शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

...म्हणून त्यांना राम मंदिराचा मुद्दा पुन्हा आठवतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 12:14 IST

'भाजपाने विकासाची दाखविलेली स्वप्ने भंग पावली आहेत. विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरल्यानेच सेना-भाजपाला आता पुन्हा राम आठवतोय. मात्र रामाच्या नावावर पुन्हा मते मिळणार नाहीत,'

ठळक मुद्दे'भाजपाने विकासाची दाखविलेली स्वप्ने भंग पावली आहेत''विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरल्यानेच सेना-भाजपाला आता पुन्हा राम आठवतोय. मात्र रामाच्या नावावर पुन्हा मते मिळणार नाहीत'मराठा समाजाची आरक्षणप्रश्नी फसवणूक करू नका - पृथ्वीराज चव्हाण

कराड - 'भाजपाने विकासाची दाखविलेली स्वप्ने भंग पावली आहेत. विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरल्यानेच सेना-भाजपाला आता पुन्हा राम आठवतोय. मात्र रामाच्या नावावर पुन्हा मते मिळणार नाहीत,' असे परखड मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, आमदार विश्वजित कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष आप्पा माने, अशोकराव पाटील, सुनील पाटील आदींची उपस्थिती होती.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचे काम केले आहे. त्यांच्या विचारांची जोपासणा करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरणार आहे.' मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत बोलताना ते म्हणाले. 'मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. या आरक्षणाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळाले तरी हरकत नाही; पण आरक्षणप्रश्नी मराठा समाजाची फसवणूक करू नका, अन्यथा उद्रेक होईल,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाShiv Senaशिवसेना