शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ना लाईट, ना मास्क नुसताच कठीण टास्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:48 IST

पावसाळ्यात आपत्कालीन विभाग सज्ज असल्याचा गाजावाजा केला जातो. वास्तवात मात्र, आपत्कालीन क्रमांक निव्वळ शोभेसाठीच असल्याचा अनुभव सातारकरांना आला.

ठळक मुद्देअग्निशामकच्या मर्यादा स्पष्ट। आपत्कालीन क्रमांकांना प्रतिसादच नाही --संडे हटके बातमी

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : पावसाळ्यात आपत्कालीन विभाग सज्ज असल्याचा गाजावाजा केला जातो. वास्तवात मात्र, आपत्कालीन क्रमांक निव्वळ शोभेसाठीच असल्याचा अनुभव सातारकरांना आला. इनर्व्हटरच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर लाईट, हेल्मेट आणि मास्कशिवाय अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. कोणत्याही पुरेशा साधन सामूग्रीशिवाय मिळविलेलं हे नियंत्रण धोकादायक आणि अशास्त्रीय असेच होते.

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पोवई नाक्यावरील स्टेशनरीच्या दुकानात इनर्व्हटरचा स्फोट झाला. या स्फोटात कुणाल कदम आणि यश दगडे हे दोन युवक गंभीर जखमी झाले. स्फोटाचा आवाज आल्यानंतर रात्री उशिरा परिसरात असणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काहींनी आपत्कालीन व्यवस्थेसाठी सज्ज असणाºया शासकीय यंत्रणांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही तत्काळ प्रतिसाद दिला नाही. घटना घडल्याक्षणी याबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठीही काहींनी फोन केले. मात्र, त्यांच्यापैकी कोणालाच यश आले नाही. अखेर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क झाल्यानंतर तातडीने सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या आणि उपचार मिळाले.

स्फोट झालेल्या ठिकाणी अग्निशमन दलाचा बंब वाजत गाजत पोहोचला खरा; पण अपुºया साहित्यासह. दुकानातील वायरचे अर्थिंग होऊन टिणग्या उडत होत्या. बॅटरीतून विचित्र वासाचा धूर बाहेर पडत होता. या धुरामुळे समोरचे काही दिसत नव्हते. विशेष म्हणजे या बंबाला ना लाईट होती, ना टॉर्च. आग विझविण्यासाठी आलेल्या जवानांकडे या धुरापासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी साधा मास्कही उपलब्ध नव्हता. तोंडाला साधे रुमाल बांधून हे जवान धुराच्या लोटावर पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते. अग्निशमन बंबासोबत असलेली टॉर्चही जवानांकडे नव्हती.

उपस्थित युवकांनी मोबाईल बॅटरीच्या साह्याने जवानांना दुकानाचा अंदाज घेण्यास मदत केली. बॅटरीतून बाहेर येणाºया धुरावर पाणी मारण्याऐवजी फॉग मारणे अपेक्षित होते. पण जिथं जवानांकडे मास्क, लाईट, हेल्मेट ही उपकरणे नव्हती तिथं फॉग असण्याची अपेक्षाच फोल ठरली. जवानांच्या जीवावर उदार होऊन ही आग विझविण्यात आली असली तरीही जवानांच्या जीवावरील धोका कायम आहेच. त्यामुळे आवश्यक त्या सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

वाहनचालक आपले!सातारा पालिकेत मुख्याधिकारी यांच्याबरोबर काही नागरिकांनी चर्चा करून अग्निशमन दलाकडे अपुरे साहित्य असल्याची माहिती दिली. यावर, ‘ही यंत्रणा पालिकेशी संलग्न नसल्यानेफक्त वाहनचालकाची जबाबदारी पालिकेकडे आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

स्फोटाचा आवाज आल्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. स्फोटामुळे दुकानाचे शटर तापले होते. उपस्थित सर्वांनी जिवाची पर्वा न करता युवकांना वाचवले. मात्र, शासकीय यंत्रणा कुचकामी असल्याचं यावेळी जाणवलं. वेळेत फोन न उचलणं, दिरंगाईची उत्तर यामुळे जखमींना मदत मिळायला थोडा उशीरच झाला.- अशोक घोरपडे, प्रत्यक्षदर्शी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग