शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोयना’च्या अभियंत्यांना पावसाने चकविले !

By admin | Updated: September 20, 2016 00:08 IST

नियोजन फसले : पाणी सोडल्याने ऊस शेती पाण्यात; कृषिपंप गेले वाहून...

पाटण : कोयना नदीने पुन्हा रौद्ररूप धारण केल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची ऊस शेती पाण्यात तर कृषिपंपाच्या मोटारींही वाहून गेल्या. एवढेच काय नदीकाठी केलेल्या अंत्यसंस्कारानंतर सारेच वाहून गेल्याने रक्षाविसर्जनासाठीही रक्षा उरली नाही. हे सारे कोयना धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करून ठेवण्याच्या उद्दीष्टामुळेच ही वेळ आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून, गेल्या वर्षी कमी पाऊस झाला. धरण ८० टक्केच भरले आणि उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे हे धरण अगदी काठोकाठ भरून ठेवायचे ठरले. यंदा केवळ चांगलाच पाऊस झाला नसून आतापर्यंत पाच हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्यंतरी ६ आॅगस्ट रोजी पावसाच्या भीतीने ७ आॅगस्ट रोजी कोयना धरण व्यवस्थापनच्या अभियंत्यांना धरणात ८७ टीएमसी पाणी असताना धरणाचे दरवाजे दोन फुटाने उचलून पाणी सोडावे लागले. कारण भविष्यात पावसाचा जोर वाढला तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित राहावा. नदीकाठच्या गावांना पुराचा तडाका बसू नये, हीच भावना होती. मात्र पाणी सोडले आणि पाऊस थांबला. त्यामुळे लगेच कोयनेची दारे बंद करावी लागली. त्यानंतर धरणात १०४ टीएमसी पाणीसाठा होईपर्यंत महिनाभराची वाट पाहावी लागली. त्यासाठी पायथा किंवा धरणाच्या दरवाजाद्वारे पाण्याचा एकही थेंबही जाऊ दिला नाही. अखेर कोयना धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले. पायथ्यातून वीजनिर्मिती करून पाण्याचा विसर्ग २,१११ क्युसेक करण्यास सुरुवात केली. अनंत चतुर्थीनंतर परतीच्या पावसाचा जोर वाढला. मग आता काय करायचे? धरण तुडुंब भरलेले होते आणि वरून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षणीय वाढली. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे चार फुटांनी उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केला. त्यानंतर २४ तासांत दरवाजे सहा फुटांवर नेऊन तब्बल ५४,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविला. (प्रतिनिधी)शेती गेली पाण्याखालीएवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे कोयना धरणापासून कऱ्हाडपर्यंतच्या नदीकाठच्या गावांमधील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. संगमनगर धक्का जुना पूल, मूळगाव पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे अनेक गावे व ग्रामस्थांचा संपर्क तुटला. कृष्णा नदीलाही पुराचे स्वरूप आल्याने सांगलीकडील गावेही पूरसदृश्य झाली.कोयना धरण परिसरात अचानक तीनशे मिलिमीटर पाऊस झाला. त्याअगोदर धरणातून पाणी सोडणे योग्य नव्हते. कारण जर पाऊस झाला नसता तर धरण रिकामे करून चालणार नव्हते. तरीही आपण चार टप्प्यांत धरणातून पाण्याचा विसर्ग केला. एवढ्या प्रमाणात पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्यात आली होती.- ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन