शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मेघराजा बरसला; सातारा जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर पेरणी! 

By नितीन काळेल | Updated: July 26, 2023 18:22 IST

खरीप हंगामात आतापर्यंत ७५ टक्के क्षेत्रावर पेर पूर्ण 

सातारा : जिल्ह्यात उशिरा का असेना सर्वच भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत २ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ७५ इतके झाले आहे. यामुळे यावर्षीही खरीप पेरणी पूर्णत्वाकडे जाण्याचा अंदाज आहे. तर सोयाबीनची १०५ टक्के पेर झालेली आहे.जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यानंतर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४४ हजार, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, मका १५ हजार, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर तर नागली, तूर, मूग, उडीद, तिळाचे क्षेत्र अत्यल्प आहे. आतापर्यंतचा विचार करता एकूण क्षेत्राच्या २ लाख १४ हजार हेक्टरवरच पेरणी तसेच भात लागण झालेली आहे. तर आतापर्यंत भाताची लागण ३१ हजार ९६१ हेक्टरवर झालेली आहे.याचे प्रमाण जवळपास ७३ टक्के इतके आहे. त्यानंतर ज्वारीची ७ हजार ५७४ हेक्टरवर तर मकेची ९ हजार ३५८ हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर खरीपातील प्रमुख पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीनची ७८ हजार ४५१ हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत याचे प्रमाण १०५ इतके आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी यंदाही वाढणार असा अंदाज आहे. तर भुईमुगाची २६ हजार ११२ हेक्टर म्हणजे ८९ टक्के क्षेत्रावर पेर झालेली आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस होताच. पण, मागील आठवड्यापासून पूर्व भागातील अनेक ठिकाणी काही प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी वेगाने पेरणी करु लागले आहेत. या कारणाने उशिरा का असेना खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आलेला आहे. त्यातच आताप्रमाणेच यापुढेही पाऊस सुरुच राहिल्यास पेरणी १०० टक्के होण्याचा कृषी विभागाला विश्वास आहे.

कोरेगावमध्ये १०० टक्के; फलटणला सर्वात कमी...जुलै महिन्याच्या शेवट आला आहे तरीही १०० टक्के पेरणी झालेली नाही. तरीही गेल्या १० दिवसांतील चित्र पाहता पावसाने आशादायक चित्र निर्माण केलेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी झालेली आहे. यामध्ये कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक ९९.६४ टक्के क्षेत्रावर पूर्ण झाली. तर यानंतर कऱ्हाड तालुक्यात ९५ टक्के, पाटण ९४, सातारा तालुक्यात ८६ टक्के, महाबळेश्वर ८५, जावळी ७३ टक्के, वाई तालुका ६२, खंडाळा ५० आणि माण तालुक्यात ५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तर सर्वात कमी पेर फलटण तालुक्यात ३६ टक्के झालेली आहे.

सोयाबीन वाढणार; बाजरी रखडणार...

सध्याची स्थिती पाहता खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यापुढे बाजरीची पेरणीच होणार नाही. परिणामी यावर्षी बाजरीच्या क्षेत्रात घट होणार आहे. आतापर्यंत बाजरीची फक्त २९ टक्के पेर झालेली आहे. तर भाताची ७३ टक्क्यांवर आहे. सोयाबीन पेर जवळपास ७९ हजार हेक्टरपर्यंत गेली. त्यामुळे १०५ टक्क्यांवर पेरणी गेली आहे. ज्वारीची ६८ टक्के झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी