शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

सांगलीसाठी कोयनेतून पाणी मागणीत वाढ, विसर्ग वाढवला; धरणात किती पाणीसाठा शिल्लक..जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: April 20, 2024 11:29 AM

एक जूनपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार

सातारा : सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी मागणी वाढल्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून विमोचक द्वारमधून आता १२०० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगलीसाठी आता पायथा वीजगृह आणि विमोचक द्वार असा मिळून ३ हजार ३०० क्यूसेकने विसर्ग सुरू झाला आहे. तर धरणात सध्या ४३ टीएमसीच साठा शिल्लक आहे.कोयना धरणाचीपाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. तसेच सिंचन आणि पिण्याच्या पाणी योजनांसाठीही धरणातून विसर्ग केला जातो. यामध्ये सांगली जिल्ह्यातील अधिक करुन सिंचन पाणी योजनांचा समावेश आहे. त्यातच गेल्यावर्षी सातारा जिल्ह्यात अपुरे पर्जन्यमान झाले होते. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे धरण भरले नव्हते. धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. त्यामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाण्याची मागणी होत होती. मागणी आणि तरतुदीनुसार सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. मागील पाच महिन्यांपासून हे पाणी मागणीनुसार सोडले जात आहे.

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजता धरणाच्या विमोचक द्वारमधील विसर्ग ९०० वरुन १२०० क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. तसेच धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यामधूनही २१०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे सध्या सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी ३ हजार ३०० क्यूसेक पाणी विसर्ग होत आहे. हे सर्व कोयना नदीतून पुढे जात आहे.दरम्यान, कोयना धरणात शनिवारी सकाळच्या सुमारास ४२.९३ टीएमसी पाणीसाठा होता. अजुनही धरणात ४०.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एक जूनपर्यंत कोयनेतील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यानंतर नवीन तांत्रिक वर्ष सुरू होते. याचदरम्यान, कोयना धरण विभागातही पावसाला सुरूवात होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी