शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

पाऊस, फुलांचा वर्षाव स्वागताला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST

सातारा : वरुणराजाने केलेला जलाभिषेक अन् फुलांच्या वर्षावात शुक्रवारी श्रीगणेशाची घरोघरी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनामुळे यंदाही ना ढोल ...

सातारा : वरुणराजाने केलेला जलाभिषेक अन् फुलांच्या वर्षावात शुक्रवारी श्रीगणेशाची घरोघरी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनामुळे यंदाही ना ढोल वाजला ना ताशा कडाडला मात्र गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. गणरायाच्या चरणी लीन होतानाच भाविकांनी ‘हे विघ्नहर्त्या जगावर ओढावलेले कोरोना महामारीचे विघ्न लवकर दूर कर’ असे साकडेही घातले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागूू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे गेल्या दोन वर्षांपासूून सण, उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले. कोरोना संक्रमण कमी होताच निर्बंध देखील शिथिल करण्यात आले. उद्योग, व्यवसाय सुरू झाले. बाजारपेठ खुली करण्यात आली; परंतु उत्सवांवरील निर्बंध अद्यापही कायम ठेवण्यात आले आहेत. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवासाठी देखील जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली. प्रशासनाच्या या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील भक्तांनी यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार केला.

सातारा शहरात शुक्रवारी अत्यंत साधेपणाने मात्र भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. शहरातील कुंभारवाड्यांसोबत ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रीची दुकाने लागली होती. बुकिंग केलेल्या मूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच दुकानांवर गर्दी केली होती. गणरायाच्या स्वागतासाठी यंदा ना ढोल वाजला ना ताशा कडाडला मात्र, साक्षात वरुणराजाने हजेरी लावल्याने भक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कोणी दुचाकीवरून तर कोणी रिक्षात, कोणी चारचाकीत तर कोणी पायी चालत लाडक्या बाप्पाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली.

(चौकट)

बाप्पाने केले विक्रेत्यांचे विघ्न दूर..

कोरोनाचा सर्वात मोठा फटका बाजारपेठेला बसला. जीवनावश्यक वगळता सर्व दुकाने यंदा सलग तीन महिने बंद होती. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. गणेशोत्सवाच्या पूर्वी बाजारपेठ खुली झाली अन् विक्रेते, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी गेल्या दहा दिवसांत भरभरून खरेदी केल्याने व्यापारी, विक्रेत्यांचे चेहरे आनंदाने फुलले.

(चौकट)

‘एक गाव एक गणपती’

पोलीस व जिल्हा प्रशासनाने केलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या आवाहनाला जिल्ह्यातील अनेक गावांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारीचे संकट पाहता अनावश्यक खर्चाला फाटा देत माण, खटाव, फलटण, कराड तालुक्यातील अनेक गावांनी यंदा ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवून सर्वांपुुढे आदर्श ठेवला.

(चौकट)

यंदा ना मंडप ना स्वागत कमानी

जिल्ह्यासह सातारा शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या डामडौलात साजरा केला जातो. आकर्षक मंडप, स्वागत कमानी उभारल्या जातात. जनजागृतीपर देखावे सादर केले जातात. कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली आहे. सातारा शहरातील शेकडो गणेशोत्सव मंडळांनी यंदा ना मंडप उभारला ना स्वागत कमानी. लहान उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशभक्तांनी कोरोनाचे संंकट दूर करण्याचे साकडे बाप्पाला घातले.

फोटो : जावेद खान