शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

परतीच्या पावसाने ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचा हिरावला घास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 05:17 IST

Farmer News : राज्यात यंदा सरासरीच्या ११४ टक्के अधिक म्हणजे १०४७.८ मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षी त्याचे प्रमाण ११८ टक्के होते. २५ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला

- दीपक शिंदे  सातारा : राज्यात या वर्षी चांगला पाऊस झाला असला तरी ऑक्टोबरमध्ये परतताना त्याने २६ जिल्ह्यांतील आठ लाख ९५ हजार ७४ हेक्टर क्षेत्रावरील शेतातील काढणीला आलेली पिके धुऊन नेली. यामध्ये भात, सोयाबीन, कापूस, ऊस, मका, उडीद, केळी आणि भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. त्यामुळे पावसाने एका हाताने भरभरून दिले, तर दुसऱ्या हाताने सगळे हिसकावून नेले, अशी स्थिती झाली आहे.राज्यात यंदा सरासरीच्या ११४ टक्के अधिक म्हणजे १०४७.८ मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षी त्याचे प्रमाण ११८ टक्के होते. २५ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला असून, आठ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के तर एका जिल्ह्यातच फक्त ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे पिकांची परिस्थिती चांगली होती. खरीपात सर्वाधिक उत्पादन अमरावती विभागात घेण्यात आले असून, ते ३२. ५० टक्के हेक्टरवर आहे. त्यानंतर लातूर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि कोकण या विभागांचा क्रमांक लागतो. भात पीक वगळता ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्यांच्या क्षेत्रामध्ये १ टक्क्यांनी घट झाली आहे. तर मूग, उडीद, रागी या कडधान्याच्या क्षेत्रामध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याबरोबरच भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन यांचे क्षेत्र वाढले असून, कारळ आणि इतर गळीत क्षेत्र मात्र कमी झाले आहे. कापसाच्या क्षेत्रातदेखील तीन टक्क्यांनी घट झाली असून, उसाचे क्षेत्र तब्बल ७६ टक्क्यांनी वाढले आहे.

जिल्हानिहाय पावसाची टक्केवारी (कंसात जिल्हे)० ते ३५ टक्के      ०२५ ते ५० टक्के     ०५० ते ७५ टक्के (१)     नंदुरबार७५ ते १०० टक्के (८)    रायगड, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर.१०० टक्के पेक्षा जास्त (२५) ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशीम. नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र