शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना वीजगृहातून विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 2:15 PM

Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पडणाऱ्या पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ६४, नवजा ८१ तर महाबळेश्वरला ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयनेतील साठा ८७ टीएमसीवर असून पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच आहे. तसेच जिल्ह्यातील इतर काही धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना वीजगृहातून विसर्ग सुरूचनवजाला ८१, महाबळेश्वरला ७६ मिलीमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पडणाऱ्या पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ६४, नवजा ८१ तर महाबळेश्वरला ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयनेतील साठा ८७ टीएमसीवर असून पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच आहे. तसेच जिल्ह्यातील इतर काही धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पाऊस झाला. कोयना, नवजा, तापोळा, बामणोली आणि महाबळेश्वर भागात पावसाने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे कोयना धरणासह अन्य प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.

अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील पाणीसाठा ९१ टीएमसीपर्यंत पोहोचला. तर कोयनेतच २४ तासांत १६ टीएमसीवर पाणीसाठा वाढण्याचा विक्रमही झाला होता. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथा वीजगृह आणि सहा दराजातून विसर्ग सुरू करण्यात आला.

सुरुवातीला धरणाचे सर्व सहा दरवाजे दहा फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला. त्यामधून ५० हजार क्यूसेकवर वेगाने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला. तसा विसर्गही टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला.

बुधवारी सकाळच्या सुमारास धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे दरवाजातील विसर्ग बंद झाला आहे. मात्र, पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला. गुरुवारीही वीजगृहातून विसर्ग सुरुच होता.गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास कोयना धरणात ८७.३७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर २२७९४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. गुरूवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६४ मिलीमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ३३४२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला ८१ आणि जूनपासून आतापर्यंत ४२६१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ७६ आणि आतापर्यंत ४३४९ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.धरणांत गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठाधोम धरणातून नदी आणि बोगद्याद्वारे मिळून ६०० क्यूसेकने विसर्ग सुरू होता. बलकवडी धरणातून १७४० तर तारळीतून १८९९ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, कण्हेर, उरमोडी या धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. सध्या धोम, कण्हेर, कोयना, उरमोडी, बलकवडी आणि तारळी या धरणांत गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान