शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

Maharashtra Election 2019 : ही तर माझी गुरूभूमी; नरेंद्र मोदींनी सांगितलं 'सातारा कनेक्शन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 17:14 IST

Satara Election 2019 : माझ्यासाठी सातारा एक प्रकारची गुरूभूमीसुद्धा आहे.

साताराः माझ्यासाठी सातारा एक प्रकारची गुरूभूमीसुद्धा आहे. मी ज्या संस्कारात वाढलो, ज्यांच्याकडून मी शिक्षा आणि दीक्षा घेतलेली आहे, ते साताऱ्याचे आहेत. साताऱ्यातील खटाव गावाचे लक्ष्मणराव इमानदार ज्यांना आम्ही गुजरातमध्ये वकीलसाहेब बोलायचो. त्यांचं जन्मस्थळ हे आहे, त्यांचीही शिक्षा आणि दीक्षा इथेच झाली होती. त्यानंतर ते गुजरातमध्ये आले आणि त्यांनी माझ्यासारख्याला शिष्याला शिक्षा आणि दीक्षा दिली. त्यामुळेच माझ्यासाठी ही गुरुभूमीसुद्धा आहे. माझ्यासाठी सातारा तीर्थयात्रेसारखंच आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत, ते साताऱ्यातील सभेत बोलत होते. जेव्हा उदयनराजे बोलत होते, तेव्हा माझं मन करत होतं ऐकतंच राहू, ऐकतंच राहू, एक एक शब्द हृदयातून निघत होता. सातारा संतांची भूमी आहे. समाज आणि देशाला दिशा देणाऱ्या नेतृत्वाची भूमी आहे. वीर संभाजी, वीर शाहुजी, समर्थ रामदास स्वामी, रामशास्त्री प्रभुणे, श्रीमंत प्रताप सिंह, सावित्रीबाई फुले, क्रांतिसिंह नाना पाटील, अशी अतुलनीय व्यक्तिमत्त्वं याच मातीत जन्माला आली आहेत, असंही मोदींनी सांगितलं आहे.यशवंतराव चव्हाणांसारखा दूरदृष्टीचा नेताही साताऱ्यानं देशाला दिला. सह्याद्री पर्वताच्या मागून जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा वाटतं हातात केसरी ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आले आहेत. हीच ती पवित्र भूमी आहे, जिथे शिवाजी महाराज आई भवानीचं दर्शन करायचे. पहिल्यांदा आमच्याकडे शिवाजी महाराजांचे संस्कार होते, आता त्यांचा पूर्ण परिवारच आमच्यासोबत आहे, याचा उल्लेखही मोदींनी केला आहे. 

गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या सरकारनं शिवाजी महाराजांच्या संस्कारांनी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रसंरक्षण आणि राष्ट्रवादाला आम्ही प्राथमिकता दिली आहे. भारत भूमीवर वाईट नजर ठेवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल. शिवाजी महाराजांनी त्या काळातही सशक्त नव्या सेनेचं निर्माण केलं होतं. गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारनं भारतीय सेनेला जगातील ताकदवान सेनेच्या पंक्तीत आणून बसवलं आहे. भारताकडे अनेक अस्त्र आणि शस्त्रे आहेत. महायुतीच्या सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जे आमच्या विरोधात उभे आहेत, त्यांनी राष्ट्ररक्षेसाठी आम्ही उचललेल्या पावलांचा विरोध केला, असं म्हणत मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019satara-acसाताराShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज