शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

आमचा कचरा उचला अन् अंधार दूर करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गोडोली, कोडोली, शाहूनगर हा त्रिशंकू भाग अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. येथील रहिवासी आजही मूलभूत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गोडोली, कोडोली, शाहूनगर हा त्रिशंकू भाग अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. येथील रहिवासी आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने या भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु हद्दवाढीच्या वर्षपूर्तीनंतरही येथील कचरा संकलन व पथदिव्यांचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. आमचा कचरा दररोज संकलित व्हावा, रस्ते प्रकाशमान व्हावेत, अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

सातारा शहराची हद्दवाढ न झाल्याने बाहेरील नागरिकांचा प्रचंड ताण सातारा पालिकेवर येत होता. शहरातील रस्ते, बाजारपेठा, मंडई, कचरा डेपो या सर्व सेवासुविधांचा उपभोग हद्दीबाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणात घेत होते. वाढीव लोकसंख्येचा शहरातील सेवा-सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेता सातारा शहराच्या हद्दवाढीवर तब्बल ४० वर्षांनंतर शिक्कामोर्तब करण्यात आले अन् अनेक वर्षे विकासापासून वंचित असलेला गोडोली, कोडोली, शाहूनगर हा त्रिशंकू भाग पालिकेत समाविष्ट झाला आहे.

हद्दवाढीनंतर पालिकेने येथील कचरा संकलनाचा प्रश्न प्राधान्याने हाती घेत घंडागाड्या सुरू केल्या; परंतु त्यामध्ये नियमितता नाही. प्रमुख मार्गावर पथदिवे बसवून अंधार दूर केला. मात्र, अंतर्गत रस्त्यांवरील अंधार अजूनही कायम आहे. पावसामुळे येथे रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले नाही. मात्र, डागडुजी करण्यात आली; परंतु पावसात रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. पालिका मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. मोठी कामे टप्प्याटप्प्याने होतील; परंतु सध्याच्या घडीला कचऱ्याचे संकलन वेळेत व दररोज व्हायला हवे. या भागात पथदिवे उभारणे गरजेचे असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

(कोट)

त्रिशंकू भागाच्या विकासासाठी पालिकेने ५१ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. याशिवाय नगरोत्थान व दलितेतर योजनेतूनही कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. पाइपड्रेन, गटर्स, रस्ते विकास, पथदिवे, खुल्या जागांचा विकास अशी कामे नियोजित असून, पुढील टप्प्यात ती प्राधान्याने हाती घेतली जातील.

- मनोज शेंडे, उपनगराध्यक्ष

(कोट)

त्रिशंकू भागात अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. घंटागाडी नियमित नसल्याने अनेक व्यापारी, दुकानदार, नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेने आरोग्य सेवेला बळकटी देण्याची खरी गरज आहे.

- ॲड. वैभव मोरे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

(चौकट)

नागरिकांच्या या आहेत अपेक्षा..

- प्रमुख व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण

- घंटागाड्या वेळेत व नियमित याव्यात

- सर्वत्र पथदिवे बसविण्यात यावेत

- सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुयारी गटार योजना

- ओढे, नाल्यांची स्वच्छता

- अतिक्रमण हटविण्याची गरज

- खुल्या जागांचा विकास, उद्यानाची निर्मिती

- सांस्कृतिक सभागृह, ज्येष्ठांना विरंगुळा केंद्र

लोगो : हद्दवाढीची वर्षपूर्ती : भाग ३