शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

सातारला शरद पवारांच्या प्रभावाची महायुतीतील नेत्यांना धास्ती! नेत्यांच्या मनोगतातून कार्यकर्त्यांनाही जाणीव

By प्रमोद सुकरे | Updated: April 10, 2024 08:42 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली असली, पुतण्यासह राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह महायुतीच्या सोबत असले तरी थोरल्या पवारांच्या जिल्ह्यातील प्रभावाची धास्ती मात्र आजही महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्याचे प्रत्यंतर मंगळवारी कराडात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यातही दिसून आले. 

-  प्रमोद सुकरे कराड - सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. सातारा जिल्हाही त्याला अपवाद नाही. सातारा जिल्हा तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा प्रभाव असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली असली, पुतण्यासह राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह महायुतीच्या सोबत असले तरी थोरल्या पवारांच्या जिल्ह्यातील प्रभावाची धास्ती मात्र आजही महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्याचे प्रत्यंतर मंगळवारी कराडात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यातही दिसून आले. 

एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता .पण सन १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.अन हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कधी झाला हे कोणालाही कळाले नाही. जिल्ह्यातील अपवाद वगळता सगळे आमदार, खासदार राष्ट्रवादीचे, जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेली जिल्हा बँक व स्थानिक स्वराज्य संस्थांवरही पवारांचा प्रभाव दिसून आला.

गत लोकसभा निवडणुकीतही उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर सातारची जागा लढवली आणि ते खासदार झाले. पण ४ महिन्यातच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला हे समजले नाही.या मतदारसंघात पोट निवडून झाली मात्र त्यानंतर राजेंनी पुन्हा भाजपचे कमळ हातात घेऊन मैदानात उडी मारलीच. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटलांनी त्यांचे विजयाचे काटे उलटे फिरवले. मग भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर संधी दिली हा तसा ताजाच इतिहास आहे.

सध्या उदयनराजे भोसले राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाल अजून बराच बाकी आहे. पण त्यांना लोकसभेची आस आहे. त्यामुळेच पुन्हा ते भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठीकठिकाणी मेळावे सुरू आहेत. असाच एक महायुतीचा मेळावा मंगळवारी कराडात झाला. महायुतीचे अनेक नेते या मेळाव्याला उपस्थित होते. पण अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त करताना पवारांच्या प्रभावाची धास्ती घेतल्याचे दिसून आले.

दस्तूरखुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आपण काहीही म्हटले तरी जिल्हा हा 'जाणत्या राजाला' मानणारा जिल्हा आहे. या मतदारसंघातील माणसं ही काही विचाराशी बांधली गेलेली आहेत. तेव्हा त्यांना त्या विचारापासून बाजूला करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा खासदार इथे निवडून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्याला उमेदवारी मिळेल त्याने सूक्ष्म नियोजन करून प्रचाराची गती वाढवावी लागेल.

'पवार भिजले, वातावरण फिरले'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनीही आपल्या भाषणात गत लोकसभेच्या आठवणींना उजाळा दिला. प्रचार सभेदरम्यान आलेल्या पावसात 'शरद पवार भिजले आणि सगळे वातावरण फिरले' असे त्यांनी आवर्जून सांगितले. जिल्ह्यातील शरद पवारांच्या प्रभावाची अप्रत्यक्ष त्यांनी आठवणच करून दिली.

त्यात यांनी वाढवली डोकेदुखीमहायुतीच्या मेळाव्यात अनेक वक्त्यांनी शरद पवारांच्या जिल्ह्यातील प्रभावावर वक्तव्ये केली.तो प्रभाव कमी करुन विजयाप्रत जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. पण महायुती बरोबर असणार्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पदाधिकार्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने, दांडी मारल्याने महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारsatara-pcसाताराmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीBJPभाजपा