शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

पाऊस, फुलांचा वर्षाव स्वागताला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST

सातारा : वरुणराजाने केलेला जलाभिषेक अन् फुलांच्या वर्षावात शुक्रवारी श्रीगणेशाची घरोघरी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनामुळे यंदाही ना ढोल ...

सातारा : वरुणराजाने केलेला जलाभिषेक अन् फुलांच्या वर्षावात शुक्रवारी श्रीगणेशाची घरोघरी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनामुळे यंदाही ना ढोल वाजला ना ताशा कडाडला मात्र गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. गणरायाच्या चरणी लीन होतानाच भाविकांनी ‘हे विघ्नहर्त्या जगावर ओढावलेले कोरोना महामारीचे विघ्न लवकर दूर कर’ असे साकडेही घातले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागूू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे गेल्या दोन वर्षांपासूून सण, उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले. कोरोना संक्रमण कमी होताच निर्बंध देखील शिथिल करण्यात आले. उद्योग, व्यवसाय सुरू झाले. बाजारपेठ खुली करण्यात आली; परंतु उत्सवांवरील निर्बंध अद्यापही कायम ठेवण्यात आले आहेत. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवासाठी देखील जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली. प्रशासनाच्या या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील भक्तांनी यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार केला.

सातारा शहरात शुक्रवारी अत्यंत साधेपणाने मात्र भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. शहरातील कुंभारवाड्यांसोबत ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रीची दुकाने लागली होती. बुकिंग केलेल्या मूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच दुकानांवर गर्दी केली होती. गणरायाच्या स्वागतासाठी यंदा ना ढोल वाजला ना ताशा कडाडला मात्र, साक्षात वरुणराजाने हजेरी लावल्याने भक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कोणी दुचाकीवरून तर कोणी रिक्षात, कोणी चारचाकीत तर कोणी पायी चालत लाडक्या बाप्पाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली.

(चौकट)

बाप्पाने केले विक्रेत्यांचे विघ्न दूर..

कोरोनाचा सर्वात मोठा फटका बाजारपेठेला बसला. जीवनावश्यक वगळता सर्व दुकाने यंदा सलग तीन महिने बंद होती. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. गणेशोत्सवाच्या पूर्वी बाजारपेठ खुली झाली अन् विक्रेते, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी गेल्या दहा दिवसांत भरभरून खरेदी केल्याने व्यापारी, विक्रेत्यांचे चेहरे आनंदाने फुलले.

(चौकट)

‘एक गाव एक गणपती’

पोलीस व जिल्हा प्रशासनाने केलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या आवाहनाला जिल्ह्यातील अनेक गावांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारीचे संकट पाहता अनावश्यक खर्चाला फाटा देत माण, खटाव, फलटण, कराड तालुक्यातील अनेक गावांनी यंदा ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवून सर्वांपुुढे आदर्श ठेवला.

(चौकट)

यंदा ना मंडप ना स्वागत कमानी

जिल्ह्यासह सातारा शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या डामडौलात साजरा केला जातो. आकर्षक मंडप, स्वागत कमानी उभारल्या जातात. जनजागृतीपर देखावे सादर केले जातात. कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली आहे. सातारा शहरातील शेकडो गणेशोत्सव मंडळांनी यंदा ना मंडप उभारला ना स्वागत कमानी. लहान उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशभक्तांनी कोरोनाचे संंकट दूर करण्याचे साकडे बाप्पाला घातले.

फोटो : जावेद खान