शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

दिल्ली जळताना मोदी स्वागतात । पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 12:07 AM

सातारा : ‘दिल्ली जळत असतान ट्रम्प यांचे आदरातिथ्य करण्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मग्न झाले होते. तर केंद्रीय गृहमंत्री ...

ठळक मुद्देदंगलीत ४२ जणांची हत्या झाल्याचा आरोपदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे ठराविक अधिकार आहेत

सातारा : ‘दिल्ली जळत असतान ट्रम्प यांचे आदरातिथ्य करण्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मग्न झाले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जबाबदारी पाळलेली नाही. देशाची प्रतिमा धुळीला मिळविण्याचे काम या जोडगोळीने केले आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

येथील काँगे्रस कमिटीमध्ये शनिवारी आयोजित कार्यकर्ता मेळावा व नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, !एनएसयूआय’राष्ट्रीयचे सरचिटणीस शिवराज मोरे, सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, अजित पाटील-चिखलीकर, साहेबराव जाधव, प्रदेश प्रतिनिधी रजनी पवार, बाबूराव शिंदे, अविनाश फाळके, जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक उपस्थित होती.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे ठराविक अधिकार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा अधिकार त्या मुख्यमंत्र्यांना नाही. ही संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. दिल्लीमध्ये शांतता राखण्यात अमित शहा यांना पूर्णत: अपयश आलेले आहे. गुजरात राज्यातील २००२ मध्ये झालेल्या दंगलीवरून तत्कालीन मुख्यमंत्री मोदी, गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेवर अठरा वर्षे झाली तरी प्रश्न चिन्ह आहे. हीच जोडगोळी केंद्रात कार्यरत आहे. दिल्लीमध्ये नाहक ४२ जणांचा बळी गेला. विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचे काम भाजप करत आहे. निवडणुकांमध्ये एका मागून एक पराभव होत असताना राजकीय पोळी भाजून घेण्याच्या उद्देशाने नागरिकत्व कायदा आणला जात आहे. सीएए कायदा हा दोषपूर्ण असा असून, सर्व जाती यात पोळल्या जाणार असल्याने काँगे्रसने कायद्याला तीव्र विरोध केलेला आहे.’

मोदी सरकारमुळं भविष्य अंधारातदेशाची आर्थिक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. बेरोजगारी, महागाईने डोके वर काढलेले आहे. जीएसटी योग्य पद्धतीने गोळा होत नाही. केंद्राकडून राज्याला देण्यात येणारा कराचा वाटाही वेळेत दिला जात नाही. भाजप सरकारचं पितळ आता पूर्णत: उघडे पडले असून, युवकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. या परिस्थितीत काँगे्रसला ऐतिहासिक जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असे भाष्यही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केले.

 

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आत्तापासूनच बांधणी करणे आवश्यक आहे. युवक काँगे्रसच्यावतीने जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याची तयारी करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात, त्या ३० गटांचा रोड मॅप तयार केला असल्याची माहिती युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी यावेळी दिली.

 

  • जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व आमदार जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय किरण बर्गे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर अजित पाटील-चिखलीकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश फाळके हे दोघे व्यासपीठावरून खाली उतरले. चिखलीकर आणि फाळके यांनी आपल्या कृतीतून बर्गे यांच्याविषयीची नाराजी व्यक्त केल्याची कुजबूज उपस्थितांमधून सुरू होती.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण