शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सगळे आमदार कामाला लागलेत, यावरून समजून जा; सुप्रिया सुळेंचं 'सूचक' विधान

By प्रमोद सुकरे | Updated: October 1, 2022 13:07 IST

कोण बंदूक काढतयं. कोण ‘ओके, खोके’ घोषणा दिल्यावर तुम्हाला पाहिजे का? विचारतय. काय चाललय काय?

कऱ्हाड : कोण बंदूक काढतयं. कोण ‘ओके, खोके’ घोषणा दिल्यावर तुम्हाला पाहिजे का? विचारतय. काय चाललय काय? राज्यातील सत्ता गेली त्याचं दु:ख नाही; पण या ईडी सरकारने राज्याची जी थट्टा चालवली आहे त्याने मन व्यथित होत आहे, असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सायंकाळी आयोजीत पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर, नंदकुमार बटाणे, प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.सुप्रिया सुळे म्हणाल्या, आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना या सरकारने स्थगिती दिली आहे. आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मग नेमकं चाललय तरी काय? शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. कोरोनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना मदत मिळत नाही. त्यामुळे हे ईडी सरकार असंवेदनशिलच आहे, असे म्हणावे लागते.सर्व खासगी शाळांच्या शिक्षकांना सरकार पगार देईल. तुम्ही फी कमी करा, असे काही दिवसांपुर्वी राज्याचे शिक्षणमंत्री म्हणाले आहेत. याकडे लक्ष वेधले असता सुळे म्हणाल्या, त्यांचे शिक्षणाबाबतचे नेमके धोरण काय आहे, हे त्यांनी जाहीर करावे. ते जर सर्वांचे पगार देणार असतील तर आम्ही स्वत: त्यांचे अभिनंदन करु. तसेच नविन शैक्षणिक धोरणाबद्दल शिक्षणतज्ञांची टोकाची मते आहे. तर शिक्षण संस्था चालक अस्वस्थ असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.... पण राज्यातले आमदार कामाला लागलेत!सरकार किती दिवस टिकेल, याबाबत विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते देवाला माहीत. मात्र, राज्यातले सगळ्या पक्षाचे आमदार आपापल्या मतदार संघात कामाला लागले आहेत. यावरुन तुम्ही काय समजायचं ते समजा, असंही त्यांनी मुद्दाम सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSupriya Suleसुप्रिया सुळेEknath Shindeएकनाथ शिंदे