शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

परतीच्या पावसाने ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचा हिरावला घास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 05:17 IST

Farmer News : राज्यात यंदा सरासरीच्या ११४ टक्के अधिक म्हणजे १०४७.८ मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षी त्याचे प्रमाण ११८ टक्के होते. २५ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला

- दीपक शिंदे  सातारा : राज्यात या वर्षी चांगला पाऊस झाला असला तरी ऑक्टोबरमध्ये परतताना त्याने २६ जिल्ह्यांतील आठ लाख ९५ हजार ७४ हेक्टर क्षेत्रावरील शेतातील काढणीला आलेली पिके धुऊन नेली. यामध्ये भात, सोयाबीन, कापूस, ऊस, मका, उडीद, केळी आणि भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. त्यामुळे पावसाने एका हाताने भरभरून दिले, तर दुसऱ्या हाताने सगळे हिसकावून नेले, अशी स्थिती झाली आहे.राज्यात यंदा सरासरीच्या ११४ टक्के अधिक म्हणजे १०४७.८ मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षी त्याचे प्रमाण ११८ टक्के होते. २५ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला असून, आठ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के तर एका जिल्ह्यातच फक्त ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे पिकांची परिस्थिती चांगली होती. खरीपात सर्वाधिक उत्पादन अमरावती विभागात घेण्यात आले असून, ते ३२. ५० टक्के हेक्टरवर आहे. त्यानंतर लातूर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि कोकण या विभागांचा क्रमांक लागतो. भात पीक वगळता ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्यांच्या क्षेत्रामध्ये १ टक्क्यांनी घट झाली आहे. तर मूग, उडीद, रागी या कडधान्याच्या क्षेत्रामध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याबरोबरच भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन यांचे क्षेत्र वाढले असून, कारळ आणि इतर गळीत क्षेत्र मात्र कमी झाले आहे. कापसाच्या क्षेत्रातदेखील तीन टक्क्यांनी घट झाली असून, उसाचे क्षेत्र तब्बल ७६ टक्क्यांनी वाढले आहे.

जिल्हानिहाय पावसाची टक्केवारी (कंसात जिल्हे)० ते ३५ टक्के      ०२५ ते ५० टक्के     ०५० ते ७५ टक्के (१)     नंदुरबार७५ ते १०० टक्के (८)    रायगड, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर.१०० टक्के पेक्षा जास्त (२५) ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशीम. नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र