शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ना लाईट, ना मास्क नुसताच कठीण टास्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:48 IST

पावसाळ्यात आपत्कालीन विभाग सज्ज असल्याचा गाजावाजा केला जातो. वास्तवात मात्र, आपत्कालीन क्रमांक निव्वळ शोभेसाठीच असल्याचा अनुभव सातारकरांना आला.

ठळक मुद्देअग्निशामकच्या मर्यादा स्पष्ट। आपत्कालीन क्रमांकांना प्रतिसादच नाही --संडे हटके बातमी

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : पावसाळ्यात आपत्कालीन विभाग सज्ज असल्याचा गाजावाजा केला जातो. वास्तवात मात्र, आपत्कालीन क्रमांक निव्वळ शोभेसाठीच असल्याचा अनुभव सातारकरांना आला. इनर्व्हटरच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर लाईट, हेल्मेट आणि मास्कशिवाय अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. कोणत्याही पुरेशा साधन सामूग्रीशिवाय मिळविलेलं हे नियंत्रण धोकादायक आणि अशास्त्रीय असेच होते.

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पोवई नाक्यावरील स्टेशनरीच्या दुकानात इनर्व्हटरचा स्फोट झाला. या स्फोटात कुणाल कदम आणि यश दगडे हे दोन युवक गंभीर जखमी झाले. स्फोटाचा आवाज आल्यानंतर रात्री उशिरा परिसरात असणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काहींनी आपत्कालीन व्यवस्थेसाठी सज्ज असणाºया शासकीय यंत्रणांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही तत्काळ प्रतिसाद दिला नाही. घटना घडल्याक्षणी याबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठीही काहींनी फोन केले. मात्र, त्यांच्यापैकी कोणालाच यश आले नाही. अखेर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क झाल्यानंतर तातडीने सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या आणि उपचार मिळाले.

स्फोट झालेल्या ठिकाणी अग्निशमन दलाचा बंब वाजत गाजत पोहोचला खरा; पण अपुºया साहित्यासह. दुकानातील वायरचे अर्थिंग होऊन टिणग्या उडत होत्या. बॅटरीतून विचित्र वासाचा धूर बाहेर पडत होता. या धुरामुळे समोरचे काही दिसत नव्हते. विशेष म्हणजे या बंबाला ना लाईट होती, ना टॉर्च. आग विझविण्यासाठी आलेल्या जवानांकडे या धुरापासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी साधा मास्कही उपलब्ध नव्हता. तोंडाला साधे रुमाल बांधून हे जवान धुराच्या लोटावर पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते. अग्निशमन बंबासोबत असलेली टॉर्चही जवानांकडे नव्हती.

उपस्थित युवकांनी मोबाईल बॅटरीच्या साह्याने जवानांना दुकानाचा अंदाज घेण्यास मदत केली. बॅटरीतून बाहेर येणाºया धुरावर पाणी मारण्याऐवजी फॉग मारणे अपेक्षित होते. पण जिथं जवानांकडे मास्क, लाईट, हेल्मेट ही उपकरणे नव्हती तिथं फॉग असण्याची अपेक्षाच फोल ठरली. जवानांच्या जीवावर उदार होऊन ही आग विझविण्यात आली असली तरीही जवानांच्या जीवावरील धोका कायम आहेच. त्यामुळे आवश्यक त्या सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

वाहनचालक आपले!सातारा पालिकेत मुख्याधिकारी यांच्याबरोबर काही नागरिकांनी चर्चा करून अग्निशमन दलाकडे अपुरे साहित्य असल्याची माहिती दिली. यावर, ‘ही यंत्रणा पालिकेशी संलग्न नसल्यानेफक्त वाहनचालकाची जबाबदारी पालिकेकडे आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

स्फोटाचा आवाज आल्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. स्फोटामुळे दुकानाचे शटर तापले होते. उपस्थित सर्वांनी जिवाची पर्वा न करता युवकांना वाचवले. मात्र, शासकीय यंत्रणा कुचकामी असल्याचं यावेळी जाणवलं. वेळेत फोन न उचलणं, दिरंगाईची उत्तर यामुळे जखमींना मदत मिळायला थोडा उशीरच झाला.- अशोक घोरपडे, प्रत्यक्षदर्शी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग