शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारकडून बजेट तयार : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 14:38 IST

फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठेवण्यात येणारं बजेट हे या सरकारकडून येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तयार केले जाईल. मात्र, सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बस आता चुकलीय, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देनिवडणूक डोळ्यासमोर मोदी सरकारकडून ठेवून बजेट तयार: जयंत पाटीलजनतेच्या मनातून मोदी सरकार उतरलंय 

कऱ्हाड : फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठेवण्यात येणारं बजेट हे या सरकारकडून येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तयार केले जाईल. मात्र, सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बस आता चुकलीय, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू असणारी परिवर्तन यात्रा मंगळवारी कऱ्हाडात दाखल झाली. यावेळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री जयंत पाटील बोलत होते.

सर्वसामान्य जनता आता मोदी सरकारला कंटाळलेली आहे. कारण नुसत्या घोषणा, आश्वासने दिल्याने त्या या सरकारला पूर्ण करता आलेल्या नाहीत. महाराष्ट्रातही या सरकारबद्दल लोकांचा राग अनावर झालाय. त्यांच्या मनातून हे सरकार उतरल्याची खात्री वाटते, असेही जयंत पाटील म्हणाले. 

यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर, नगरसेवक सौरभ पाटील आदींची उपस्थिती होती.यावेळी जयंत पाटील म्हणाले, चोरांच्या हातात चाव्या नको, असे मुख्यमंत्री फडणवीस बोलत आहेत. त्यांनी हे बोलण्यापूर्वी त्यांच्या सोळा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत खुलासा करावा. तसेच त्यांच्या सरकारने साडेचार वर्षांत काय दिवे लावलेत, हे मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती आहे.अजित पवार म्हणाले, या सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे. भाजपची सर्व पावले ही हुकूमशाही पद्धतीची आहेत. हे सरकार नुसत्या घोषणा देण्याचं काम करतंय.

सातारा येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही राजेंच्या मनोमिलनाबाबत पुढाकार घेत त्यांना एकत्रित गाडीत घेतले. त्यांच्या गाडीने स्टॉर्टर मारला आहे. गियरही टाकला आहे. आता ही गाडी कोठेही थांबणार नाही, असेही शेवटी अजित पवार यांनी दोन्ही राजेंच्या मनोमिलनाच्या प्रश्नाबाबत सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSatara areaसातारा परिसर