शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पाटात पाणी सोडले; १५ दिवसांनी साताऱ्यात आले!; ‘कास’चा रंजक इतिहास.. वाचा सविस्तर

By सचिन काकडे | Updated: January 25, 2025 13:44 IST

पाण्यासाठी मोजावा लागत होता अवघा १ रुपया

सचिन काकडेसातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणारी कास ही शहराची सर्वांत जुनी पाणीयोजना आहे. १८८६ सालापासून ही योजना सातारावासीयांची तहान भागवत आहे. आज जरी या तलावाचे धरणात रूपांतर झाले असले तरी या धरणाचा आजवरचा प्रवास रंजक आहे.सातारा शहर वसविणाऱ्या शाहू महाराज थोरले यांनी शहरात तलाव, हौदांची निर्मिती केली. पुढे प्रतापसिंह महाराज यांनी जलवितरण व्यवस्था सक्षम करून शहरात पाणी खेळवले. सातारा शहराला प्रथम पाणीपुरवठा झाला तो यवतेश्वर मंदिरालगत असलेल्या तलावातून. खापरी नळाच्या माध्यमातून हे पाणी साताऱ्यात आले. मात्र, शहराचा विस्तार वाढू लागल्याने हे पाणी अपुरे पडू लागले अन् कास पाणी योजनेचा जन्म झाला.१८७७ साली पूर्ण मातीकाम असलेल्या कास योजनेच्या कामास प्रारंभ झाला. तलाव बांधून हे पाणी पाटाने शहरापर्यंत आणण्याची ही योजना होती. १८८५ साली या योजनेसह २७ किलोमीटर पाटाचे काम पूर्णत्वास आले. कास तलाव समुद्र सपाटीपासून ११२० मीटर उंचीवर असल्याने या तलावाचे पाणी ‘सायफन’ पद्धतीने म्हणजेच नैसर्गिक उतराने शहरापर्यंत आणण्यात आले. १५ मार्च १८८६ साली पाणी पाटात सोडण्यात आले. ते एक-दोन नव्हे तर १५ दिवसांनी शहरापर्यंत पोहोचले. कास तलावापासून यवतेश्वर मंदिरापर्यंत पाट तयार करण्यात आला होता. ३ फूट रुंद व २.५ फूट खोली असणारा हा उघडा पाट आज इतिहासजमा झाला असला तरी आपले अस्तित्व टिकवून आहे.

असा आला होता खर्च..कास पाणी योजना पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात आली असली तरी योजनेचा संपूर्ण खर्च पालिकेकडून करण्यात आला. सरकारकडून या योजनेस कोणतीही आर्थिक मदत मिळाली नव्हती. पालिकेने ३ लाख रुपये कर्ज ७ टक्के व्याजदराने घेऊन ही योजना पूर्ण केली. या योजनेला एकूण ३ लाख ६९ हजार १६४ रुपये खर्च आला. पाॅवर हाऊस व सांबरवाडी येथील दगडी टाक्यांमध्ये पाणी साठवून त्याचे वितरण केले जात होते.

अवघा १ रुपया करकासमधून प्रति माणशी ३० गॅलन (९० लिटर) पाणी पुरवले जाईल, असे नियोजन होते. या पाण्याचा कर १ हजार गॅलनला १ रुपया, असा निश्चित करण्यात आला होता.

असा होता जुना तलावलांबी : २१० मीटरउंची : १५ मीटररुंदी : ९०- मीटर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारDamधरणWaterपाणी