शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पाउस पडला; कोयनेतून सांगलीचे पाणी बंद; मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम 

By नितीन काळेल | Updated: September 27, 2023 18:49 IST

सातारा : सांगली जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणातून होणार पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेत साठा वाढू ...

सातारा : सांगली जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणातून होणार पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेत साठा वाढू लागला असून सकाळच्या सुमारास ९२ टीएमसीवर पोहोचला होता. तर सातारा जिल्ह्यात परतीचा पाउस पडत असलातरी पूर्व भागात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरीही आतापर्यंत सरासरीच्या ६० टक्क्यांच्या आसपासच पाउस पडला आहे. त्यातील दोन महिने हे कमी पावसाचे राहिले. फक्त जुलृ महिन्यातच चांगला पाउस झालेला. त्यामुळे पश्चिम भागातील धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयनासारख्या प्रमुख पाणी प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला होता. मात्र, आंगस्ट आणि सप्टेंबर महिन्याने निराशा केली. या दोन महिन्यात कमीच पर्जन्यमान झाले.आतातर पावसाळा संपत आला आहे. तरीही पाउस कमी असल्याने चिंता वाढलेली आहे.बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगरला ५ आणि नवजाला ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला १६ मिलीमीटर पाउस पडला आहे. त्याचबरोबर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३९२२, नवजा ५५४९ आणि महाबळेश्वरला ५३४३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर बुधवारी सकाळच्या सुमारास काेयनेत ३९७५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणात ९२.३८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. हे प्रमाण ८७.७७ टक्के इतके झाले आहे. तर धरण भरण्यासाठी अजून १३ टीएमसी पाण्याची गरज आहे.

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक धरणांतून पाणी विसर्ग करण्यात येत आहे. तर सध्या परतीचा पाउस सुरू असलातरी पश्चिम भागात प्रमाण कमी आहे. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी तालुक्यात पाउस पडत आहे. पण, मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अजुनही ओढ्यांना पाणी नाही. बंधारे भरलेले नाहीत. परतीचा पाउस चांगला झाल्यास रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.

सांगलीला दोनवेळा सोडले पाणी...कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. आतापर्यंत दोनवेळा सांगलीसाठी कोयनेतून विसर्ग करण्यात आलेला. पाच दिवसांपूर्वी सांगलीसाठी कोयनेतून सुरुवातीला १०५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर मागणी वाढल्याने आणखी विसर्ग वाढवून २१०० क्यूसेक करण्यात आला. पण, गेल्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यात पाउस झाल्याने मंगळवारी रात्रीपासून सांगलीचा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीKoyana Damकोयना धरणSangliसांगली