शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
4
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
5
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
6
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
7
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
8
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
9
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
10
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
11
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
12
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
13
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
14
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
15
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
16
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
17
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
18
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
19
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं आरोग्यासाठी घातक?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपांचा गेले दहा दिवस विद्युतपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

धामणेर : धामणेर (ता. कोरेगाव) येथील टंकसाळे व कोकीळ वस्तीवरील वादळी पावसाने दोन विद्युत डीपींचे खांब पडल्यामुळे दहा दिवस ...

धामणेर : धामणेर (ता. कोरेगाव) येथील टंकसाळे व कोकीळ वस्तीवरील वादळी पावसाने दोन विद्युत डीपींचे खांब पडल्यामुळे दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला असून, अद्याप तरी विद्युत मंडळाने वीजपुरवठा सुरळीत न केल्यामुळे येथील सुमारे तीनशे एकर बागायती क्षेत्रातील पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही वीज बिल भरा तरच आम्ही सुरू करू, असे रहिमतपूर विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

धामणेर येथील ब्रह्मपुरीनजीक टंकसाळे वस्ती व कोकीळ वस्ती येथे कृष्णा नदीकाठावर दोन विद्युत डीपी आहेत. या डीपीवर सुमारे तीस ते पस्तीस विद्युत पंप आहेत. यावर सुमारे ३०० एकर बागायती क्षेत्र आहे. यामध्ये शेतकऱ्यांची ऊस, भुईमूग, आले, तरकारी अशी महत्त्वाचे पिके आहेत. या विद्युत डीपीमधील काही दोन टक्के शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नाहीत; परंतु बाकीच्या शेतकऱ्यांनी बिले भरलेली आहेत. अशा शेतकऱ्यांचे उन्हाळी दिवसात फार मोठे नुकसान होण्याचा धोका विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या अजब कारभारामुळे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नाहीत, त्यांची विद्युत कनेक्शन बंद करा; परंतु ५० टक्के सवलतीत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्यांनी वीज बिले भरली आहेत त्यांचे तरी विद्युत पंप चालू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. तरीसुद्धा अधिकारी विद्युत पुरवठा सुरळीत करीत नाहीत. त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार विद्युत विद्युत मंडळाकडून होत आहे, अशी भावना शेतकऱ्यांची होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(कोट)

आम्ही शेतकऱ्यांच्यावतीने रहिमतपूर कार्यालयातील अधिकाऱ्यांना चार-पाच वेळा विद्युत डीपी बंद आहे, असे सांगितले. तरीसुद्धा आम्हाला वरून आदेश आहेत. तेव्हा आम्ही विद्युत डीपी सुरू करू शकत नाही, असे अधिकारी सांगत आहेत. आमची सुमारे पन्नास एकर क्षेत्र या डीपीवर आहे. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज बिल थकीत आहेत त्यांची कनेक्शन बंद करा, बाकीचे तरी सुरू करावीत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा व विद्युत पुरवठा सुरळीत करावा.

-सागर कोकीळ शेतकरी, धामणेर (ता. कोरेगाव)

(कोट)

विद्युत डीपीवरील सर्व शेतीपंपाची वीज बिले भरल्याशिवाय दुरुस्ती कामाची मागणी करू नये अशाप्रकारे महावितरणचे आदेश आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थकीत बिले भरावीत, नंतर खांबांची कामे करून विद्युतपुरवठा सुरळीत करता येईल.

-थोरवडे, शाखाप्रमुख महावितरण, रहिमतपूर (ता. कोरेगाव)

१९धामणेर

फोटो. : धामणेर (ता. कोरेगाव) येथे वादळी पावसामुळे विद्युत खांब पडलेले आहे. (छाया : शशिकांत क्षीरसागर)