शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पावसाने काढलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं दिवाळं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 6:03 PM

सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी भलतेच पेचात सापडले आहेत. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गाळप योग्य असणारा २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस साठलेल्या पाण्यात तरंगत आहे.

ठळक मुद्देहंगाम लांबण्याची भीती २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस पाण्याखाली

सागर गुजरसातारा : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी भलतेच पेचात सापडले आहेत. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गाळप योग्य असणारा २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस साठलेल्या पाण्यात तरंगत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं दिवाळं काढलं आहे. शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने कारखान्याला ऊस केव्हा जाणार ? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.सातारा जिल्ह्यामध्ये गाळप योग्य उसाचे ८० हजार २१४ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाले आहे. कृषी खात्याने नजरअंदाजे याचे अनुमान काढले आहे. अजून पंचनामे चालू आहेत, त्यामुळे नंतर तोडणीयोग्य झालेल्या उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान लक्षात येणार आहे. उसाच्या आधारावर आर्थिक व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाने काही उसंत दिलेली नाही. ऊस तोडणीची लगबग दोन कारणाने थांबलेली आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, त्यामुळे शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य आहे, दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांना अद्यापही गाळप परवाने मिळाले नाहीत.दरम्यान, जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस गाळप परवाना मिळवण्यासाठी सप्टेंबर महिन्यातच साखर आयुक्तांना प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु मंत्री समितीची बैठकच झाली नसल्याने या प्रस्तावांना मंजुरी मिळालेले नाही. जरी गाळपाचे परवाने मिळाले असते तरी कोसळत्या पावसात शेतामधून कारखान्याला ऊस देणे सोपे नव्हते.

साहजिकच मंत्री समितीची बैठक होऊन जरी परवाने मिळाले असते तरी ऊस वाहतुकीमध्ये किंवा ऊस तोडणीमध्ये पावसाचा व्यत्यय आलाच असता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये यंदा उसाचा हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, असा अंदाज आहे. गतवर्षी उसाची लागवड घटल्याने मार्चअखेरपर्यंत हंगाम संपला. यात वाढ ऊसक्षेत्र असते तर कदाचित जून महिनाही यासाठी लागला असता, असा अंदाज साखर कारखानदार व्यक्त करतात.उसाचा गाळप हंगाम साधारणत: चौदा ते पंधरा महिन्यांपर्यंत चालतो. यंदा मात्र तो १४ ते १७ महिन्यांपर्यंत चालेल, अशी शक्यता आहे. उशिरा पक्व होणाऱ्या उसाला १४ ते १७ महिन्यांत तोडला तरी कुठलाही तोटा नसतो; परंतु १२ ते १५ महिन्यांत परिपक्व होणाऱ्या उसाला तेवढ्याच कालावधीत तोडणे गरजेचे असते, अन्यथा उशिरा तोड झाली तर उसाच्या वजनात घट येते. साखर उत्पादनातही घट येते. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या रिकव्हरीवर प्रतिकूल असा होतो. साहजिकच उशिरा पक्व होणाऱ्या उसाचे चांगले वजन वाढले तर लवकर पक्व होणारा ऊस वजनात घटेल, अशी परिस्थिती आहे.दरम्यान, सातारा जिल्ह्यातील ऊसतोडीसाठी अहमदनगर, मराठवाडा, विदर्भ या भागातून ऊस मजूर येतात. यंदा त्या भागातही उसाचे उत्पादन घटले असल्याने जिल्ह्यातील ऊस कारखान्यांना मजुरांचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या त्यांच्या भागात रब्बीच्या पेरणीमध्ये हे मजूर गुंतलेले आहेत. या पेरण्या संपल्या की मजुरांच्या टोळ्या सातारा जिल्ह्यात दाखल होतील.शेतातल्या वाटांवर चिखलाचे साम्राज्यपावसाने अद्याप उसंत दिलेली नाही. ऊसतोडीची वेळ आली, तरीदेखील पाऊस पडत असल्याने शेतातल्या वाटांवर चिखलाचे साम्राज्य आहे. या परिस्थितीमध्ये शेतातून ऊस बाहेर कसा काढायचा, हाही प्रश्न सतावत आहे. 

ऊस उत्पादक शेतकऱ्याचे आधीच पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ऊस पावसाच्या पाण्यात पडल्याने उसाचे डोळे फुटले. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. आम्ही शेतकऱ्यांचे कुठल्याही परिस्थितीत नुकसान होऊ देणार नाही. सगळ्या उपलब्ध असलेल्या उसाची तोड केली जाणार आहे.- एस. एन. दळवीकार्यकारी संचालक कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्र्रुक, कऱ्हाड 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर