शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

Satara: कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, २३ हजार क्युसेकने विसर्ग; नदीकाठी सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:39 IST

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम घाट आणि प्रमुख धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २२६ तर वाई तालुक्यातील जोर येथे ३१६ मिलिमीटरची नोंद झाली. हे या वर्षातील सर्वाधिक पर्जन्यमान ठरले. तर कोयना पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास सहा दरवाजे पाच फूट उचलून २० हजार ९०० आणि पायथा वीजगृह २ हजार १०० असा एकूण २३ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. दररोज पावसात वाढ होत चालली आहे. विशेष करून पश्चिम भागात घाटमाथा आणि कांदाटी, कोयना खोऱ्यात मुसळधार पाऊस पडू लागलाय. तसेच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख मोठ्या प्रकल्प क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्गही वाढविण्यात येत आहे.शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३३, नवजा १८८ आणि महाबळेश्वरला २२६ मिलिमीटर पाऊस झाला. कोयना पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस असल्याने सकाळच्या सुमारास धरणात ४२ हजार ५८८ क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ८१.८७ टीएमसी झाला होता. २४ तासांत धरणात ३.६७ टीएमसी पाणी आवक झाली. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सकाळी ११ वाजता सहा वक्र दरवाजे चार फुटांनी उघडून १६ हजार ५६५ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. पण, पावसामुळे दिवसभर धरणात आवक वाढतच गेली. त्यामुळे सायंकाळी साडेपाचला दरवाजे पाच फुटांपर्यंत वर उचलून विसर्ग करण्यात आला. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

धोम, तारळीतून विसर्ग..जिल्ह्याच्या प्रमुख धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलेला आहे. २४ तासांत बलकवडी धरण परिसरात १८७, तारळी ५२ आणि उरमोडी धरण क्षेत्रात ४८ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. मोठे प्रकल्पात जवळपास १२० टीएमसीवर पाणीसाठा झालेला आहे. तसेच धोम, कण्हेर, तारळी, बलकवडी या धरणांतूनही विसर्ग सुरू आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील जोर येथे २४ तासांत ३१६ मिलिमीटर पाऊस झाला. तर एक जूनपासून आतापर्यंत जोर येथे ३ हजार ५५० मिलिमीटर पर्जन्यमान नोंद झाले आहे.