शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला विश्रांती; पूर्वेला धो-धो बरसला, रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 14:49 IST

माणगंगा, बाणगंगा दुथडी भरून, बाणगंगा धरण ७५ वर्षांत प्रथम मे महिन्यात भरले

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सातारा, महाबळेश्वर, वाई, पाटण तालुक्यात पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून सरी कोसळत होत्या, तर पूर्वेच्या दुष्काळी माण, खटाव, फलटणमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे माणगंगा, बाणगंगा, येरळा नद्या दुथडी भरून वाहात होत्या. त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.दहिवडीवरून कुळकजाईकडे जाणारा रस्ता शिंदी खुर्द येथे बंद होता. तो तात्पुरता तयार करण्यात आला. मात्र, रविवारी तो पुन्हा वाहून गेला. परकंदीतून मलवडीकडे येणारे पूल पाण्याखाली गेले होते, तर माणगंगा नदीतून आंधळीकडे, आंधळीतून दहिवडीकडे येणारे दोन्ही पूल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. माणगंगा नदी दुथडी भरून वाहात होती. आंधळी धरण रविवारी भरले.फलटण तालुक्यात सलग पाचव्या दिवशी पाऊस पडत आहे. त्यामुळे फलटण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साठल्याने फलटण तुंबले होते. पालिकेने नालासफाई व्यवस्थित न केल्याने अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दत्तनगर, मलटन, इंदिरानगर या ठिकाणी अनेक कुटुंबांना रात्र जागून काढावी लागली. घरात पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तूंचे नुकसान झाले. पालखी मार्गावरून पाणी वाहात असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.

बाणगंगा धरण ७५ वर्षांत प्रथम मे महिन्यात भरलेवाठार निंबाळकर : फलटण तालुक्यामध्ये मे महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते ओढ्यांना आलेल्या पुरामुळे बंद झालेले आहेत. बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे उपळवे ते सावंतवाडी हा रस्ता बंद पडला आहे. याच बाणगंगा नदीच्या पुरामुळे कुरवली - माळेवाडी रस्ता बंद झाला आहे. १९५१मध्ये दिवंगत मालोजीराजे नाईक - निंबाळकर यांनी बांधलेल्या बाणगंगा नदीवरील बाणगंगा धरण इतिहासात कधीही मे महिन्यात भरलेले नव्हते. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या सांडव्यावरून बाहेर पडले. पाण्यामुळे बाणगंगा नदीला पूर आला आहे.

फळांचे गाव धुमाळवाडीला फटकाराज्यात घोषित झालेले फळांचे गाव धुमाळवाडी गावात ढगफुटीसदृश पाऊस पडला. ओढ्याला पूर आल्याने गावातील अनेक वाड्यावस्त्यांवर जाण्याचे मार्ग बंद पडले आहेत. संपूर्ण गाव जलमय झाले आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे गावात असलेल्या २१ प्रकारच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फलटण शिखर शिंगणापूर रस्त्यावर सोनवडी गावात ओढ्याला आलेल्या पुरामुळे फलटण शिखर शिंगणापूर रस्ता सकाळपासून वाहतुकीसाठी बंद आहे. आंबा, डाळिंब, द्राक्षे, ऊस यासह फळभाज्या व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावागावात पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसriverनदीWaterपाणी