शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Maharashtra Election 2019 : ...म्हणून मी निवडून आल्यावर लगेच राष्ट्रवादीची खासदारकी सोडली; उदयनराजेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 17:18 IST

Satara Election 2019 : अवघ्या चार महिन्यांत खासदारकी सोडणं, हा साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, अनेकांना तो पटलेला नाही.

ठळक मुद्देअवघ्या पाच महिन्यांत सातारा लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.अवघ्या चार महिन्यांत खासदारकी सोडण्याचा उदयनराजेंचा निर्णय अनेकांना पटलेला नाही.'माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी राष्ट्रवादी सोडली आणि खासदारकीचाही राजीनामा दिला

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होत आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम ठोकून खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे आणि त्यात भाजपाने उदयनराजेंनाच रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्या आणि सातारा जिल्ह्यातील भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी टीकाकारांना आपल्या शैलीत उत्तर दिलं. अवघ्या चार महिन्यांत खासदारकी सोडणं, हा साताऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, अनेकांना तो पटलेला नाही. हे ओळखूनच उदयनराजेंनी आज आपली या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. 

काही जण निवडणुका जवळ आल्या की पक्ष सोडतात. कुणाचं सरकार येणार हे पाहून त्या पक्षात जातात. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने चांगले निर्णय घेतले. ज्यांच्या आशीर्वादाने मी जिंकलो त्या मतदारांनाही या सरकारचं काम पटलं. मोदींसोबत गेला नाहीत, तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही, असंही काहींनी सांगितलं. त्यानंतर, माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी राष्ट्रवादी सोडली आणि खासदारकीचाही राजीनामा दिला, असं स्पष्ट करत उदयनराजेंनी मतांचा जोगवा मागितला.

कलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्यांनी देशात राहू नये; उदयनराजेंची राजे'शाही'

नरेंद्र मोदी 'आयर्न मॅन', उदनयराजेंकडून मोदींना सरदार पटेलांची उपमा

कलम ३७० चा मुद्दा महाराष्ट्रात कशाला?, असा प्रश्न करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी चपराक लगावली. महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशातील सर्व राज्यांसाठी हा मोठा निर्णय आहे. काँग्रेसचे सरकार असताना हा निर्णय घेतला गेला असता तर कित्येक सैनिकांचे प्राण वाचले असते, त्यांची कुटुंब सुखात असती, असं त्यांनी सुनावलं.  

गड-किल्ल्यांवर बार उघडायच्या विचारापेक्षा मेलेलं बरं- उदयनराजे

किल्ल्यावर छमछमची एवढी हौस असेल तर चौफुल्याला जा 

मराठा समाजाला साद

स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणवणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक पाऊलही पुढे टाकलं नाही, पण राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठ्यांना न्याय दिला, असं आवर्जून नमूद करत उदयनराजेंनी मराठा मतदारांना साद घातली. काँग्रेसने फक्त राजकारण केलं, समाजकारण नाही. त्यांना सत्तेचा अहंकार होता, असा टोला त्यांनी हाणला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाsatara-acसाताराsatara-pcसाताराAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019