शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर प्रथमच नगरपालिकेची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST

सातारा : स्वाभिमान दिनाचे औचित्य साधून सातारा पालिकेने मंगळवार, दि. १२ रोजी किल्ले अजिंक्यताऱ्यावर विशेष सभेचे आयोजन केले आहे. ...

सातारा : स्वाभिमान दिनाचे औचित्य साधून सातारा पालिकेने मंगळवार, दि. १२ रोजी किल्ले अजिंक्यताऱ्यावर विशेष सभेचे आयोजन केले आहे. किल्ल्यावर प्रथमच होणाऱ्या या सभेला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून, सभेत किल्ल्याच्या संवर्धनाबाबत चर्चा केली जाणार आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून सातारा शहराची स्थापना केली. दि. १२ जानेवारी रोजी त्यांचा किल्ले अजिंक्यताऱ्यावर राज्याभिषेक झाला होता. शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी हा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो. अजिंक्यतारा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असल्याने किल्ल्यावरील राजसदरेवर पालिकेची एक तरी सभा व्हावी, अशी अपेक्षा शिवप्रेमींनी अनेकदा व्यक्त केली होती. त्यानुसार मंगळवारी प्रथमच किल्ल्यावर पालिकेकडून विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील अजिंक्यतारा किल्ल्यावर सभा घेण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या होत्या. सकाळी दहा वाजता होणाऱ्या या सभेत अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनावर चर्चा केली जाणार असून, किल्ल्याच्या विकासाचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविला जाणार आहे. नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पालिकेतील सर्व महिला सभापती, नगरसेवक व कर्मचारी या सभेला उपस्थित राहणार आहेत.