शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

पिकांचे किडीपासून होणार संरक्षण, 'या' कृषी अधिकाऱ्याने तयार केले नवे तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 1:25 PM

हणमंत यादव चाफळ : कृषिक्षेत्राची प्रगती झपाट्याने होत असताना नैसर्गिक आपत्तीबरोबर पिकावरील शत्रूकीड, खोडकिडा, गादमाशी, नवीन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने ...

हणमंत यादवचाफळ : कृषिक्षेत्राची प्रगती झपाट्याने होत असताना नैसर्गिक आपत्तीबरोबर पिकावरील शत्रूकीड, खोडकिडा, गादमाशी, नवीन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे. या शत्रूकिडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पाटण तालुक्यातील मल्हारपेठ (ता. पाटण) येथील मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी ‘सुचंद्र प्रकाश सापळा’ तयार केला आहे. या सापळ्यामुळे पिकांचे किडीपासून संरक्षण होऊ लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हातातोंडाशी आलेल्या पिकांवर हल्लाबोल चढवणाऱ्या पतंगवर्गीय शत्रूकिडी या अतिशय खादाड व प्रचंड नुकसान करणाऱ्या आहेत. खोडकिडी, गादमाशी, लष्करी अळीमुळे पिकांचे खूप नुकसान होते. परिणामी, उत्पन्नात घट होते. शेतकऱ्यांना झालेला खर्चसुद्धा परत मिळत नाही. शत्रूकिडींची उत्पत्ती झाल्यानंतर कीड मोठी होऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढल्यानंतर शेतकऱ्यांमार्फत रासायनिक औषधांचा प्रचंड वापर सुरू होतो. त्यामुळे वातावरणात प्रदूषण पसरून जलस्रोत विषारी होऊन जीवसृष्टीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे आजवर दिसून आले आहे.

चंद्रकांत कोळी यांनी प्रायोगिक तत्त्वावर हेमंत परशराम बागडेरिया यांच्या हरभरा व उन्हाळी भात पिकात अमावास्या काळात प्रकाश सापळा लावला होता. या सापळ्यात खूप प्रमाणात शत्रूकिडींचे म्हणजे खोडकिडीचे पतंग, गादमाशी, सुरळीतील अळीचे पतंग, फुलकिडे, पांढरी माशी हजारोंच्या संख्येने सापडून मेल्या आहेत. त्यामुळे कोळी यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून माहिती देत कृषी विभागातील कृषी मित्र, कृषी सहायक, कृषीपर्यवेक्षक यांच्यामार्फत या सापळ्याचा वापर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

सुलभ मॉडेल विकसित

अमावास्येच्या काळात शास्त्रोक्त पद्धतीचा सुधारित सापळा मॉडेल विकसित करण्याचा कोळी यांचा मनोदय होता. २०१० मध्ये कऱ्हाड येथे याची सुरुवात केल्यानंतर त्यांना गोंदिया जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना या सुचंद्र प्रकाश सापळ्याचे तंत्रज्ञानाचे प्रसारित करण्याची गरज भासली म्हणून त्यांनी हे मॉडेल विकसित केलेले आहे. प्रभावी ठरलेल्या या प्रकाश सापळ्याच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ही काळाची गरज बनली आहे. शेतकऱ्यांना वापरण्यासाठी चंद्रकांत कोळी यांनी प्रकाश सापळ्याचे सुलभ मॉडेल विकसित केले आहे.

सुचंद्र प्रकाश सापळा म्हणजे काय व तो कसा वापरावा?

- शेतकऱ्यांना शेतामध्ये सुलभ पद्धतीने वापरता येण्यासारखा बनवलेला आहे.

- पिकाची उंची वाढेल तसा खाली-वर सरकवता येतो.

- या प्रकाश सापळ्यास पिवळा रंग दिल्याने किडींच्या पतंगांना पिवळा रंग हा आकर्षित करतो.

- शेतामध्ये लाइटची सोय असल्यास किंवा नसल्यास दोन्ही ठिकाणी वापरता येईल.

- कंदील, लाइटपासून जवळच खाली घमेले मांडण्यात आले आहे. त्यामध्ये राॅकेल किंवा कीटकनाशकयुक्त पाणी ठेवण्याची सोय केलीली आहे.

- सुचंद्र प्रकाश सापळा तयार करण्यास २००० रुपये खर्च येतो. लोखंडी असल्याने किमान १५ वर्षे टिकेल.

- किडीचे पतंग विद्युत बल्ब, कंदील वर आदळून तोल जाऊन खाली असलेल्या रॉकेल, कीटकनाशक मिश्रित पाण्यात पडून मरतात. त्यामुळे किडींची उत्पत्ती थांबते.

- होणारे नुकसान टाळून रासायनिक कीटकनाशकावरील खर्च कमी होतो. उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविता येते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी