शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महावितरणच्या दरवाढीचा वीज ग्राहकांना झटका : वीज वापराच्या दुप्पट बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:56 PM

मलकापूर : सध्या वीज वापर ही घराघरातील आवश्यक गरज बनली आहे. एका बाजूला गरज तर दुसऱ्या बाजूला विजेच्या वाढत्या बिलामुळे ही गरजच आज सर्वसामान्यांची डोकेदुखी बनली आहे.

ठळक मुद्देस्थिरसह इतर आकारांचा चढता आलेख

मलकापूर : सध्या वीज वापर ही घराघरातील आवश्यक गरज बनली आहे. एका बाजूला गरज तर दुसऱ्या बाजूला विजेच्या वाढत्या बिलामुळे ही गरजच आज सर्वसामान्यांची डोकेदुखी बनली आहे. प्रती युनिट वीजदराने होणाºया वापराचे बिल एकपट व वाढलेल्या स्थिर आकारासह इतर आकाराच्या वाढीव टक्केवारीमुळे तेच बिल दुप्पट होत आहे. त्यामुळे वीज वापर एकपट तर बिल दुप्पट झाल्याने ग्राहकांना महावितरणचा चांगलाच झटका बसत आहे.

महावितरणने गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आकारात सातत्याने वाढ केली आहे. घरगुती वापराच्या मीटरसाठी मार्च २०१७ मध्ये स्थिर आकार ५५.०० एवढा होता. तोच दोन-चार रुपयांनी वाढत वर्षअखेरीस ६० रुपयांवर पोहोचला. एप्रिल व मे महिन्यात टप्प्याटप्प्याने वाढ होऊन ६५ रुपये आकारणी झाली. यापुढे झपाट्याने वाढ होत आॅक्टोबर २०१८ मध्ये १५ रुपयांची वाढ करून स्थिर आकार ८० रुपयांवर पोहोचला आहे. प्रत्येक महिन्यात आलेल्या बिलातील देयकांचे बारकाईने वाचन केल्यास नवनवीन इतर आकाराचा सातत्याने चढता आलेख ठेवला असल्याचेच दिसून येत आहे.

यापूर्वी एका नवीन आकाराची भर टाकली होती. त्या नवीन आकाराचे नाव वहन आकार आहे. तो १.१८ रुपये पर युनिट असा आकारला जातो. म्हणजेच प्रतीयुनिट वीज दरातच अप्रत्यक्षरीत्या वाढ होते. ३ रुपयांचा दर ४.१८ वर जातो. अशाच पद्धतीने दराच्या प्रत्येक स्लॅबमध्ये भरमसाठ वाढ होत आहे. त्यातच वीज आकार, वीज शुल्क व इतर आकार अशा नवनवीन आकारांची वाढती टक्केवारी दिवसेंदिवस वीज ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार घडत आहे. त्या वेगवेगळ्या आकारांमुळे मागील बिलाच्या एकूण ४० ते ५० टक्क्यांनी वीजबिलात वाढ झालेली आहे. त्यामुळे पूर्वी चारशे ते साडेचारशे येणारे बिल या वाढीव आकारांमुळे तेच बिल आज आठशे ते नऊशे रुपये येत आहे.

वीज वापर तेवढाच होत असताना बिल मात्र दुप्पट होत आहे. महावितरण कंपनी प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता आकार वाढवून अक्षरश: सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे चित्र आहे. तर याउलट शासकीय कर्मचारी व बडीबडी मंडळीसारखे बहुतांशी ग्राहक या दरवाढीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. अशा पद्धतीने अचानक केलेली वीजबिल वाढ सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र दरवाढीच्या जात्यात भरडला जात आहे. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवनवीन आकारात भरच पडणार आहे. तरी या वाढत्या बिलांविरोधात सामाजिक संघटनांनी आवाज उठवणे गरजेचे आहे.वीज बिलात दराबाबत भिन्नतामहाराष्ट्रात ० ते १०० युनिटसाठी ३ रुपये, १०१ ते ३०० युनिट ६.७३ रुपये, ३०१ ते ५०० युनिट ९.७५ रुपये वीजदर आहेत. तर तेच दिल्लीमध्ये ० ते २०० युनिटसाठी २ रुपये व २०० युनिटच्या वर २.९७५ ते ३ रुपये एवढा दर आहे. याशिवाय ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते त्यात ५० टक्के माफ केले जाते. या फरकामुळे महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी २ हजार ९०० रुपये भरावे लागतात. तर दिल्लीवाले तेवढ्याच युनिटसाठी १ हजार १०० रुपये भरतात. ही एकाच देशातील दोन राज्यांत वीजदरात तफावत आहे.स्थिर आकाराचाचढता आलेखमार्च २०१७ - ५५ "एप्रिल २०१७ - ५९ "मे २०१७ - ६० "एप्रिल २०१८ - ६२ "मे २०१८ - ६५ "आॅक्टोबर २०१८ - ८० "

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण