शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मेघराजा बरसला; सातारा जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर पेरणी! 

By नितीन काळेल | Updated: July 26, 2023 18:22 IST

खरीप हंगामात आतापर्यंत ७५ टक्के क्षेत्रावर पेर पूर्ण 

सातारा : जिल्ह्यात उशिरा का असेना सर्वच भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत २ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ७५ इतके झाले आहे. यामुळे यावर्षीही खरीप पेरणी पूर्णत्वाकडे जाण्याचा अंदाज आहे. तर सोयाबीनची १०५ टक्के पेर झालेली आहे.जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यानंतर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४४ हजार, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, मका १५ हजार, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर तर नागली, तूर, मूग, उडीद, तिळाचे क्षेत्र अत्यल्प आहे. आतापर्यंतचा विचार करता एकूण क्षेत्राच्या २ लाख १४ हजार हेक्टरवरच पेरणी तसेच भात लागण झालेली आहे. तर आतापर्यंत भाताची लागण ३१ हजार ९६१ हेक्टरवर झालेली आहे.याचे प्रमाण जवळपास ७३ टक्के इतके आहे. त्यानंतर ज्वारीची ७ हजार ५७४ हेक्टरवर तर मकेची ९ हजार ३५८ हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर खरीपातील प्रमुख पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीनची ७८ हजार ४५१ हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत याचे प्रमाण १०५ इतके आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी यंदाही वाढणार असा अंदाज आहे. तर भुईमुगाची २६ हजार ११२ हेक्टर म्हणजे ८९ टक्के क्षेत्रावर पेर झालेली आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस होताच. पण, मागील आठवड्यापासून पूर्व भागातील अनेक ठिकाणी काही प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी वेगाने पेरणी करु लागले आहेत. या कारणाने उशिरा का असेना खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आलेला आहे. त्यातच आताप्रमाणेच यापुढेही पाऊस सुरुच राहिल्यास पेरणी १०० टक्के होण्याचा कृषी विभागाला विश्वास आहे.

कोरेगावमध्ये १०० टक्के; फलटणला सर्वात कमी...जुलै महिन्याच्या शेवट आला आहे तरीही १०० टक्के पेरणी झालेली नाही. तरीही गेल्या १० दिवसांतील चित्र पाहता पावसाने आशादायक चित्र निर्माण केलेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी झालेली आहे. यामध्ये कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक ९९.६४ टक्के क्षेत्रावर पूर्ण झाली. तर यानंतर कऱ्हाड तालुक्यात ९५ टक्के, पाटण ९४, सातारा तालुक्यात ८६ टक्के, महाबळेश्वर ८५, जावळी ७३ टक्के, वाई तालुका ६२, खंडाळा ५० आणि माण तालुक्यात ५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तर सर्वात कमी पेर फलटण तालुक्यात ३६ टक्के झालेली आहे.

सोयाबीन वाढणार; बाजरी रखडणार...

सध्याची स्थिती पाहता खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यापुढे बाजरीची पेरणीच होणार नाही. परिणामी यावर्षी बाजरीच्या क्षेत्रात घट होणार आहे. आतापर्यंत बाजरीची फक्त २९ टक्के पेर झालेली आहे. तर भाताची ७३ टक्क्यांवर आहे. सोयाबीन पेर जवळपास ७९ हजार हेक्टरपर्यंत गेली. त्यामुळे १०५ टक्क्यांवर पेरणी गेली आहे. ज्वारीची ६८ टक्के झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी