शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीत ओल कमी; रबीची २२ टक्के पेरणी, शेतकऱ्यांमध्ये चिंता 

By नितीन काळेल | Updated: October 27, 2023 18:46 IST

पिकांना पाणी अपुरे पडण्याची भीती कायम 

सातारा : जिल्ह्यात अजुनही शेतात खरीपाची पिके असली तरी शेतकऱ्यांनी रबीची पेरणी सुरू केली आहे. आतापर्यंत २२ टक्केच पेरणी झालेली आहे. त्यातच पावसाअभावी जमिनीत ओल कमी असलीतरी शेतकरी पेरणीचे धाडस करु लागले आहेत. पण, भविष्यात पिकांना पाणी पुरणार का याविषयी चिंता कायम आहे.सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. यावर्षी खरीपाचे क्षेत्र हे २ लाख ८८ हजार हेक्टरवर होते. पण, सुरुवातीपासून मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने पेरणी ९४ टक्क्यांपर्यंतच झाली. तर उशिरा पेरणीमुळे अजुनही काही भागात पिके रानातच आहेत. अशातच शेतकऱ्यांनी रबी हंगामाची पेरणी सुरू केली आहे. आतापर्यंत २२ टक्के पेर पूर्ण झाली आहे. यामध्ये ज्वारी आणि मकेची पेरणी अधिक आहे.जिल्ह्यात रबी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये ज्वारीचे १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर आहे. तर गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३७ हजार हेक्टरवर, मका १० हजार हेक्टर, हरभरा २७ हजार ७५३ हेक्टर तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवस या पिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे. रबीत प्रामुख्याने ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक राहते. यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक ३८ हजार ५३४ हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. यानंतर खटाव २० हजार २०४ हेक्टर, फलटण १८ हजार ४०६ हेक्टर, कोरेगाव १३ हजार ४५९, सातारा तालुका ९ हजार ५३०, पाटण ९ हजार १७६, वाई ८ हजार ४६८ आणि खंडाळा तालुक्यात ८ हजार ४४१ हेक्टर क्षेत्र राहू शकते. तसेच इतर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र कमी आहे. आतापर्यंत ४१ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. याचे प्रमाण ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तर आतापर्यंत माण तालुक्यात सुमारे १६ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झालेली आहे. इतर तालुक्यात पेरणी प्रमाण कमी आहे.गहू पेरणीला आणखी वेळ आहे. आतापर्यंत एक टक्काही पेरणी झालेली नाही. गहू पेरणीबाबत शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. जमिनीत ओल नसल्यास गव्हाचे क्षेत्र यंदा कमी राहण्याचा अंदाज आहे. गव्हाचे सर्वाधिक क्षेत्र हे फलटण तालुक्यात साडे सहा हजार हेक्टरवर राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर कऱ्हाड तालुक्यात सहा हजार हेक्टर, पाटण तालुका ५ हजार २४५ हेक्टर, सातारा आणि वाई तालुका तीन हजार हेक्टरवर अंदाज आहे. त्याचबरोबर मका पेरणी ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सध्या साडे तीन हजार हेक्टरवर पूर्ण झालेली आहे. हरभऱ्याची दीड टक्का पेरणी झालेली आहे. हरभरा पेरणीसही अजून वेळ आहे.रबीचे सर्वाधिक क्षेत्र माणमध्ये..रबीचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख १३ हजार हेक्टर आहे. यामधील ४६ हजार ४१८ हेक्टर क्षेत्र माण तालुक्यातील आहे. तर यानंतर फलटण तालुक्यात ३० हजार ८९० हेक्टर, खटाव २९ हजार ८२१, कोरेगाव २१ हजार २६६, पाटण तालुका १७ हजार ८०९ हेक्टर आहे. तर वाई तालुक्यात १४ हजार ६८९ हेक्टर, सातारा १४ हजार ९७०, कऱ्हाड १४ हजार ७३२ हेक्टर, खंडाळा १३ हजार ९५३, जावळी ८ हजार आणि महाबळेश्वर तालुक्यात अवघे ६४५ हेक्टर क्षेत्र आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी