शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

एफआरपीसाठी प्रहार जनशक्ती तीव्र आंदोलन करणार : खलाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 5:22 PM

सोलापूर जिल्ह्यातील १५०० कोटी तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपये एफआरपी रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम न जमा झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देएफआरपीसाठी प्रहार जनशक्ती तीव्र आंदोलन करणार : खलाटे साखर आयुक्त कार्यालयावर अचानक हल्ला बोल

सातारा : सोलापूर जिल्ह्यातील १५०० कोटी तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपये एफआरपी रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. येत्या आठ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम न जमा झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.खलाटे म्हणाले, ऊस गेल्यानंतर कारखानदारांकडून १४ दिवसांत एफआरपीची रक्कम मिळणे बंधनकारक असतानाही गळीत हंगाम संपून चार महिने उलटल्यानंतर सुद्धा एफआरपीच्या रकमेपैकी १५०० कोटी रुपये अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ही रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह येत्या आठ दिवसांत मिळावी.शेतकऱ्यांना एफआरपी नुसार रक्कम मिळण्यासाठी शासनाने कारखान्यास कोणत्या दिवशी नोटीस पाठविली व त्या नोटीशीस कारखान्याकडून कोणते उत्तर मिळाले, ही माहिती शेतकऱ्यांना आॅनलाईन उपलब्ध व्हावी, यासाठी उपाय योजना व्हाव्यात. ऊसबिलासह इतर माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या अ‍ॅपची तातडीने अंमलबजावणी करावी.

या सर्व मागण्या आठ दिवसांत पूर्ण कराव्यात, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही पूर्व सूचना न देता साखर आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाही खलाटे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर