शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

‘कोयना’च्या अभियंत्यांना पावसाने चकविले !

By admin | Updated: September 20, 2016 00:08 IST

नियोजन फसले : पाणी सोडल्याने ऊस शेती पाण्यात; कृषिपंप गेले वाहून...

पाटण : कोयना नदीने पुन्हा रौद्ररूप धारण केल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची ऊस शेती पाण्यात तर कृषिपंपाच्या मोटारींही वाहून गेल्या. एवढेच काय नदीकाठी केलेल्या अंत्यसंस्कारानंतर सारेच वाहून गेल्याने रक्षाविसर्जनासाठीही रक्षा उरली नाही. हे सारे कोयना धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करून ठेवण्याच्या उद्दीष्टामुळेच ही वेळ आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून, गेल्या वर्षी कमी पाऊस झाला. धरण ८० टक्केच भरले आणि उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे हे धरण अगदी काठोकाठ भरून ठेवायचे ठरले. यंदा केवळ चांगलाच पाऊस झाला नसून आतापर्यंत पाच हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्यंतरी ६ आॅगस्ट रोजी पावसाच्या भीतीने ७ आॅगस्ट रोजी कोयना धरण व्यवस्थापनच्या अभियंत्यांना धरणात ८७ टीएमसी पाणी असताना धरणाचे दरवाजे दोन फुटाने उचलून पाणी सोडावे लागले. कारण भविष्यात पावसाचा जोर वाढला तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित राहावा. नदीकाठच्या गावांना पुराचा तडाका बसू नये, हीच भावना होती. मात्र पाणी सोडले आणि पाऊस थांबला. त्यामुळे लगेच कोयनेची दारे बंद करावी लागली. त्यानंतर धरणात १०४ टीएमसी पाणीसाठा होईपर्यंत महिनाभराची वाट पाहावी लागली. त्यासाठी पायथा किंवा धरणाच्या दरवाजाद्वारे पाण्याचा एकही थेंबही जाऊ दिला नाही. अखेर कोयना धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले. पायथ्यातून वीजनिर्मिती करून पाण्याचा विसर्ग २,१११ क्युसेक करण्यास सुरुवात केली. अनंत चतुर्थीनंतर परतीच्या पावसाचा जोर वाढला. मग आता काय करायचे? धरण तुडुंब भरलेले होते आणि वरून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षणीय वाढली. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे चार फुटांनी उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केला. त्यानंतर २४ तासांत दरवाजे सहा फुटांवर नेऊन तब्बल ५४,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविला. (प्रतिनिधी)शेती गेली पाण्याखालीएवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे कोयना धरणापासून कऱ्हाडपर्यंतच्या नदीकाठच्या गावांमधील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. संगमनगर धक्का जुना पूल, मूळगाव पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे अनेक गावे व ग्रामस्थांचा संपर्क तुटला. कृष्णा नदीलाही पुराचे स्वरूप आल्याने सांगलीकडील गावेही पूरसदृश्य झाली.कोयना धरण परिसरात अचानक तीनशे मिलिमीटर पाऊस झाला. त्याअगोदर धरणातून पाणी सोडणे योग्य नव्हते. कारण जर पाऊस झाला नसता तर धरण रिकामे करून चालणार नव्हते. तरीही आपण चार टप्प्यांत धरणातून पाण्याचा विसर्ग केला. एवढ्या प्रमाणात पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्यात आली होती.- ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन