शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यावरील परसबागेतील आमराई मोहराने फुलली, मान्याचीवाडी ग्रामस्थांचा अनोखा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:15 IST

रवींद्र माने ढेबेवाडी : गाव परिसरातील शेकडो वर्षांच्या जुन्या वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच नवीन वृक्षलागवड करुन मान्याचीवाडी गावाने वृक्षसंपदेचे जतन केले ...

रवींद्र मानेढेबेवाडी : गाव परिसरातील शेकडो वर्षांच्या जुन्या वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच नवीन वृक्षलागवड करुन मान्याचीवाडी गावाने वृक्षसंपदेचे जतन केले आहे. गावातील सांडपाण्यावर लावलेल्या परसबागांमध्ये लागवड केलेल्या आंब्याच्या बागा मोहराने फुलल्या आहेत. यावर्षी आंब्याचे विक्रमी उत्पन्न मिळेल, असा विश्वास येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला.काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाचा फटका बसू लागल्याने मान्याचीवाडी येथील काही शेतकऱ्यांनी बांधावर तर काहींनी शेतात फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. बहुतेक शेतकऱ्यांनी गाव परिसरात वाहून जाणाऱ्या सांडपाण्याचा पुर्नवापर करण्याचा निर्धार केला.त्यानुसार आंबा, चिक्कू, शेवगा, लिंबू, साग, फणस आदी फळझाडांची निवड केली. त्यासाठी गावातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटाराच्या बाजूला असलेल्या शेतजमिनीची निवड केली. त्यामध्ये ही वृक्षलागवड केली. घरातील आंघोळीचे, धुण्या-भांड्याचे बंदिस्त गटारांच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी थेट या झाडांना न देता गटारमध्ये स्क्रिनिंग चेंबर घेऊन शुद्ध पाणी बागेतील फळझाडांना दिले.गावातील सांडपाणी कुठेही ओढ्याला अथवा नदीला न सोडता त्याचा पुनर्वापर करत येथील शेतकऱ्यांनी परसबागा फुलवल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडलीच शिवाय सांडपाण्यापासून होणारे प्रदूषण टाळण्यासही मदत झाली. सांडपाण्यावर आणि सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादित केलेल्या येथील आंबा, चिक्कू आणि लिंबू या फळांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे येथील शेतकरी सांगतात.यावर्षी चिक्कूही मोठा भाव खाऊन गेला, तर येणारा आंबा हंगाम भरभराट करून जाईल, असा अंदाज असून, सांडपाण्यावर तयार केलेल्या परसबागा मोहराने फुलल्या आहेत.

विजेशिवाय वृक्ष जतनगावातील सांडपाणी बंदिस्त गटाराद्वारे दोन ठिकाणी वाहून जाते. त्याच मार्गावर या फळबागांचे नियोजन केले आहे. तेथे शेतकरी आपापल्या बागांना आळीपाळीने पाणी देतात. त्यामुळे विजेशिवाय वृक्षलागवडीचा यशस्वी प्रयोग मान्याचीवाडीत यशस्वी झाला आहे.

माझी वसुंधरा अभियानातही वृक्षलागवड...ग्रामस्थांनी दिवंगतांच्या स्मरणात तसेच महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण तसेच नवदाम्पत्यांनी नवीन संसाराची सुरुवात वृक्षारोपणाने करावी, असे नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी केले आहेत. यावर्षी माझी वसुंधरा अभियानांतर्गतही बांधावरची वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

सांडपाणी हे आरोग्यासाठी धोकादायक असते. त्याची विल्हेवाट न लावल्यास प्रदूषण होऊन साथीच्या आजारांचा फैलाव होऊ शकतो. यासाठी प्रत्येक गावाने सांडपाण्याचे नियोजन तसेच त्यासाठी भूमिगत गटार व्यवस्था करायला हवी. सांडपाण्याचा पुनर्वापर केला तर उत्पन्नही मिळू शकते. - दिलीप गुंजाळकर, माजी उपसरपंच, मान्याचीवाडी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर