शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

चिंता मिटली, सातारा जिल्ह्यातील धरणे भरली

By नितीन काळेल | Updated: August 29, 2024 19:00 IST

सातारा : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत असून पश्चिमेकडे जोर अधिक राहिला. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर ...

सातारा : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत असून पश्चिमेकडे जोर अधिक राहिला. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. धरणे काठावर आली आहेत. तसेच कोयना, धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर भरले आहे. यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. यासाठी मान्सूनच्या पावसाकडे सर्वांच्याच नजरा असतात. जून महिन्यात वेळेवर पाऊस सुरू झाला तर पुढे फारशी चिंता राहत नाही. कारण, पेरण्यांना वेळेवर सुरूवात होते. तसेच धरण, पाझर तलावातही पाणीसाठा वाढतो. मागीलवर्षी मात्र, पावसाने चिंता वाढवली होती. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला होता. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी या सारखी मोठे पाणीप्रकल्प भरले नव्हते. तर पाऊस कमी झाल्याने दुष्काळस्थिती निर्माण झालेली. दुष्काळ निवारणासाठी या मोठ्या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले. त्यावेळी धरणे तळाला गेली होती. त्यामुळे यंदा धरणे भरणार का ? अशी चिंता होती. पण, मागील तीन महिन्यांत सतत पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे.

पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी असे प्रमुख सहा मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात १४८.७६ टीएमसी पाणीसाठा होतो. तर पूर्व भागातही नेर, आंधळी, पिंगळी, राणंद, येळीव असे लहान प्रकल्प आहेत. यावर्षी या सर्वच प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. पश्चिमेकडील सर्वच प्रमुख धरणे काठावर आली आहेत. या सहा प्रकल्पात सध्या १४५.४५ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणे भरल्यातच जमा आहे. त्यातच पाऊस होत असल्याने धरणात आवक कायम आहे. पण, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करावा लागतोय. सर्वात मोठे कोयना धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता धरणाची आहे. या धरणातील पाणीसाठा १४३ टीएमसीवर गेला आहे. हे धरण ९८.२५ टक्के भरलेले आहे. तसेच धोम, बलकवडी, तारळी, उरमोडी ही धरणेही काठावर आलेली आहेत. यामुळे विसर्ग करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील धरण पाणीसाठा (टीएमसीमध्ये)धरण - यंदा साठा - टक्केवारी - एकूण क्षमताकोयना - १०३.४१ - ९८.२५ - १०५.२५धोम - १३.०९ - ९६.४५ - १३.५०बलकवडी - ३.९३ - ९६.१९ - ४.०८कण्हेर - ९.६९ - ९५.७२ - १०.१०उरमोडी - ९.६० - ९६.२२ - ९.९६तारळी - ५.७३ - ९७.९४ - ५.८५

मागीलवर्षी १२२ टीएमसी पाणीसाठा..जिल्ह्यात मागीलवर्षी २८ आॅगस्टपर्यंत प्रमुख सहा प्रकल्पात १२१.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. यामध्ये तारळी, धोम, बलकवडी आणि कण्हेर धरणांत चांगला साठा होता. तर कोयना धरणात ८१ टक्क्यांवर पाणीसाठा होता. तर उरमोडी धरणात अवघे ६ टीएमसी पाणी होते. त्यातच सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झालेला. त्यामुळे धरणांत मोठ्या प्रमाणावर साठा वाढला नव्हता. परिणामी धरणे पूर्णपणे भरली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी