शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निषेध माझा नाही तर भोगीरथाचा करा: उदयनराजेंचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:22 IST

नीरा-देवघर धरणाचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. कालव्यांची कामे वेळेत झाली असती तर खंडाळा आणि फलटण तालुक्यातील शिवारे भिजली असती; परंतु गेली ११ वर्षे कॅनॉलची कामे कथित भगीरथाने रखडवली म्हणूनच निषेधच करायचा असेल तर कथित भगीरथ ऊर्फ भोगीरथाचा निषेध केला पाहिजे, असा खरमरीत टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला.

ठळक मुद्देनिषेध माझा नाही तर भोगीरथाचा करा: उदयनराजेंचा टोला कालवे रखडवून खंडाळा, फलटणला वंचित ठेवल्याचा आरोप

सातारा : नीरा-देवघर धरणाचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. कालव्यांची कामे वेळेत झाली असती तर खंडाळा आणि फलटण तालुक्यातील शिवारे भिजली असती; परंतु गेली ११ वर्षे कॅनॉलची कामे कथित भगीरथाने रखडवली म्हणूनच निषेधच करायचा असेल तर कथित भगीरथ ऊर्फ भोगीरथाचा निषेध केला पाहिजे, असा खरमरीत टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला.फलटण तालुक्यात उदयनराजेंचा निषेध मोर्चा काढण्यात आला होता, त्या पार्श्वभूमीवर दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार उदयनराजे यांनी म्हटले आहे की, कोणताही माणूस एक-दोन नव्हे तर तब्बल ११ वर्षे, स्वत:चं घर उपाशी ठेवून दुसऱ्या घरच्या व्यक्तींना जेवू घालत असेल तर त्याच्यासारखा कृतघ्न माणूस शोधून सापडणार नाही. या भोगीरथाची तळी उचलण्यासाठी काही लोक आमचा निषेध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

वास्तविक नीरा-देवघरचे पाणी भोर, खंडाळा, फलटण व माळशिरस तालुक्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. या तालुक्यांचे हक्काचे आणि राखून ठेवलेले पाणी मिळू नये म्हणून कथित भगीरथाने या पाण्यापासून वंचित ठेवले. आता नीरा-देवघर उजव्या कालव्याचे पाणी खंडाळा तालुक्यातील लोणंद, वाघोशी वगैरे दहा गावांना तर फलटण तालुक्यातील पाडेगाव व इतर ६१ गावांना मिळणार आहे. ही सर्व गावे त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून गेली ११-१२ वर्षे वंचित ठेवण्यात आलेली होती.

आजपर्यंत पाण्यापासून वंचित ठेवलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आणि कर्जबाजारी-पणाला हेच भोगीरथ जबाबदार आहेत. सत्य नेहमीच कटू असते. तसेच सत्य कधीही लपून राहात नाही, कधी ना कधीतरी ते बाहेर पडतेच, आजपर्यंत भोगीरथाने पाण्यापासून ज्या शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे, त्या शेतकऱ्यांनी सोसलेल्या वेदनांच्या श्राप-अश्रापांमुळे या भोगीरथाचा पालापाचोळा होणार आहे, हे मात्र निश्चित आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.राजकारणाच्या पलीकडे जाऊन, माणुसकी आणि वैधानिक दृष्टिकोनामधून याकडे पाहिले पाहिजे. याबाबत खंडाळा तालुक्यासह फलटण, माळशिरस भागांतील आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती लोकप्रतिनिधी यांनी त्यांचे स्वत:चे या विषयावरचे मत एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून व्यक्त केले पाहिजे. या भागातील लोकप्रतिनिधींची विशेष बैठक जलसंपदामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बोलावून या प्रकरणाची सर्व माहिती, चौकशी लावून जनतेला खुली करण्यात यावी.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर