शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Maharashtra Election 2019 : ...म्हणून मी निवडून आल्यावर लगेच राष्ट्रवादीची खासदारकी सोडली; उदयनराजेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 17:18 IST

Satara Election 2019 : अवघ्या चार महिन्यांत खासदारकी सोडणं, हा साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, अनेकांना तो पटलेला नाही.

ठळक मुद्देअवघ्या पाच महिन्यांत सातारा लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.अवघ्या चार महिन्यांत खासदारकी सोडण्याचा उदयनराजेंचा निर्णय अनेकांना पटलेला नाही.'माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी राष्ट्रवादी सोडली आणि खासदारकीचाही राजीनामा दिला

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होत आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम ठोकून खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे आणि त्यात भाजपाने उदयनराजेंनाच रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्या आणि सातारा जिल्ह्यातील भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी टीकाकारांना आपल्या शैलीत उत्तर दिलं. अवघ्या चार महिन्यांत खासदारकी सोडणं, हा साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, अनेकांना तो पटलेला नाही. हे ओळखूनच उदयनराजेंनी आज आपली या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. 

काही जण निवडणुका जवळ आल्या की पक्ष सोडतात. कुणाचं सरकार येणार हे पाहून त्या पक्षात जातात. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने चांगले निर्णय घेतले. ज्यांच्या आशीर्वादाने मी जिंकलो त्या मतदारांनाही या सरकारचं काम पटलं. मोदींसोबत गेला नाहीत, तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही, असंही काहींनी सांगितलं. त्यानंतर, माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी राष्ट्रवादी सोडली आणि खासदारकीचाही राजीनामा दिला, असं स्पष्ट करत उदयनराजेंनी मतांचा जोगवा मागितला.

कलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्यांनी देशात राहू नये; उदयनराजेंची राजे'शाही'

नरेंद्र मोदी 'आयर्न मॅन', उदनयराजेंकडून मोदींना सरदार पटेलांची उपमा

कलम ३७० चा मुद्दा महाराष्ट्रात कशाला?, असा प्रश्न करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी चपराक लगावली. महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशातील सर्व राज्यांसाठी हा मोठा निर्णय आहे. काँग्रेसचे सरकार असताना हा निर्णय घेतला गेला असता तर कित्येक सैनिकांचे प्राण वाचले असते, त्यांची कुटुंब सुखात असती, असं त्यांनी सुनावलं.  

गड-किल्ल्यांवर बार उघडायच्या विचारापेक्षा मेलेलं बरं- उदयनराजे

किल्ल्यावर छमछमची एवढी हौस असेल तर चौफुल्याला जा 

मराठा समाजाला साद

स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणवणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक पाऊलही पुढे टाकलं नाही, पण राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठ्यांना न्याय दिला, असं आवर्जून नमूद करत उदयनराजेंनी मराठा मतदारांना साद घातली. काँग्रेसने फक्त राजकारण केलं, समाजकारण नाही. त्यांना सत्तेचा अहंकार होता, असा टोला त्यांनी हाणला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाsatara-acसाताराsatara-pcसाताराAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019