शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

निषेध माझा नाही तर भोगीरथाचा करा: उदयनराजेंचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:22 IST

नीरा-देवघर धरणाचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. कालव्यांची कामे वेळेत झाली असती तर खंडाळा आणि फलटण तालुक्यातील शिवारे भिजली असती; परंतु गेली ११ वर्षे कॅनॉलची कामे कथित भगीरथाने रखडवली म्हणूनच निषेधच करायचा असेल तर कथित भगीरथ ऊर्फ भोगीरथाचा निषेध केला पाहिजे, असा खरमरीत टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला.

ठळक मुद्देनिषेध माझा नाही तर भोगीरथाचा करा: उदयनराजेंचा टोला कालवे रखडवून खंडाळा, फलटणला वंचित ठेवल्याचा आरोप

सातारा : नीरा-देवघर धरणाचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. कालव्यांची कामे वेळेत झाली असती तर खंडाळा आणि फलटण तालुक्यातील शिवारे भिजली असती; परंतु गेली ११ वर्षे कॅनॉलची कामे कथित भगीरथाने रखडवली म्हणूनच निषेधच करायचा असेल तर कथित भगीरथ ऊर्फ भोगीरथाचा निषेध केला पाहिजे, असा खरमरीत टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला.फलटण तालुक्यात उदयनराजेंचा निषेध मोर्चा काढण्यात आला होता, त्या पार्श्वभूमीवर दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार उदयनराजे यांनी म्हटले आहे की, कोणताही माणूस एक-दोन नव्हे तर तब्बल ११ वर्षे, स्वत:चं घर उपाशी ठेवून दुसऱ्या घरच्या व्यक्तींना जेवू घालत असेल तर त्याच्यासारखा कृतघ्न माणूस शोधून सापडणार नाही. या भोगीरथाची तळी उचलण्यासाठी काही लोक आमचा निषेध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

वास्तविक नीरा-देवघरचे पाणी भोर, खंडाळा, फलटण व माळशिरस तालुक्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. या तालुक्यांचे हक्काचे आणि राखून ठेवलेले पाणी मिळू नये म्हणून कथित भगीरथाने या पाण्यापासून वंचित ठेवले. आता नीरा-देवघर उजव्या कालव्याचे पाणी खंडाळा तालुक्यातील लोणंद, वाघोशी वगैरे दहा गावांना तर फलटण तालुक्यातील पाडेगाव व इतर ६१ गावांना मिळणार आहे. ही सर्व गावे त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून गेली ११-१२ वर्षे वंचित ठेवण्यात आलेली होती.

आजपर्यंत पाण्यापासून वंचित ठेवलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आणि कर्जबाजारी-पणाला हेच भोगीरथ जबाबदार आहेत. सत्य नेहमीच कटू असते. तसेच सत्य कधीही लपून राहात नाही, कधी ना कधीतरी ते बाहेर पडतेच, आजपर्यंत भोगीरथाने पाण्यापासून ज्या शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे, त्या शेतकऱ्यांनी सोसलेल्या वेदनांच्या श्राप-अश्रापांमुळे या भोगीरथाचा पालापाचोळा होणार आहे, हे मात्र निश्चित आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.राजकारणाच्या पलीकडे जाऊन, माणुसकी आणि वैधानिक दृष्टिकोनामधून याकडे पाहिले पाहिजे. याबाबत खंडाळा तालुक्यासह फलटण, माळशिरस भागांतील आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती लोकप्रतिनिधी यांनी त्यांचे स्वत:चे या विषयावरचे मत एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून व्यक्त केले पाहिजे. या भागातील लोकप्रतिनिधींची विशेष बैठक जलसंपदामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बोलावून या प्रकरणाची सर्व माहिती, चौकशी लावून जनतेला खुली करण्यात यावी.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर