शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Maharashtra Election 2019 : ...म्हणून मी निवडून आल्यावर लगेच राष्ट्रवादीची खासदारकी सोडली; उदयनराजेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 17:18 IST

Satara Election 2019 : अवघ्या चार महिन्यांत खासदारकी सोडणं, हा साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, अनेकांना तो पटलेला नाही.

ठळक मुद्देअवघ्या पाच महिन्यांत सातारा लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.अवघ्या चार महिन्यांत खासदारकी सोडण्याचा उदयनराजेंचा निर्णय अनेकांना पटलेला नाही.'माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी राष्ट्रवादी सोडली आणि खासदारकीचाही राजीनामा दिला

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होत आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम ठोकून खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे आणि त्यात भाजपाने उदयनराजेंनाच रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्या आणि सातारा जिल्ह्यातील भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी टीकाकारांना आपल्या शैलीत उत्तर दिलं. अवघ्या चार महिन्यांत खासदारकी सोडणं, हा साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, अनेकांना तो पटलेला नाही. हे ओळखूनच उदयनराजेंनी आज आपली या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. 

काही जण निवडणुका जवळ आल्या की पक्ष सोडतात. कुणाचं सरकार येणार हे पाहून त्या पक्षात जातात. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने चांगले निर्णय घेतले. ज्यांच्या आशीर्वादाने मी जिंकलो त्या मतदारांनाही या सरकारचं काम पटलं. मोदींसोबत गेला नाहीत, तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही, असंही काहींनी सांगितलं. त्यानंतर, माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी राष्ट्रवादी सोडली आणि खासदारकीचाही राजीनामा दिला, असं स्पष्ट करत उदयनराजेंनी मतांचा जोगवा मागितला.

कलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्यांनी देशात राहू नये; उदयनराजेंची राजे'शाही'

नरेंद्र मोदी 'आयर्न मॅन', उदनयराजेंकडून मोदींना सरदार पटेलांची उपमा

कलम ३७० चा मुद्दा महाराष्ट्रात कशाला?, असा प्रश्न करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी चपराक लगावली. महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशातील सर्व राज्यांसाठी हा मोठा निर्णय आहे. काँग्रेसचे सरकार असताना हा निर्णय घेतला गेला असता तर कित्येक सैनिकांचे प्राण वाचले असते, त्यांची कुटुंब सुखात असती, असं त्यांनी सुनावलं.  

गड-किल्ल्यांवर बार उघडायच्या विचारापेक्षा मेलेलं बरं- उदयनराजे

किल्ल्यावर छमछमची एवढी हौस असेल तर चौफुल्याला जा 

मराठा समाजाला साद

स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणवणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक पाऊलही पुढे टाकलं नाही, पण राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठ्यांना न्याय दिला, असं आवर्जून नमूद करत उदयनराजेंनी मराठा मतदारांना साद घातली. काँग्रेसने फक्त राजकारण केलं, समाजकारण नाही. त्यांना सत्तेचा अहंकार होता, असा टोला त्यांनी हाणला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाsatara-acसाताराsatara-pcसाताराAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019