शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पाउस पडला; कोयनेतून सांगलीचे पाणी बंद; मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम 

By नितीन काळेल | Updated: September 27, 2023 18:49 IST

सातारा : सांगली जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणातून होणार पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेत साठा वाढू ...

सातारा : सांगली जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणातून होणार पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेत साठा वाढू लागला असून सकाळच्या सुमारास ९२ टीएमसीवर पोहोचला होता. तर सातारा जिल्ह्यात परतीचा पाउस पडत असलातरी पूर्व भागात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरीही आतापर्यंत सरासरीच्या ६० टक्क्यांच्या आसपासच पाउस पडला आहे. त्यातील दोन महिने हे कमी पावसाचे राहिले. फक्त जुलृ महिन्यातच चांगला पाउस झालेला. त्यामुळे पश्चिम भागातील धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयनासारख्या प्रमुख पाणी प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला होता. मात्र, आंगस्ट आणि सप्टेंबर महिन्याने निराशा केली. या दोन महिन्यात कमीच पर्जन्यमान झाले.आतातर पावसाळा संपत आला आहे. तरीही पाउस कमी असल्याने चिंता वाढलेली आहे.बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगरला ५ आणि नवजाला ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला १६ मिलीमीटर पाउस पडला आहे. त्याचबरोबर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३९२२, नवजा ५५४९ आणि महाबळेश्वरला ५३४३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर बुधवारी सकाळच्या सुमारास काेयनेत ३९७५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणात ९२.३८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. हे प्रमाण ८७.७७ टक्के इतके झाले आहे. तर धरण भरण्यासाठी अजून १३ टीएमसी पाण्याची गरज आहे.

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक धरणांतून पाणी विसर्ग करण्यात येत आहे. तर सध्या परतीचा पाउस सुरू असलातरी पश्चिम भागात प्रमाण कमी आहे. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी तालुक्यात पाउस पडत आहे. पण, मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अजुनही ओढ्यांना पाणी नाही. बंधारे भरलेले नाहीत. परतीचा पाउस चांगला झाल्यास रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.

सांगलीला दोनवेळा सोडले पाणी...कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. आतापर्यंत दोनवेळा सांगलीसाठी कोयनेतून विसर्ग करण्यात आलेला. पाच दिवसांपूर्वी सांगलीसाठी कोयनेतून सुरुवातीला १०५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर मागणी वाढल्याने आणखी विसर्ग वाढवून २१०० क्यूसेक करण्यात आला. पण, गेल्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यात पाउस झाल्याने मंगळवारी रात्रीपासून सांगलीचा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीKoyana Damकोयना धरणSangliसांगली