शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

खटाव तालुक्यातील तलाव कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 13:09 IST

वडूज : जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या दमदार पावसाने धरणे भरत आली आहेत. मात्र, नेमकी विरुध्द परिस्थिती पूर्व भागात आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने ओढे-नाले आणि तलाव अद्याप कोरडेच आहेत. पाऊस नसल्याने बटाटा लागवड क्षेत्रात घट झाली आहे.

ठळक मुद्देपावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल

वडूज : जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या दमदार पावसाने धरणे भरत आली आहेत. मात्र, नेमकी विरुध्द परिस्थिती पूर्व भागात आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने ओढे-नाले आणि तलाव अद्याप कोरडेच आहेत. पाऊस नसल्याने बटाटा लागवड क्षेत्रात घट झाली आहे.

जून महिन्यात झालेल्या पावसावर शेतकºयांनी पेरणीची कामे उरकली. घेवडा, ज्वारी, बाजरी, वाटाणा, सोयाबीन आदी पिके शेतकºयांनी शेतात घेतली आहेत. जुलै महिन्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे विहीर, ओढे-नाले, तलाव यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. आॅगस्ट महिना सुरू झाला तररी पाण्याचे स्त्रोत कोरडे ठणठणीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रिमझिम पावसावर पिकांची वाढ चांगली झाली असली तरी सध्या मोठ्या पावसाची गरज आहे.

अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी तलाव, विहिरी कोरड्या असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची  शक्यता आहे. येरळवाडी, नेर शिरसवडी, पारगाव, येळीव पाझर तलाव अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पूर्वेकडील भागात पावसाने ओढ दिली असली तरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात मात्र पाऊस समाधानकारक झाला आहे. उरमोडी, कण्हेर, धोम, तारळी धरणातील पाणी पाततळीत वाढ झाली आहे.

कृष्णा नदीच्या पात्रात पाणी वाढले होते. हे पाणी वाहून कर्र्नाटकच्या आलमट्टी धरणात जात आहे. शासनाने वाया जाणारे पाणी अडवून दुष्काळी भागातील तलाव भरून घेण्यात यावेत, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे.बटाट्याचे क्षेत्र घटले

खटाव तालुक्यातील प्रामुख्याने औंध, पुसेगाव, पुसेसावळी या पश्चिम पट्ट्यात बटाट्याचे नगदी पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु, पुरेसा पाऊस न झाल्याने आणि विहिरीत पाणी नसल्याने शेतकºयांनी बटाटा पिकाकडे पाठ फिरविल्याने यंदा बटाट्याचे क्षेत्र घटले आहे.