शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील धरणात फक्त २० टक्केच साठा, जोरदार पावसाची प्रतीक्षा 

By नितीन काळेल | Updated: July 5, 2024 19:20 IST

सर्वच धरणक्षेत्रात पाऊस कमी..

सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरू होऊन महिना झाला तरी प्रमुख सहा मोठ्या धरणात सध्या २८ टीएमसीच उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी २० इतकीच आहे. त्यामुळे पावसाने जोर धरल्यासच ही धरणे भरणार आहेत. अन्यथा गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण होणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही प्रमुख सहा धरणे आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. तर उपयुक्त पाणीसाठा हा १४०.८६ टीएमसी असतो. पश्चिम भागात पाऊस पडत असल्याने ही धरणे भरतात. पण, एखाद्या वर्षी पर्जन्यमान कमी झाले तर धरणे भरत नाहीत. गेल्यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी झाला. यामुळे बहुतांशी धरणे भरली नाहीत.कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. मात्र, गेल्या वर्षी या धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. तसेच कण्हेर आणि उरमोडी ही धरणेही भरली नव्हती. त्यामुळे पाणी नियोजन करताना अडचणी आल्या होत्या. यंदातरी ही धरणे भरण्याची गरज आहे.

जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचे वेळेत आगमन झाले. त्यामुळे मागील जवळपास एक महिन्यापासून पाऊस पडत आहे. पण, या पावसात सातत्य नाही. तसेच पश्चिमेकडे अजून म्हणावा असा पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सध्या कोयना धरणात गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा अधिक आहे. पण, इतर धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंता करण्यासारखी आहे. यामुळे पावसाने जोर धरल्यासच ही धरणे भरु शकतात. अन्यथा प्रशासन तसेच शेतकऱ्यांचीही चिंता वाढणार आहे.

कण्हेर, उरमोडी धरणे तळाला..जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कण्हेर, उरमोडी, तारळी धरणाने तळ गाठला आहे. उरमोडी धरण हे ९.९६ टीएमसी क्षमतेचे आहे. पण, धरणात सध्या १.२७ टीएमसीच उपयुक्त पाणीसाठा आहे. तर कण्हेर धरण १०.१० टीएमसीचे आहे. सध्या या धरणातही २.१७ टीएमसी उपयुक्त साठा शिल्लक आहे. तारळी धरणाची क्षमता ५.८५ टीएमसी आहे. या धरणातही १.३८ टीएमसी साठा आहे. ही धरणे भरण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे.

सर्वच धरणक्षेत्रात पाऊस कमी..जिल्ह्यातील प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर नाही. त्यामुळे कोयना वगळता इतर धरणात कमी साठा आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला १ हजार २३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धोमला २५८, बलकवडी ५३६ तर कण्हेर २२८, उरमोडी धरणक्षेत्रात ३५८ आणि तारळी येथे ३३१ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी