शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र, राज्य सरकारकडून कर्मवीर अण्णांच्या विचारांना फाटा देण्याचे काम - नाना पटोले 

By दीपक देशमुख | Updated: May 9, 2023 16:21 IST

ज्यांच्याकडे पैसे असतील त्यांच्याच मुलांना शिक्षणे मिळतील, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे

सातारा : ‘एकनाथ शिंदे यांनी संविधानिक पदाचा उपयोग राज्याच्या हितासाठी करावा. सातारा जिल्ह्याने चार मुख्यमंत्री दिले आहेत. यापूर्वीची तीन मुख्यमंत्र्यांचा सातारी बाणा राखला, पण शिंदे यांचा बाणा कोठे गेला. खारघरच्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्राच्या विचाराला काळिमा फासली आहे, त्यावेळी साताराचा मुलगा मुख्यमंत्री पदावर होता,’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. दरम्यान, कर्मवीर अण्णांच्या विचारांना फाटा देण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.सातारा येथील काँग्रेस कमिटीत मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, जिल्हा काँग्रेस निरीक्षक श्रीरंग नाना चव्हाण, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजित देशमुख, राजेंद्र शेलार, महिला अध्यक्ष अल्पना यादव व पदाधिकारी उपस्थित होते.पटोले म्हणाले, ‘कर्मवीर आण्णांनी गरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. शाळा ही शिक्षणाची मंदिरे बनवली, पण आता त्यांच्या शिक्षणविषयक विचारांना फाटा देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. बहुजनांच्या मुला-मुलींना शिक्षण मिळू नये, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे पैसे असतील त्यांच्याच मुलांना शिक्षणे मिळतील, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. 

जनाधार नाकारून ऑपरेशन लोट्समहाराष्ट्र सीमा भागातील लोकांचा रोष भाजपबाबत जास्त आहे. डबल इंजनचे सरकार द्या, म्हणत मताचा जाेगवा मागितला; पण शासनाने ट्रुबल इंजिनचे सरकार दिले आहे. जनतेने नाकारल्यानंतरही जनाधार नाकारून ऑपरेशन लोट्स करते. जनतेने त्यांना ऑपरेशन वापस करून नॅनो गाडीत बसविल्याचे एक्झिट पोलवरून दिसून येते. कर्नाटकमध्ये बजरंगबली काँग्रेसच्याच बाजूला राहिल.’महाविकास आघाडीत नाही तर जनतेत भाजप सरकारविरोधात धुसफूस जागा वाटपाबाबत त्यांना छेडले असता पटोले म्हणाले, येत्या महिनाभरात जागा वाटपासाठी बसणार आहे. जे कोणी भाजपाच्या विरोधात आमच्यासोबत लढायला तयार आहे, त्या लोकांना सोबत घेऊन चालणार आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जागा वाटपाचा प्रश्न सुटेल. महाविकास आघाडीत धुसफूस नाही तर जनतेत भाजप सरकारविरोधात धुसफूस सुरू आहे. मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी व गरिबी वाढत आहे. पहाटेचे सरकारबाबत पटोले मी केलेला आरोप नाही तर ते वास्तव आहे, असेही ते म्हणाले.बारसूत सरकारी बगलबच्चांच्या जमिनीबारसू येथे रिफायनरीचा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी जनतेचे मत घेतले पाहिजे. सरकारच्या बगलबच्चांनी तेथे अगोदरच जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्यासाठी हा प्रकल्प उभा केला जात आहे काय? असा सवाल करून उद्योगामुळे तेथील निसर्ग संपविला जाणार असल्याचे संशोधक सांगत आहेत. तरीही विरोध करणाऱ्या महिलांवर लाठीचार्ज केला जात आहे. तेथील जनतेसोबत काँगेस असल्याचे पटोले म्हणाले.सरकार असूनही आया-बहिणींना वाचवू शकले नाहीतनॅशनल क्राइम ब्युरोने गुजरातमधील ४० हजार स्त्रीया-मुली बेपत्ता झाल्याबाबत विचारले असता पटोले म्हणाले, सत्तेत बसूनही ते आपल्या आया-बहिणींचे रक्षण करू शकत नाहीत. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती असून, गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे भाजपकडून जनतेने अपेक्षा सोडली आहे. काश्मीर फाइल सिनेमा काढून त्यांनी काश्मिरी पंडितांवर कसा अन्याय होतो ते दाखवले. पण आज सरकार भाजपचेच आहे. आज काश्मीर खाेऱ्यात पंडितांची हत्या होत आहे. काश्मीर फाइल्स लोकांनी पाहिला नाही. यांनीच तिकिटे काढली, असल्याची टीका पटोले यांनी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा