शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांत नीचांकी पाणीसाठा ; पाऊस लांबला तर परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:05 IST

हवामान खात्याच्या अंदाजानुसार साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे लोकांनी धीर धरावा. धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी सोडले जात आहे. लोकांनी पाण्याचा गैरवापर करू नये. पाऊस पडल्यानंतर परिस्थिती निश्चितपणाने बदलणार आहे. - श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी.

ठळक मुद्देपाच वर्षांचा आढावा : केवळ १४.८५ टीएमसी पाणी शिल्लक

सागर गुजर ।सातारा : जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असतानाच धरणांतील पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे. धरणांमध्ये गेल्या पाच वर्षांतील निचांकी पाणीसाठा उरला आहे. कोयना, उरमोडी, कण्हेर, धोम, धोम-बलकवडी, तारळी, वीर या मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणी आहे. सर्व धरणांत मिळून केवळ १४.८५ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेआहे.

जिल्ह्यातील १९ लहान-मोठे व ३२ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या ११ जून रोजी ३२.८४ टीएमसी पाणी शिल्लक होते. याच तारखेला २०१४ मध्ये २२.३३ टीएमसी, २०१५ मध्ये ४०.२० टीएमसी, २०१६ मध्ये १६.४९ टीएमसी तर २०१७ मध्ये २१.०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी म्हणजे केवळ १४.८५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. धरणांतील मृत पाणीसाठा वगळता हे पाणी उपयुक्त ठरणारे आहे. दरम्यान, कोयना धरणातून सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार रोज ३२०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे दिवसागणिक कोयना धरणातील पाणीसाठाही कमी होत आहे.

संपूर्ण जिल्ह्यावर पाणी संकट ओढावले आहे. उन्हाळी पाऊस पुरेसा पडलेला नाही. मान्सूनही लांबणीवर पडला असल्याने जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील २५५ गावे व ९९८ वाड्या-वस्त्यांवर तब्बल २९० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ४ लाख ७९ हजार ४८३ लोक व २ लाख ३३ हजार पशुधन टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. माण, खटाव, कोरेगाव, जावळी, फलटण, वाई, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा, सातारा, कºहाड एकूण २७ टँकर फिडिंग पॉर्इंट आहेत. या ठिकाणीही धरणांतून पाणी सोडले जात असून, धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागलाआहे.

खटाव व माण या दोन तालुक्यांत उरमोडी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. कºहाडजवळच्या टेंभू प्रकल्पातूनही माण तालुक्यातील १६ गावांना पिण्याचे पाणी देण्यात आले आहे. दुष्काळग्रस्तांची तहान मोठ्या प्रकल्पांतून भागवली जात असली तरी आता या प्रकल्पांनीच तळ गाठल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी काटकसरीने पुरविण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. दुष्काळी भागातील येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी या छोट्या प्रकल्पांमध्ये तर पाण्याचा खडखडाट झाला आहे. मोरणा गुरेघर, उत्तरमांड, महू, हातगेघर, वांग-मराठवाडी हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्या गावांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

२०१६ मध्ये कोयनेत विदारक चित्रयंदा कोयना धरणात ८.०८ इतके उपयुक्त पाणी शिल्लक आहे. मात्र, २०१६ मध्ये यापेक्षा विदारक परिस्थिती होती. तेव्हा कोयना धरणात केवळ ७.५८ टीएमसी पाणी शिल्लक राहिले होते. नंतर पावसाने साथ दिल्याने परिस्थितीत बदल झाला होता.धरणनिहाय उपलब्ध पाणीसाठा टीएमसीमध्येकोयना धरण ८.०८, धोम ०.०६, धोम बलकवडी ०.१३, कण्हेर १.३५, उरमोडी ०.६९, तारळी १.७६, नीरा-देवघर ०.१९, भाटघर १.१६, वीर ०.५०, येरळवाडी ०, नेर ०.०४, राणंद ०, आंधळी ०, नागेवाडी ०.०३, मोरणा गुरेघर ०.४७, उत्तरमांड ०.२५, महू ०.०७, हातगेघर ०.०४, वांग मराठवाडी ०.०३, लघू प्रकल्प ०.११.

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणwater shortageपाणीटंचाई