शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

शिंगणापूर यात्रेचा फटका : विभूती व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 18:44 IST

यावर अनेक कुटुंबेही अवलंबून असतात. विभूतीला धार्मिक महत्त्व असल्याने घरातील देवघरात याचा सर्रास वापर केला जातो. परंतु यात्राच रद्द झाल्याने या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे, काही तरुणही या व्यवसायात उतरले; मात्र घातलेले भांडवलही निघणार नसल्याने विभूती उत्पादक चिंतेत आहेत.

ठळक मुद्दे विभूती व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

नवनाथ जगदाळे।दहिवडी : शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा दरवर्षी गुढीपाडव्याला भरते. तर चैत्री एकादशीला मुख्य दिवस असतो. मात्र चालूवर्षी कोरोना विषाणूमुळे यात्राच रद्द झाल्याने विभूती बनविणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या यात्रेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, विदर्भसह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून किमान आठ ते दहा लाख भाविक दरवर्षी येत असतात, याचे औचित्य साधून शिंगणापुरात मोठ्या प्रमाणात विभूतीचे खडे बनवले जातात. शिंगणापुरात विलास शेंडे, रोहित राऊत, गणेश राऊत, विकास करचे यांच्यासह चार-पाचजण मोठ्या प्रमाणात विभूतीचे खडे बनवितात.

यावर्षीही मोठा व्यवसाय होईल, या उद्देशाने बारामतीतून कच्चा माल खरेदी करून तो कुटून भट्ट्या लावण्यात आल्या व सर्व विभूतीच्या वड्या बनवून हे विभूतीचे खडे तयार झाले होते. सर्वसाधारण दहा लाख विभूतीच्या वड्यांचे उत्पादन एकट्या शिंगणापुरात तयार झाले होते. ते विभूतीच्या वड्या हातावर पोट भरणारे लोक यात्राकाळात बेलफूल, विभूती विकत असतात.होलसेल वड्या दोन ते तीन रुपयांनी विकली जाते तर तीच किरकोळमध्ये पाच ते दहा रुपयाला भाविक घेत असतात. दहा दिवसांच्या यात्राकाळात विभूतीची लाखो रुपयांची उलाढाल होते.

यावर अनेक कुटुंबेही अवलंबून असतात. विभूतीला धार्मिक महत्त्व असल्याने घरातील देवघरात याचा सर्रास वापर केला जातो. परंतु यात्राच रद्द झाल्याने या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे, काही तरुणही या व्यवसायात उतरले; मात्र घातलेले भांडवलही निघणार नसल्याने विभूती उत्पादक चिंतेत आहेत.कर्ज काढून विभूतीचे उत्पादन..!आम्ही कर्ज काढून विभूतीचे उत्पादन घेतले. १५ दिवसांत पैसे माघारी मिळतील, अशी आशा होती; परंतु यात्राच रद्द झाल्याने विभूतीचा माल पडून राहणार असून, अशा व्यावसायिकांना शासनाने मदत केली पाहिजे. 

शिखर शिंगणापूर यात्रा रद्द झाल्याने या लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या लोकांचा सर्व्हे करून शासनाने यांना तातडीने मदत केली पाहिजे. आम्ही शंभू महादेव प्रतिष्ठानच्या माध्यमातून ५० कुटुंबांना किराणाचे थोडेफार साहित्य दिले आहे. मात्र ही मदत तात्पुरती आहे.- वीरभद्र कावडे, सामाजिक कार्यकर्ते, शिखर शिंगणापूर 

 

टॅग्स :businessव्यवसायSatara areaसातारा परिसरMONEYपैसा