शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने काढलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं दिवाळं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 18:07 IST

सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी भलतेच पेचात सापडले आहेत. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गाळप योग्य असणारा २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस साठलेल्या पाण्यात तरंगत आहे.

ठळक मुद्देहंगाम लांबण्याची भीती २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस पाण्याखाली

सागर गुजरसातारा : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी भलतेच पेचात सापडले आहेत. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गाळप योग्य असणारा २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस साठलेल्या पाण्यात तरंगत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं दिवाळं काढलं आहे. शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने कारखान्याला ऊस केव्हा जाणार ? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.सातारा जिल्ह्यामध्ये गाळप योग्य उसाचे ८० हजार २१४ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाले आहे. कृषी खात्याने नजरअंदाजे याचे अनुमान काढले आहे. अजून पंचनामे चालू आहेत, त्यामुळे नंतर तोडणीयोग्य झालेल्या उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान लक्षात येणार आहे. उसाच्या आधारावर आर्थिक व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाने काही उसंत दिलेली नाही. ऊस तोडणीची लगबग दोन कारणाने थांबलेली आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, त्यामुळे शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य आहे, दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांना अद्यापही गाळप परवाने मिळाले नाहीत.दरम्यान, जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस गाळप परवाना मिळवण्यासाठी सप्टेंबर महिन्यातच साखर आयुक्तांना प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु मंत्री समितीची बैठकच झाली नसल्याने या प्रस्तावांना मंजुरी मिळालेले नाही. जरी गाळपाचे परवाने मिळाले असते तरी कोसळत्या पावसात शेतामधून कारखान्याला ऊस देणे सोपे नव्हते.

साहजिकच मंत्री समितीची बैठक होऊन जरी परवाने मिळाले असते तरी ऊस वाहतुकीमध्ये किंवा ऊस तोडणीमध्ये पावसाचा व्यत्यय आलाच असता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये यंदा उसाचा हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, असा अंदाज आहे. गतवर्षी उसाची लागवड घटल्याने मार्चअखेरपर्यंत हंगाम संपला. यात वाढ ऊसक्षेत्र असते तर कदाचित जून महिनाही यासाठी लागला असता, असा अंदाज साखर कारखानदार व्यक्त करतात.उसाचा गाळप हंगाम साधारणत: चौदा ते पंधरा महिन्यांपर्यंत चालतो. यंदा मात्र तो १४ ते १७ महिन्यांपर्यंत चालेल, अशी शक्यता आहे. उशिरा पक्व होणाऱ्या उसाला १४ ते १७ महिन्यांत तोडला तरी कुठलाही तोटा नसतो; परंतु १२ ते १५ महिन्यांत परिपक्व होणाऱ्या उसाला तेवढ्याच कालावधीत तोडणे गरजेचे असते, अन्यथा उशिरा तोड झाली तर उसाच्या वजनात घट येते. साखर उत्पादनातही घट येते. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या रिकव्हरीवर प्रतिकूल असा होतो. साहजिकच उशिरा पक्व होणाऱ्या उसाचे चांगले वजन वाढले तर लवकर पक्व होणारा ऊस वजनात घटेल, अशी परिस्थिती आहे.दरम्यान, सातारा जिल्ह्यातील ऊसतोडीसाठी अहमदनगर, मराठवाडा, विदर्भ या भागातून ऊस मजूर येतात. यंदा त्या भागातही उसाचे उत्पादन घटले असल्याने जिल्ह्यातील ऊस कारखान्यांना मजुरांचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या त्यांच्या भागात रब्बीच्या पेरणीमध्ये हे मजूर गुंतलेले आहेत. या पेरण्या संपल्या की मजुरांच्या टोळ्या सातारा जिल्ह्यात दाखल होतील.शेतातल्या वाटांवर चिखलाचे साम्राज्यपावसाने अद्याप उसंत दिलेली नाही. ऊसतोडीची वेळ आली, तरीदेखील पाऊस पडत असल्याने शेतातल्या वाटांवर चिखलाचे साम्राज्य आहे. या परिस्थितीमध्ये शेतातून ऊस बाहेर कसा काढायचा, हाही प्रश्न सतावत आहे. 

ऊस उत्पादक शेतकऱ्याचे आधीच पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ऊस पावसाच्या पाण्यात पडल्याने उसाचे डोळे फुटले. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. आम्ही शेतकऱ्यांचे कुठल्याही परिस्थितीत नुकसान होऊ देणार नाही. सगळ्या उपलब्ध असलेल्या उसाची तोड केली जाणार आहे.- एस. एन. दळवीकार्यकारी संचालक कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्र्रुक, कऱ्हाड 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर