शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

चिंता मिटली, सातारा जिल्ह्यातील धरणे भरली

By नितीन काळेल | Updated: August 29, 2024 19:00 IST

सातारा : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत असून पश्चिमेकडे जोर अधिक राहिला. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर ...

सातारा : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत असून पश्चिमेकडे जोर अधिक राहिला. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. धरणे काठावर आली आहेत. तसेच कोयना, धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर भरले आहे. यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. यासाठी मान्सूनच्या पावसाकडे सर्वांच्याच नजरा असतात. जून महिन्यात वेळेवर पाऊस सुरू झाला तर पुढे फारशी चिंता राहत नाही. कारण, पेरण्यांना वेळेवर सुरूवात होते. तसेच धरण, पाझर तलावातही पाणीसाठा वाढतो. मागीलवर्षी मात्र, पावसाने चिंता वाढवली होती. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला होता. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी या सारखी मोठे पाणीप्रकल्प भरले नव्हते. तर पाऊस कमी झाल्याने दुष्काळस्थिती निर्माण झालेली. दुष्काळ निवारणासाठी या मोठ्या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले. त्यावेळी धरणे तळाला गेली होती. त्यामुळे यंदा धरणे भरणार का ? अशी चिंता होती. पण, मागील तीन महिन्यांत सतत पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे.

पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी असे प्रमुख सहा मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात १४८.७६ टीएमसी पाणीसाठा होतो. तर पूर्व भागातही नेर, आंधळी, पिंगळी, राणंद, येळीव असे लहान प्रकल्प आहेत. यावर्षी या सर्वच प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. पश्चिमेकडील सर्वच प्रमुख धरणे काठावर आली आहेत. या सहा प्रकल्पात सध्या १४५.४५ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणे भरल्यातच जमा आहे. त्यातच पाऊस होत असल्याने धरणात आवक कायम आहे. पण, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करावा लागतोय. सर्वात मोठे कोयना धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता धरणाची आहे. या धरणातील पाणीसाठा १४३ टीएमसीवर गेला आहे. हे धरण ९८.२५ टक्के भरलेले आहे. तसेच धोम, बलकवडी, तारळी, उरमोडी ही धरणेही काठावर आलेली आहेत. यामुळे विसर्ग करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील धरण पाणीसाठा (टीएमसीमध्ये)धरण - यंदा साठा - टक्केवारी - एकूण क्षमताकोयना - १०३.४१ - ९८.२५ - १०५.२५धोम - १३.०९ - ९६.४५ - १३.५०बलकवडी - ३.९३ - ९६.१९ - ४.०८कण्हेर - ९.६९ - ९५.७२ - १०.१०उरमोडी - ९.६० - ९६.२२ - ९.९६तारळी - ५.७३ - ९७.९४ - ५.८५

मागीलवर्षी १२२ टीएमसी पाणीसाठा..जिल्ह्यात मागीलवर्षी २८ आॅगस्टपर्यंत प्रमुख सहा प्रकल्पात १२१.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. यामध्ये तारळी, धोम, बलकवडी आणि कण्हेर धरणांत चांगला साठा होता. तर कोयना धरणात ८१ टक्क्यांवर पाणीसाठा होता. तर उरमोडी धरणात अवघे ६ टीएमसी पाणी होते. त्यातच सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झालेला. त्यामुळे धरणांत मोठ्या प्रमाणावर साठा वाढला नव्हता. परिणामी धरणे पूर्णपणे भरली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी