शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

वडूज : ‘केंद्र सरकारकडून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना वागणूक दिली जात आहे, आपल्या हक्कासाठी न्याय ...

वडूज : ‘केंद्र सरकारकडून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना वागणूक दिली जात आहे, आपल्या हक्कासाठी न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, गोळीबार केला जात असेल तर देशात लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे,’ असे प्रतिपादन स्वाभिमानी युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी केले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, राज्याचे प्रवक्ते अनिल पवार, अशोक गोडसे, डॉ. विवेक देशमुख, मानाजी घाडगे, विजय शिंदे, सूर्यकांत भुजबळ, भरत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘गेले ७० दिवस शेतकरी ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता रस्त्यावर बसून कृषी विधेयके माघार घ्यावीत, अशी मागणी करत असताना जवळजवळ १६० शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. तरीही केंद्र सरकारने केलेली कृषी विधेयके शेतकऱ्यांना मान्य नसतील तर ती हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांवर का लादली जात आहेत. केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी देशाच्या शेतकऱ्यांचा बळी दिला जातोय, तर ही लाजिरवाणी बाब आहे.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलन जाहीर केले. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात केंद्र सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून वडूज येथे केंद्र सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत एक तासाचा लाक्षणिक रास्ता रोको केला. या आंदोलनात महेश गुरव, जाकीर पठाण, परेश जाधव, डॉ. संतोष गोडसे, अमित देशमुख, ईश्वर जाधव, भीमराव खिलारे, राहुल सजगणे, ज्ञानेश्वर इंगवले, स्वाभिमानीचे युवा तालुकाध्यक्ष सचिन पवार, तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे, भुरकवडी, भोसरे, कातरखटाव उंबर्डेचे शेतकरी व तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०६वडूज

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसने वडूज तहसील कार्यालयाबाहेर चक्काजाम आंदोलन केले.