शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

मंदिरांवरून महाबळेश्वरवाडी नाव

By admin | Updated: March 27, 2015 23:59 IST

निसर्गरम्य ठिकाण : दोन्ही महायुद्धांत अनेक सुपुत्रांचा सहभाग

सिद्धार्थ सरतापे - वरकुटे मलवडी  ता. माण या गावापासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर आणि श्री भोजलिंग डोंगराच्या जवळ निसर्गरम्य परिसरात वसलेल्या महाबळेश्वरवाडीला ऐतिहासिक महत्त्व आहे. या गावाच्या उत्तरेस स्वयंभू श्री महादेवाचे मंदिर तर पूर्वेस हेमाडपंथी हरिश्वराचे मंदिर आहे. या दोन्ही देवांच्या मंदिरावरूनच पुढे महाबळेश्वरवाडी हे नाव रुढ झाले. महाबळेश्वरवाडी हे महाबळेश्वरप्रमाणेच निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील तलावामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली आली आहे. तसेच चार गावांच्या पाणीपुरवठा योजना येथील तलावावर चालतात. येथील अनेक सुपुत्रांनी पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. तसेच आजही अनेकजण सैन्यात कार्यरत आहेत. महाबळेश्वरप्रमाणेच हे गाव उंचावर वसलेली आहे. या गावातील अनेकजण सैन्यात कार्यरत होते व आहेत. पहिल्या महायुद्धात मालोजी तुकाराम कोरेडे सहभागी झाले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात धोंडिराम सखाराम घोरपडे, मारुती सखाराम घोरपडे हे दोघे बंधू सहभागी होते. त्यांच्याबरोबरच ज्ञानू सावळाराम जगताप, कृष्णा महादू काटकर, कुंडला कृष्णा जेडगे, सुदाम बापू पुकळे, पांडुरंग दादू जेडगे यांचाही सहभाग होता. १९६२ मध्ये चिनबरोबर आपले युद्ध झाले. त्यामध्ये बाबासाहेब मालोजी कोरडे यांनी सहभाग घेतला होता. १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात बाबासाहेब लहू निंबाळकर आणि प्रभाकर मारुती निंबाळकर यांनी चिनी सैन्याचा मुकबला केला होता. अशा प्रकारे एकूण २६ जणांनी देशाची सेवा केली आहे. आजही या गावातील अनेकजण देशसेवेत कार्यरत आहेत. महाबळेश्वरवाडी गावातील बाळासाहेब कुंडलिक जगताप हे श्रीलंका येथे शांतीसेनेतून गेले होते. त्यानंतर कारगिल युद्धातही त्यांनी मोलाचा सहभाग घेतला होता. याशिवाय कॅप्टन महादेव जगन्नाथ निंबाळकर आणि सुभेदार मेजर उत्तम चंद्रू पुकळे या सारख्या जवानांनी उच्चपदावर काम केले आहे. ब्रिटिश सरकारचा ‘जंगी ईनाम’ महाबळेश्वरवाडीच्या गजीढोल पथकाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. कुरुंदवाडी येथील यात्रेतील स्पर्धेत महाबळेश्वरवाडीच्या पथकाने ‘सोन्याचं कडं’ जिंकून आणले होते, असे सांगण्यात येते. याच गावातील मालोजी कोरडे यांना ब्रिटिश सरकारतर्फे ‘जंगी ईनाम’ म्हणून महिना पाच रुपये त्यांच्या तीन पिढ्यांकरिता जाहीर झाला होता. महाबळेश्वरवाडीचा हा स्वाभिमान आहे, असे येथील जवान छातीठोकपणे सांगतात. सत्तर जण गलई व्यवसायात...येथील अनेकजण सैन्यात आहेत. तसेच सुमारे सत्तर जण गलई (आटणी) व्यवसायात आहेत. देशभर ते विखुरले आहेत. पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात ते सोने-चांदीचा व्यवसाय करीत आहेत.