शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

चिंता मिटली, सातारा जिल्ह्यातील धरणे भरली

By नितीन काळेल | Updated: August 29, 2024 19:00 IST

सातारा : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत असून पश्चिमेकडे जोर अधिक राहिला. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर ...

सातारा : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत असून पश्चिमेकडे जोर अधिक राहिला. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. धरणे काठावर आली आहेत. तसेच कोयना, धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर भरले आहे. यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. यासाठी मान्सूनच्या पावसाकडे सर्वांच्याच नजरा असतात. जून महिन्यात वेळेवर पाऊस सुरू झाला तर पुढे फारशी चिंता राहत नाही. कारण, पेरण्यांना वेळेवर सुरूवात होते. तसेच धरण, पाझर तलावातही पाणीसाठा वाढतो. मागीलवर्षी मात्र, पावसाने चिंता वाढवली होती. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला होता. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी या सारखी मोठे पाणीप्रकल्प भरले नव्हते. तर पाऊस कमी झाल्याने दुष्काळस्थिती निर्माण झालेली. दुष्काळ निवारणासाठी या मोठ्या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले. त्यावेळी धरणे तळाला गेली होती. त्यामुळे यंदा धरणे भरणार का ? अशी चिंता होती. पण, मागील तीन महिन्यांत सतत पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे.

पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी असे प्रमुख सहा मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात १४८.७६ टीएमसी पाणीसाठा होतो. तर पूर्व भागातही नेर, आंधळी, पिंगळी, राणंद, येळीव असे लहान प्रकल्प आहेत. यावर्षी या सर्वच प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. पश्चिमेकडील सर्वच प्रमुख धरणे काठावर आली आहेत. या सहा प्रकल्पात सध्या १४५.४५ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणे भरल्यातच जमा आहे. त्यातच पाऊस होत असल्याने धरणात आवक कायम आहे. पण, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करावा लागतोय. सर्वात मोठे कोयना धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता धरणाची आहे. या धरणातील पाणीसाठा १४३ टीएमसीवर गेला आहे. हे धरण ९८.२५ टक्के भरलेले आहे. तसेच धोम, बलकवडी, तारळी, उरमोडी ही धरणेही काठावर आलेली आहेत. यामुळे विसर्ग करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील धरण पाणीसाठा (टीएमसीमध्ये)धरण - यंदा साठा - टक्केवारी - एकूण क्षमताकोयना - १०३.४१ - ९८.२५ - १०५.२५धोम - १३.०९ - ९६.४५ - १३.५०बलकवडी - ३.९३ - ९६.१९ - ४.०८कण्हेर - ९.६९ - ९५.७२ - १०.१०उरमोडी - ९.६० - ९६.२२ - ९.९६तारळी - ५.७३ - ९७.९४ - ५.८५

मागीलवर्षी १२२ टीएमसी पाणीसाठा..जिल्ह्यात मागीलवर्षी २८ आॅगस्टपर्यंत प्रमुख सहा प्रकल्पात १२१.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. यामध्ये तारळी, धोम, बलकवडी आणि कण्हेर धरणांत चांगला साठा होता. तर कोयना धरणात ८१ टक्क्यांवर पाणीसाठा होता. तर उरमोडी धरणात अवघे ६ टीएमसी पाणी होते. त्यातच सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झालेला. त्यामुळे धरणांत मोठ्या प्रमाणावर साठा वाढला नव्हता. परिणामी धरणे पूर्णपणे भरली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी