहे. अनेक ठिकाणी जी आरक्षणे आहेत, त्यातील सरपंच निवडीचे आरक्षणच पडलेले नसल्याने पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. ग्रामपंचायतींचे कामकाज चालते ग्रामविकास खात्यातर्फे तर निवडणुका घेतल्या जातात महसूल प्रशासनाच्या वतीने. यात बदल करायला हवा, अशी अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य व्यक्त करत आहेत.