शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

पोलिसांसाठी खबऱ्यांचे सक्षम नेटवर्क गरजेचे --- सजन हंकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:53 PM

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या आपल्या नात्यातील लोकांकडून घडत असतात. या रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. - सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद - गुन्हा घडण्यापूर्वीच आरोपी सापडतील

दत्ता यादव ।पोलिसांची मदार सर्वसामान्य नागरिक आणि खबऱ्यांवर असते. हे लोक सतर्क असतील तर शंभर टक्के गुन्हे घडतच नाहीत. कोणत्याही प्रकारचे गुन्हे रोखायचे असतील तर त्यासाठी खबºयांचे नेटवर्क अत्यंत मजबूत असायला हवे. खबºयांचे नेटवर्क स्ट्राँग करण्यासाठी पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी अनोखी पद्धत अवलंबली असून, यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचित...

प्रश्न : गुन्हे घडूच नयेत, यासाठी काय करायला हवं?उत्तर : चार भिंतीच्या आत गुन्हे घडले तर ते बाहेर समजणे फार जिकिरीचे असते; परंतु सार्वजनिक ठिकाणी घडत असलेले बहुतांश गुन्हे नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळत असतात. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांचे सौहदर्याचे संबंध हवेत. यापेक्षाही पोलिसांसाठी खबºयांचे नेटवर्क महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

प्रश्न : खबºयांबाबत आपण वेगळी पद्धत काय अवलंबत आहात?उत्तर : प्रत्येक गावात एक तरी खबरी पोलिसांना ठेवावा लागतो. त्याच्याशी सतत संपर्क साधून त्याच्या अडीअडचणीला आम्हाला धाव घ्यावी लागते. पोलिसांबाबत त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला जातो. तुझे काम हे दलाली नसून, कर्तव्य आहे. हे त्याला समजावून सांगितले जात आहे. त्यामुळे खबºयांचे नेटवर्क चांगले झाले आहे. कास पठारावर लूटमार करणारी टोळी असो की, दुचाकी चोरणारी टोळीचा उलगडा हा केवळ खबºयांमार्फतच झाला. यापुढे आणखी खबºयांचे नेटवर्क चांगले करण्यासाठी आमची टीम प्रयत्नशील राहणार आहे.

प्रश्न : कोणत्या गुन्ह्यांचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे?उत्तर : पूर्वी दरोड्याचे प्रमाण जास्त होते. मात्र, अलीकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना लक्षणीय घडत आहेत. तसेच मारामारी, छेडछाडीचे प्रकारही घडत असतात. यातील बहुतांश गुन्हे हे परस्परांच्या द्वेषभावनेतून तक्रारी केलेले असतात. त्यामुळे या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त दिसत आहे. पोलीस ठाण्यात आल्यानंतर आम्ही अनेक कुटुंबांचे समुपदेशही करत असतो.जिल्ह्यात आठ वर्षांचा अनुभवपोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना सातारा जिल्ह्यात काम करण्याचा आठ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे पाळेमुळे शोधून काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. महाबळेश्वर, रहिमतपूर, फलटण या ठिकाणीही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी शंभरहून अधिक जणांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 

सर्वसामान्यांना चांगली वागणूकपोलीस ठाण्यात आलेला प्रत्येक माणूस हा आरोपी नसतो. तो मुळातच पीडित असतो. त्यामुळे त्याच्याशी आपुलकीने वागले पाहिजे. त्याचे म्हणणे नेमके काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. माझ्यासह आमची टीम यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. जो गुन्हेगार आहे, तो पोलिसांच्या नजरेतून कधीच सुटत नाही. त्याच्या डोळ्यातून आम्हाला सर्व समजते. सर्वसामान्यांना पोलिसांकडून कधीच त्रास होत नसतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPolice Stationपोलीस ठाणे