शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस, फुलांचा वर्षाव स्वागताला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST

सातारा : वरुणराजाने केलेला जलाभिषेक अन् फुलांच्या वर्षावात शुक्रवारी श्रीगणेशाची घरोघरी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनामुळे यंदाही ना ढोल ...

सातारा : वरुणराजाने केलेला जलाभिषेक अन् फुलांच्या वर्षावात शुक्रवारी श्रीगणेशाची घरोघरी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनामुळे यंदाही ना ढोल वाजला ना ताशा कडाडला मात्र गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. गणरायाच्या चरणी लीन होतानाच भाविकांनी ‘हे विघ्नहर्त्या जगावर ओढावलेले कोरोना महामारीचे विघ्न लवकर दूर कर’ असे साकडेही घातले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागूू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे गेल्या दोन वर्षांपासूून सण, उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले. कोरोना संक्रमण कमी होताच निर्बंध देखील शिथिल करण्यात आले. उद्योग, व्यवसाय सुरू झाले. बाजारपेठ खुली करण्यात आली; परंतु उत्सवांवरील निर्बंध अद्यापही कायम ठेवण्यात आले आहेत. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवासाठी देखील जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली. प्रशासनाच्या या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील भक्तांनी यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार केला.

सातारा शहरात शुक्रवारी अत्यंत साधेपणाने मात्र भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. शहरातील कुंभारवाड्यांसोबत ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रीची दुकाने लागली होती. बुकिंग केलेल्या मूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच दुकानांवर गर्दी केली होती. गणरायाच्या स्वागतासाठी यंदा ना ढोल वाजला ना ताशा कडाडला मात्र, साक्षात वरुणराजाने हजेरी लावल्याने भक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कोणी दुचाकीवरून तर कोणी रिक्षात, कोणी चारचाकीत तर कोणी पायी चालत लाडक्या बाप्पाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली.

(चौकट)

बाप्पाने केले विक्रेत्यांचे विघ्न दूर..

कोरोनाचा सर्वात मोठा फटका बाजारपेठेला बसला. जीवनावश्यक वगळता सर्व दुकाने यंदा सलग तीन महिने बंद होती. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. गणेशोत्सवाच्या पूर्वी बाजारपेठ खुली झाली अन् विक्रेते, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी गेल्या दहा दिवसांत भरभरून खरेदी केल्याने व्यापारी, विक्रेत्यांचे चेहरे आनंदाने फुलले.

(चौकट)

‘एक गाव एक गणपती’

पोलीस व जिल्हा प्रशासनाने केलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या आवाहनाला जिल्ह्यातील अनेक गावांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारीचे संकट पाहता अनावश्यक खर्चाला फाटा देत माण, खटाव, फलटण, कराड तालुक्यातील अनेक गावांनी यंदा ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवून सर्वांपुुढे आदर्श ठेवला.

(चौकट)

यंदा ना मंडप ना स्वागत कमानी

जिल्ह्यासह सातारा शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या डामडौलात साजरा केला जातो. आकर्षक मंडप, स्वागत कमानी उभारल्या जातात. जनजागृतीपर देखावे सादर केले जातात. कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली आहे. सातारा शहरातील शेकडो गणेशोत्सव मंडळांनी यंदा ना मंडप उभारला ना स्वागत कमानी. लहान उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशभक्तांनी कोरोनाचे संंकट दूर करण्याचे साकडे बाप्पाला घातले.

फोटो : जावेद खान