शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

कास भूमिपुत्रांसाठी आंदोलन करणार

By admin | Published: June 22, 2017 1:03 AM

शिवेंद्रसिंहराजे : पाचगणीत कारवाई का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘सातारा-कास रस्त्यावरील स्थानिक भूमिपुत्रांनी स्वत:च्या वाडवडिलोपार्जित जागेवर छोटे-मोठे हॉटेल, व्यवसाय करून उपजीविकेचा मार्ग शोधला आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल,’ अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत घेतली. ते म्हणाले, ‘पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सातारा ते कास रस्त्यावरील अनधिकृत बांधकामाची शोधमोहीम सुरू केली होती. या शोध मोहिमेनंतर स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरण्याचे काम महसूल खात्यातील काही कर्मचारी करीत आहेत. मात्र, हेच कर्मचारी बड्या धेंडांच्या समर्थकांच्याबाबत मूग गिळून गप्प आहेत. अशांच्या पाठीशी आम्ही कदापिही नाही. ज्या भूमिपुत्रांनी स्थानिक पातळीवर वित्तसंस्थेचे कर्ज घेऊन उद्योगाची उभारणी केली आहे. त्यामुळे पर्यटकांची सोय झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे येथील स्थानिकांनी अनेक सुविधा देण्यासाठी स्वत:च्या जमिनी विकल्या आहेत. दागिने गहाण ठेवले आहेत. तसेच बँकांचे कर्ज काढले आहे. अशांवर कारवाई झाल्यास त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणाने सातारकर उभे राहतील. या परिसरात बेकायदेशीररीत्या वीजजोडणी, पाणी नळजोडणी ज्यांनी केली आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करून दाखवावी. आम्ही जी भूमिका घेतली ती फक्त स्थानिक भूमिपुत्रांसाठीच आहे. या ठिकाणी उद्योग व्यवसाय नसल्यामुळे पुणे, मुंबई शहरात स्थलांतरीत व्हावे लागले आहे. आता उद्योग व्यवसायाची उभारणी करताना कायदा व नियमाची आठवण करून दिली जाते. पण पाचगणी, लोणावळा, उल्हासनगर या परिसरात अशाच पद्धतीने केलेल्या अतिक्रमणाबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. उलट वनखात्याच्या जमिनीवर इमारती उभ्या करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करून संरक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर ज्यांचे अतिक्रमण असेल अशाच स्थानिकांबाबत दंडात्मक कारवाई केल्यास आम्ही विरोध करणार नाही. मात्र, याचा गैरअर्थ घेऊन जिल्हा प्रशासन जर धनदांडग्यांना पाठीशी घालत असेल तर खपवून घेणार नाही, असाही इशारा दिला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सातारा सभापती मिलिंद कदम, स्थानिक भूमिपुत्र विजय माने, सोमनाथ जाधव, शंकरराव जांभळे, नीलेश जाधव, लक्ष्मण गोगावले, केशव जगताप, संतोष माने, संतोष आटाळे, राम पवार, संपत जाधव, श्रीपती गोगावले आदी उपस्थित होते. भाजपही भूमिपुत्रांसोबत कास परिसरातील बांधकामांवर निर्बंध घालून कारवाई सुरू केल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. याबाबत भारतीय जनता पक्ष या लोकांसोबत ठामपणे उभा राहिला आहे. या प्रश्नावर मतभेद अथवा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आम्ही लढणार आहोत, अशी माहिती भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी जिल्हाधिकाऱ्यां-सोबत झालेल्या चर्चेवेळी दिली.