शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांत नीचांकी पाणीसाठा ; पाऊस लांबला तर परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:05 IST

हवामान खात्याच्या अंदाजानुसार साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे लोकांनी धीर धरावा. धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी सोडले जात आहे. लोकांनी पाण्याचा गैरवापर करू नये. पाऊस पडल्यानंतर परिस्थिती निश्चितपणाने बदलणार आहे. - श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी.

ठळक मुद्देपाच वर्षांचा आढावा : केवळ १४.८५ टीएमसी पाणी शिल्लक

सागर गुजर ।सातारा : जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असतानाच धरणांतील पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे. धरणांमध्ये गेल्या पाच वर्षांतील निचांकी पाणीसाठा उरला आहे. कोयना, उरमोडी, कण्हेर, धोम, धोम-बलकवडी, तारळी, वीर या मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणी आहे. सर्व धरणांत मिळून केवळ १४.८५ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेआहे.

जिल्ह्यातील १९ लहान-मोठे व ३२ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या ११ जून रोजी ३२.८४ टीएमसी पाणी शिल्लक होते. याच तारखेला २०१४ मध्ये २२.३३ टीएमसी, २०१५ मध्ये ४०.२० टीएमसी, २०१६ मध्ये १६.४९ टीएमसी तर २०१७ मध्ये २१.०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी म्हणजे केवळ १४.८५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. धरणांतील मृत पाणीसाठा वगळता हे पाणी उपयुक्त ठरणारे आहे. दरम्यान, कोयना धरणातून सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार रोज ३२०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे दिवसागणिक कोयना धरणातील पाणीसाठाही कमी होत आहे.

संपूर्ण जिल्ह्यावर पाणी संकट ओढावले आहे. उन्हाळी पाऊस पुरेसा पडलेला नाही. मान्सूनही लांबणीवर पडला असल्याने जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील २५५ गावे व ९९८ वाड्या-वस्त्यांवर तब्बल २९० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ४ लाख ७९ हजार ४८३ लोक व २ लाख ३३ हजार पशुधन टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. माण, खटाव, कोरेगाव, जावळी, फलटण, वाई, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा, सातारा, कºहाड एकूण २७ टँकर फिडिंग पॉर्इंट आहेत. या ठिकाणीही धरणांतून पाणी सोडले जात असून, धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागलाआहे.

खटाव व माण या दोन तालुक्यांत उरमोडी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. कºहाडजवळच्या टेंभू प्रकल्पातूनही माण तालुक्यातील १६ गावांना पिण्याचे पाणी देण्यात आले आहे. दुष्काळग्रस्तांची तहान मोठ्या प्रकल्पांतून भागवली जात असली तरी आता या प्रकल्पांनीच तळ गाठल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी काटकसरीने पुरविण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. दुष्काळी भागातील येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी या छोट्या प्रकल्पांमध्ये तर पाण्याचा खडखडाट झाला आहे. मोरणा गुरेघर, उत्तरमांड, महू, हातगेघर, वांग-मराठवाडी हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्या गावांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

२०१६ मध्ये कोयनेत विदारक चित्रयंदा कोयना धरणात ८.०८ इतके उपयुक्त पाणी शिल्लक आहे. मात्र, २०१६ मध्ये यापेक्षा विदारक परिस्थिती होती. तेव्हा कोयना धरणात केवळ ७.५८ टीएमसी पाणी शिल्लक राहिले होते. नंतर पावसाने साथ दिल्याने परिस्थितीत बदल झाला होता.धरणनिहाय उपलब्ध पाणीसाठा टीएमसीमध्येकोयना धरण ८.०८, धोम ०.०६, धोम बलकवडी ०.१३, कण्हेर १.३५, उरमोडी ०.६९, तारळी १.७६, नीरा-देवघर ०.१९, भाटघर १.१६, वीर ०.५०, येरळवाडी ०, नेर ०.०४, राणंद ०, आंधळी ०, नागेवाडी ०.०३, मोरणा गुरेघर ०.४७, उत्तरमांड ०.२५, महू ०.०७, हातगेघर ०.०४, वांग मराठवाडी ०.०३, लघू प्रकल्प ०.११.

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणwater shortageपाणीटंचाई