शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

खासदारांनी बदनामांना घेऊन फिरणं थांबवावं : दिलीप येळगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:35 IST

दोन महिन्यांपूर्वी भाजपला नावं ठेवणारे माणचे आमदार स्वत:वरील गुन्ह्यातून वाचावं म्हणून सध्या धडपड करत आहेत, अशी टीका करतानाच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी भाजपचे नूतन खासदार मित्रप्रेम म्हणून बदनाम, किंमत नसणाऱ्यांना घेऊन फिरत आहेत. खासदारांनी आता हे बदलेलं वागणं थांबवायला हवं, असा सल्लाही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिला.

ठळक मुद्देखासदारांनी बदनामांना घेऊन फिरणं थांबवावं : दिलीप येळगावकरमाणच्या आमदारांची गुन्ह्यातून वाचण्यासाठी धडपड

सातारा : दोन महिन्यांपूर्वी भाजपला नावं ठेवणारे माणचे आमदार स्वत:वरील गुन्ह्यातून वाचावं म्हणून सध्या धडपड करत आहेत, अशी टीका करतानाच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी भाजपचे नूतन खासदार मित्रप्रेम म्हणून बदनाम, किंमत नसणाऱ्यांना घेऊन फिरत आहेत. खासदारांनी आता हे बदलेलं वागणं थांबवायला हवं, असा सल्लाही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिला.येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे माण आणि खटाव तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार डॉ. येळगावकर म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात तिसरी आघाडी झाली होती. त्यातून संजय शिंदे यांनी काढता पाय घेतल्याने आघाडीला भवितव्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे माणच्या आमदारांनी पळवाट शोधली.

त्यांच्यावर खंडणी तसेच इतर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यातून वाचण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. पण, आमदारांची खटाव तालुक्यातील संघटना पूर्णपणे विस्कळीत झालीय. त्यांनी केलेले माण आणि खटावचे काँग्रेसचे अध्यक्षही त्यांच्याकडे राहिले नाहीत. राजकारणातील त्यांचा हा शेवटचा खटाटोप आहे.खºया अर्थाने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले. माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांचेही योगदान आहे. पण, आमदार गोरे म्हणतात मीच सर्व केलं.

माण विधानसभा मतदारसंघात खटाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट व एक नगरपंचायत असतानाही खटावने १० हजार ४४१ चं रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना मताधिक्य दिले. तर माणमध्ये संपूर्ण तालुका असताना व आमदारांसह शेखर गोरे असूनही भाजपला केवळ १२ हजार ७७४ चं मताधिक्य मिळालं.

आंधळी, बिदाल जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी भाजप उमेदवाराच्या थोडी मागे आहे. म्हसवड पालिका शेखर गोरे यांच्याकडे, दहिवडी नगरपंचायत आमदारांकडे मग मते कोठे गेली ? असा सवालही डॉ. येळगावकर यांनी केला.आमदारांनी शेती व पाण्याचा एकही नवा प्रकल्प आणला नाही. सतत उरमोडी योजनेचे पाणी नाचवायचे असे सांगून डॉ. येळगावकर पुढे म्हणाले, माणच्या क्रीडा संकुलाची जागा ताब्यात नाही. त्यांच्या कामाचा पर्दाफाश हा कामानेच करणार आहे.

एक टेलरमेड नेता म्हणून त्यांचे काम सुरु आहे. निवडणुकीच्या शेवटच्या तीन दिवसांत तर आमदारांनीच सर्व यंत्रणा हायजॅक केलेली. आम्हाला पोलींग एजंटचा फॉर्मही दिला नाही. मतदारांसाठी वाहन व्यवस्था नव्हती. पण, आम्ही ही सर्व यंत्रणा उभी केली.हे बरोबर नाही...माण तालुक्यातील दुष्काळ दौरा नूतन खासदार सोमवारी करणार होते. त्याचे नियोजन अगोदरच झाले. पण, आम्हाला फोन सकाळी येतो. खासदारांचं वागणं आता बदलायला लागलंय. त्यांनी तसं करु नये असं आम्हाला वाटतं. कारण, भाजप पक्षानं भल्याभल्यांना घरी बसवलंय. काल कार्यक्रम ठरवता अन् आज आम्हाला सांगता हे बरोबर नाही, असा इशारा वजा सल्लाही डॉ. येळगावकरांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :Ranjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरSatara areaसातारा परिसर