शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Republic Day: वय अवघे सतरा वर्षे, यशवंतराव चव्हाणांवर प्रतिज्ञापत्रक तयार करण्याची जबाबदारी; २६ जानेवारी १९३०ला कृष्णाकाठी फडकवला होता तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:53 IST

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले, तरी तब्बल १७ वर्षे आधीच लाहोरच्या अधिवेशनात पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला

दीपक देशमुखसातारा : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले, तरी तब्बल १७ वर्षे आधीच लाहोरच्या अधिवेशनात पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. त्यानुसार संपूर्ण देशासह सातारा जिल्ह्यातही तिरंगी ध्वज फडकवून झेंडावंदन करण्यात आले.महात्मा गांधी यांनी ‘यंग इंडिया’ या आपल्या नियतकालिकात हा दिन साजरा करण्याचा आराखडा जाहीर केला होता. त्यानुसार देशभर शांततामय, शिस्तबद्ध पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्धार झाला. झेंडावंदन, स्वातंत्र्याची शपथ, विधायक कार्य असा कार्यक्रम ठरविण्यात आला. याच धर्तीवर कराडमध्येयशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही नियोजन केले होते. २५ जानेवारी १९३० रोजी रात्री व्यापारी हरिभाऊ लाड यांच्या छापखान्यात स्वातंत्र्याची प्रतिज्ञा पत्रिका छापण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते.देशभरही याच दिवशी खेडोपाडी, शहराशहरांत अशाच पद्धतीने स्वातंत्र्याची घोषणा झाली. साताऱ्यातील कृष्णाकाठचा हा प्रतीकात्मक स्वातंत्र्य दिन यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक स्वातंत्र्यवीरांच्या पुढील स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात ठरली. पुढे दरवर्षी २६ जानेवारी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होत राहिला. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला.

ती २६ जानेवारीची पहाट...यशवंतराव चव्हाण यांनी तयार केलेली प्रतिज्ञा २६ जानेवारीच्या सकाळी कृष्णा घाटावर वाचली जाणार होती. पहाटे चार वाजेपर्यंत छपाई पूर्ण करून सकाळी सर्वजण एकत्र जमले. २६ जानेवारी १९३० च्या सकाळी कृष्णाकाठी तिरंगी ध्वज फडकवून झेंडावंदन करण्यात आले. सर्वांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची शपथ घेतली.

अन् यशवंतराव चव्हाण यांच्यावर जबाबदारी..कराडचे भाऊसाहेब बटाणे, हरिभाऊ लाड आदी मंडळींना यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते जाऊन भेटले. त्यावेळी महाराष्ट्र प्रांतिकचे पदाधिकारी असलेले कराडचे सदाशिवराव आळतेकर यांची भेट घेण्यात आली. यावेळी उहापोह होऊन प्रतिज्ञापत्रक तयार करून वाचावे, असे ठरले. हे प्रतिज्ञापत्रक तयार करण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण यांचे वय अवघे सतरा वर्षे होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Republic Day: 17-year-old Chavan drafted pledge, hoisted flag in 1930.

Web Summary : In 1930, pre-independence, 17-year-old Yashwantrao Chavan drafted a pledge for Republic Day celebrations in Karad. He and fellow freedom fighters hoisted the tricolor flag on the banks of the Krishna River, marking a symbolic start to their freedom struggle.