शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

जिल्ह्यातील धरणांत नीचांकी पाणीसाठा ; पाऊस लांबला तर परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:05 IST

हवामान खात्याच्या अंदाजानुसार साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे लोकांनी धीर धरावा. धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी सोडले जात आहे. लोकांनी पाण्याचा गैरवापर करू नये. पाऊस पडल्यानंतर परिस्थिती निश्चितपणाने बदलणार आहे. - श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी.

ठळक मुद्देपाच वर्षांचा आढावा : केवळ १४.८५ टीएमसी पाणी शिल्लक

सागर गुजर ।सातारा : जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असतानाच धरणांतील पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे. धरणांमध्ये गेल्या पाच वर्षांतील निचांकी पाणीसाठा उरला आहे. कोयना, उरमोडी, कण्हेर, धोम, धोम-बलकवडी, तारळी, वीर या मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणी आहे. सर्व धरणांत मिळून केवळ १४.८५ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेआहे.

जिल्ह्यातील १९ लहान-मोठे व ३२ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या ११ जून रोजी ३२.८४ टीएमसी पाणी शिल्लक होते. याच तारखेला २०१४ मध्ये २२.३३ टीएमसी, २०१५ मध्ये ४०.२० टीएमसी, २०१६ मध्ये १६.४९ टीएमसी तर २०१७ मध्ये २१.०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी म्हणजे केवळ १४.८५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. धरणांतील मृत पाणीसाठा वगळता हे पाणी उपयुक्त ठरणारे आहे. दरम्यान, कोयना धरणातून सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार रोज ३२०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे दिवसागणिक कोयना धरणातील पाणीसाठाही कमी होत आहे.

संपूर्ण जिल्ह्यावर पाणी संकट ओढावले आहे. उन्हाळी पाऊस पुरेसा पडलेला नाही. मान्सूनही लांबणीवर पडला असल्याने जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील २५५ गावे व ९९८ वाड्या-वस्त्यांवर तब्बल २९० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ४ लाख ७९ हजार ४८३ लोक व २ लाख ३३ हजार पशुधन टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. माण, खटाव, कोरेगाव, जावळी, फलटण, वाई, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा, सातारा, कºहाड एकूण २७ टँकर फिडिंग पॉर्इंट आहेत. या ठिकाणीही धरणांतून पाणी सोडले जात असून, धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागलाआहे.

खटाव व माण या दोन तालुक्यांत उरमोडी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. कºहाडजवळच्या टेंभू प्रकल्पातूनही माण तालुक्यातील १६ गावांना पिण्याचे पाणी देण्यात आले आहे. दुष्काळग्रस्तांची तहान मोठ्या प्रकल्पांतून भागवली जात असली तरी आता या प्रकल्पांनीच तळ गाठल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी काटकसरीने पुरविण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. दुष्काळी भागातील येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी या छोट्या प्रकल्पांमध्ये तर पाण्याचा खडखडाट झाला आहे. मोरणा गुरेघर, उत्तरमांड, महू, हातगेघर, वांग-मराठवाडी हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्या गावांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

२०१६ मध्ये कोयनेत विदारक चित्रयंदा कोयना धरणात ८.०८ इतके उपयुक्त पाणी शिल्लक आहे. मात्र, २०१६ मध्ये यापेक्षा विदारक परिस्थिती होती. तेव्हा कोयना धरणात केवळ ७.५८ टीएमसी पाणी शिल्लक राहिले होते. नंतर पावसाने साथ दिल्याने परिस्थितीत बदल झाला होता.धरणनिहाय उपलब्ध पाणीसाठा टीएमसीमध्येकोयना धरण ८.०८, धोम ०.०६, धोम बलकवडी ०.१३, कण्हेर १.३५, उरमोडी ०.६९, तारळी १.७६, नीरा-देवघर ०.१९, भाटघर १.१६, वीर ०.५०, येरळवाडी ०, नेर ०.०४, राणंद ०, आंधळी ०, नागेवाडी ०.०३, मोरणा गुरेघर ०.४७, उत्तरमांड ०.२५, महू ०.०७, हातगेघर ०.०४, वांग मराठवाडी ०.०३, लघू प्रकल्प ०.११.

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणwater shortageपाणीटंचाई