शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
6
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
7
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
10
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
11
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
12
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
13
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
14
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
15
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
16
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
17
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
18
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
19
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
20
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

शिंगणापूर यात्रेचा फटका : विभूती व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 18:44 IST

यावर अनेक कुटुंबेही अवलंबून असतात. विभूतीला धार्मिक महत्त्व असल्याने घरातील देवघरात याचा सर्रास वापर केला जातो. परंतु यात्राच रद्द झाल्याने या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे, काही तरुणही या व्यवसायात उतरले; मात्र घातलेले भांडवलही निघणार नसल्याने विभूती उत्पादक चिंतेत आहेत.

ठळक मुद्दे विभूती व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

नवनाथ जगदाळे।दहिवडी : शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा दरवर्षी गुढीपाडव्याला भरते. तर चैत्री एकादशीला मुख्य दिवस असतो. मात्र चालूवर्षी कोरोना विषाणूमुळे यात्राच रद्द झाल्याने विभूती बनविणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या यात्रेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, विदर्भसह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून किमान आठ ते दहा लाख भाविक दरवर्षी येत असतात, याचे औचित्य साधून शिंगणापुरात मोठ्या प्रमाणात विभूतीचे खडे बनवले जातात. शिंगणापुरात विलास शेंडे, रोहित राऊत, गणेश राऊत, विकास करचे यांच्यासह चार-पाचजण मोठ्या प्रमाणात विभूतीचे खडे बनवितात.

यावर्षीही मोठा व्यवसाय होईल, या उद्देशाने बारामतीतून कच्चा माल खरेदी करून तो कुटून भट्ट्या लावण्यात आल्या व सर्व विभूतीच्या वड्या बनवून हे विभूतीचे खडे तयार झाले होते. सर्वसाधारण दहा लाख विभूतीच्या वड्यांचे उत्पादन एकट्या शिंगणापुरात तयार झाले होते. ते विभूतीच्या वड्या हातावर पोट भरणारे लोक यात्राकाळात बेलफूल, विभूती विकत असतात.होलसेल वड्या दोन ते तीन रुपयांनी विकली जाते तर तीच किरकोळमध्ये पाच ते दहा रुपयाला भाविक घेत असतात. दहा दिवसांच्या यात्राकाळात विभूतीची लाखो रुपयांची उलाढाल होते.

यावर अनेक कुटुंबेही अवलंबून असतात. विभूतीला धार्मिक महत्त्व असल्याने घरातील देवघरात याचा सर्रास वापर केला जातो. परंतु यात्राच रद्द झाल्याने या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे, काही तरुणही या व्यवसायात उतरले; मात्र घातलेले भांडवलही निघणार नसल्याने विभूती उत्पादक चिंतेत आहेत.कर्ज काढून विभूतीचे उत्पादन..!आम्ही कर्ज काढून विभूतीचे उत्पादन घेतले. १५ दिवसांत पैसे माघारी मिळतील, अशी आशा होती; परंतु यात्राच रद्द झाल्याने विभूतीचा माल पडून राहणार असून, अशा व्यावसायिकांना शासनाने मदत केली पाहिजे. 

शिखर शिंगणापूर यात्रा रद्द झाल्याने या लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या लोकांचा सर्व्हे करून शासनाने यांना तातडीने मदत केली पाहिजे. आम्ही शंभू महादेव प्रतिष्ठानच्या माध्यमातून ५० कुटुंबांना किराणाचे थोडेफार साहित्य दिले आहे. मात्र ही मदत तात्पुरती आहे.- वीरभद्र कावडे, सामाजिक कार्यकर्ते, शिखर शिंगणापूर 

 

टॅग्स :businessव्यवसायSatara areaसातारा परिसरMONEYपैसा